शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

लॉकडाऊनमध्ये नोंदणी विवाह करणाऱ्यांची वाढली संख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 01:02 IST

जुलैमध्ये सर्वाधिक विवाह; आतापर्यंत ३३0 विवाह, राज्याबाहेर केलेल्या विवाहांच्यादेखील झाल्या नोंदी

ठाणे : आयुष्यभर स्मरणात राहील, अशा मुहूर्तावर विवाह करण्याची जोडप्यांमध्ये एक वेगळीच क्रेझ असते. कदाचित, त्यामुळेच लॉकडाऊनमध्ये नोंदणी पद्धतीने विवाह करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यात सर्वाधिक विवाह जुलैमध्ये झाले आहेत. महाराष्ट्राबाहेर विवाह केलेल्यांनीही ठाणे जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात विवाह नोंदणी केली आहे.कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाले आणि सर्व व्यवहार ठप्प झाले. अनेकांना आपले विवाह सोहळे रद्द करावे लागले. काहींनी ते पुढे ढकलले. कोरोनाकाळात मोजक्याच नातेवाइकांच्या उपस्थितीत विवाह संपन्न करण्याचे आदेश सरकारने दिले. लॉकडाऊनचे नियम जसे शिथिल होत गेले, तसे रद्द झालेल्या किंवा पुढे ढकललेल्या विवाह सोहळ्यांचे मुहूर्त साधू लागले. या काळात साधेपणाने आणि मोजक्याच नातेवाइकांच्या उपस्थितीत विवाह करण्याचा पायंडा पडला. अनेकांनी तर आॅनलाइनचा आधार घेतला. ज्या नातेवाइकांना विवाह सोहळ्यासाठी दूर जाणे शक्य नाही, त्यांनी आॅनलाइन अक्षता टाकून जोडप्यास आशीर्वाद दिले.मोजक्याच लोकांमध्ये विवाह करायचा म्हणून बहुतांश लोक नोंदणी पद्धतीने विवाह करण्याकडे वळू लागले. मे ते १0 आॅगस्टपर्यंत जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात जिल्ह्यातील ३३0 जोडपे विवाहबद्ध झाले. यात जुलै महिन्यात १८१ जोडप्यांनी विवाह केले. लॉकडाऊनपूर्वी जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात दररोज २0 ते २५ विवाह संपन्न होत. १४ फेब्रुवारी, अक्षयतृतीया किंवा एखाद्या अनोख्या मुहूर्तावर ही संख्या वाढलेली दिसायची. यंदा लॉकडाऊन असतानाही ही संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयाने सांगितले. राज्याबाहेर विवाह केलेल्या ३४ जोडप्यांनी येथे नोंदणी केली आहे. लॉकडाऊनकाळात विवाह नोंदणीसाठी जिल्ह्यातून ५६६ नोटिसा, तर राज्याबाहेरून ३८ नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राबाहेरील अशा पद्धतीच्या झालेल्या विवाहांची नोंदणी या कार्यालयात इतर विवाह पद्धतीने करता येते, त्याला अदर मॅरेज किंवा इतर विवाह म्हणतात. २३ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत एकही विवाह झाला नव्हता. एप्रिल महिन्यात शेवटच्या आठवड्यात प्रायोगिक तत्त्वावर विवाह नोंदणी सुरू केली असली, तरी लोकांच्या मनात भीती असल्याने या महिन्यात संख्या शून्य होती, असे कार्यालयाने सांगितले.लॉकडाऊन काळातजिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात झालेले विवाहमे 36जून 81जुलै 181१0 आॅगस्टपर्यंत 32इतरविवाह पुढीलप्रमाणेमे ७जून ११जुलै १६ १0 आॅगस्टपर्यंत 0

टॅग्स :marriageलग्न