शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीत वाढीव पाण्याचे गाजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 02:12 IST

भिवंडी आणि कल्याण लोकसभा क्षेत्रातील अनुक्रमे बदलापूर आणि अंबरनाथ या दोन्ही शहरांना निवडणुकीच्या निमित्ताने पाण्याचे गाजर दाखवण्यात येत आहे.

- पंकज पाटील, अंबरनाथभिवंडी आणि कल्याण लोकसभा क्षेत्रातील अनुक्रमे बदलापूर आणि अंबरनाथ या दोन्ही शहरांना निवडणुकीच्या निमित्ताने पाण्याचे गाजर दाखवण्यात येत आहे. सध्या दोन्ही मतदारसंघांत पाण्याचा प्रश्न उमेदवारांना त्रासदायक ठरत आहे. त्रास कमी करण्यासाठी वाढीव पाणी आधीच मंजूर असून त्याचे लवकरच वाटप केले जाणार असल्याचे पोकळ आश्वासन दिले आहे. पाण्यासाठी व्याकूळ झालेल्या मतदारांना अप्रत्यक्ष आमिष दाखवण्याचे काम आता प्रचारादरम्यान केले जात आहे.अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा केला जात आहे. या दोन्ही शहरांची वितरणव्यवस्थेची सर्वस्वी जबाबदारी प्राधिकरणाकडे आहे. दोन्ही शहरांसाठी सरासरी १०० दशलक्ष लीटर पाणी उल्हास नदीतून उचलण्यात येते. मात्र, गेल्या १० वर्षांत अंबरनाथ, बदलापूरसाठी वाढीव पाणी मंजूर झालेले नाही. त्यामुळे आहे त्या पाण्यावर तहान भागवण्याची वेळ आली आहे. त्यातच प्राधिकरणाच्या वितरणव्यवस्थेत अनेक त्रुटी असल्याने गळतीचे प्रमाण वाढले आहे. सरासरी ३५ टक्के पाणीगळती असल्याने खरी टंचाई गळतीमुळे निर्माण झाली आहे. ही त्रूटी भरून काढण्यासाठी प्राधिकरण सक्षम कामे करत नाहीत. अशा बिकट परिस्थितीत नागरिकांना पाणी समस्येला तोंड देण्याची वेळ आली आहे. एकीकडे नागरिक पाण्यासाठी चिंतित असताना लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पाण्याच्या प्रश्नावर उमेदवार काहीएक बोलू शकत नसल्याने आता खोटी आश्वासने पुढे केली जात आहेत. अंबरनाथसाठी २० आणि बदलापूरसाठी ३० असे एकूण ५० दशलक्ष लीटर पाणी मंजूर झाले असून तो पाणीपुरवठा जून, जुलैपासून सुरू होईल, अशी बतावणी केली जात आहे. ज्या शहराला मागील १० वर्षांत दोन ते पाच दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणी मिळाले नाही. या शहरांसाठी थेट ५० दशलक्ष लीटर पाणी येणार म्हणजे नागरिकांना आश्चर्याचा धक्का देणारी बाब म्हणावी लागेल. अर्थात, नागरिकही या आश्वासनाला गांभीर्याने घेत नाही. मुळात हे अतिरिक्त पाणी जे मिळणार आहे, ते केवळ बारवी धरणाचे काम पूर्ण झाल्यावरच. मागील पाच वर्षांपासून बारवीच्या दरवाजांचे काम झालेले असतानाही धरणात अतिरिक्त पाणी साठवता आलेले नाही. पुनर्वसन आणि भरपाईचे विषय अजूनही प्रलंबित असल्याने यंदाही धरणात पूर्ण क्षमतेने पाणी भरेलच, याची ग्वाही अधिकारीही देत नाहीत.पावसाळा सुरू झाल्यावर धरणातील साठ्यात वाढ होईल. त्यामुळे मंजूर पाणी उपलब्ध झाले तरी प्राधिकरण तेवढे पाणी उचलणार की नाही, हाही प्रश्न सुटलेला नाही. अंबरनाथला अतिरिक्त ५ ते १० दशलक्ष लीटर पाणी उपलब्ध झाल्यास समस्या सुटण्यासारखी आहे. अशा परिस्थितीत या शहरासाठी २० दशलक्ष लीटर पाणी उचलणार का, हा प्रश्न सुटलेला नाही. तर, दुसरीकडे बदलापूरला ३० दशलक्ष लीटर पाणी उपलब्ध झाले, तरी त्या अतिरिक्त पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता आहे का, याचाही विचार करण्याची गरज आहे.निवडणूक कुठलीही असो, मतदारांवर आश्वासनांची खैरात केली जाते. त्यातील किती पूर्ण होतात, किती हवेत विरतात, हे आता मतदारांनाही कळून चुकले आहे. त्यामुळे अशा आश्वासनांना मतदारही आताही गांभीर्याने घेत नाही, ही विचार करायला लावणारी बाब आहे.किती पाणी उचलायचे हे गुलदस्त्यातभविष्याचा विचार करून दोन्ही शहरांसाठी पाण्याचे आरक्षण मंजूर केले जात आहे. मात्र, यातील किती पाणी उचलायचे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे निवडणुकीचा काळ सुखात जावा, यासाठी राजकीय पुढारी पाण्याच्या वाढीव आरक्षण मंजुरीचे गाजर दाखवत मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्याला मतदार साथ देतील की नाही, हे अजूनही स्पष्ट नाही.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईbhiwandiभिवंडी