शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीत वाढीव पाण्याचे गाजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 02:12 IST

भिवंडी आणि कल्याण लोकसभा क्षेत्रातील अनुक्रमे बदलापूर आणि अंबरनाथ या दोन्ही शहरांना निवडणुकीच्या निमित्ताने पाण्याचे गाजर दाखवण्यात येत आहे.

- पंकज पाटील, अंबरनाथभिवंडी आणि कल्याण लोकसभा क्षेत्रातील अनुक्रमे बदलापूर आणि अंबरनाथ या दोन्ही शहरांना निवडणुकीच्या निमित्ताने पाण्याचे गाजर दाखवण्यात येत आहे. सध्या दोन्ही मतदारसंघांत पाण्याचा प्रश्न उमेदवारांना त्रासदायक ठरत आहे. त्रास कमी करण्यासाठी वाढीव पाणी आधीच मंजूर असून त्याचे लवकरच वाटप केले जाणार असल्याचे पोकळ आश्वासन दिले आहे. पाण्यासाठी व्याकूळ झालेल्या मतदारांना अप्रत्यक्ष आमिष दाखवण्याचे काम आता प्रचारादरम्यान केले जात आहे.अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा केला जात आहे. या दोन्ही शहरांची वितरणव्यवस्थेची सर्वस्वी जबाबदारी प्राधिकरणाकडे आहे. दोन्ही शहरांसाठी सरासरी १०० दशलक्ष लीटर पाणी उल्हास नदीतून उचलण्यात येते. मात्र, गेल्या १० वर्षांत अंबरनाथ, बदलापूरसाठी वाढीव पाणी मंजूर झालेले नाही. त्यामुळे आहे त्या पाण्यावर तहान भागवण्याची वेळ आली आहे. त्यातच प्राधिकरणाच्या वितरणव्यवस्थेत अनेक त्रुटी असल्याने गळतीचे प्रमाण वाढले आहे. सरासरी ३५ टक्के पाणीगळती असल्याने खरी टंचाई गळतीमुळे निर्माण झाली आहे. ही त्रूटी भरून काढण्यासाठी प्राधिकरण सक्षम कामे करत नाहीत. अशा बिकट परिस्थितीत नागरिकांना पाणी समस्येला तोंड देण्याची वेळ आली आहे. एकीकडे नागरिक पाण्यासाठी चिंतित असताना लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पाण्याच्या प्रश्नावर उमेदवार काहीएक बोलू शकत नसल्याने आता खोटी आश्वासने पुढे केली जात आहेत. अंबरनाथसाठी २० आणि बदलापूरसाठी ३० असे एकूण ५० दशलक्ष लीटर पाणी मंजूर झाले असून तो पाणीपुरवठा जून, जुलैपासून सुरू होईल, अशी बतावणी केली जात आहे. ज्या शहराला मागील १० वर्षांत दोन ते पाच दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणी मिळाले नाही. या शहरांसाठी थेट ५० दशलक्ष लीटर पाणी येणार म्हणजे नागरिकांना आश्चर्याचा धक्का देणारी बाब म्हणावी लागेल. अर्थात, नागरिकही या आश्वासनाला गांभीर्याने घेत नाही. मुळात हे अतिरिक्त पाणी जे मिळणार आहे, ते केवळ बारवी धरणाचे काम पूर्ण झाल्यावरच. मागील पाच वर्षांपासून बारवीच्या दरवाजांचे काम झालेले असतानाही धरणात अतिरिक्त पाणी साठवता आलेले नाही. पुनर्वसन आणि भरपाईचे विषय अजूनही प्रलंबित असल्याने यंदाही धरणात पूर्ण क्षमतेने पाणी भरेलच, याची ग्वाही अधिकारीही देत नाहीत.पावसाळा सुरू झाल्यावर धरणातील साठ्यात वाढ होईल. त्यामुळे मंजूर पाणी उपलब्ध झाले तरी प्राधिकरण तेवढे पाणी उचलणार की नाही, हाही प्रश्न सुटलेला नाही. अंबरनाथला अतिरिक्त ५ ते १० दशलक्ष लीटर पाणी उपलब्ध झाल्यास समस्या सुटण्यासारखी आहे. अशा परिस्थितीत या शहरासाठी २० दशलक्ष लीटर पाणी उचलणार का, हा प्रश्न सुटलेला नाही. तर, दुसरीकडे बदलापूरला ३० दशलक्ष लीटर पाणी उपलब्ध झाले, तरी त्या अतिरिक्त पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता आहे का, याचाही विचार करण्याची गरज आहे.निवडणूक कुठलीही असो, मतदारांवर आश्वासनांची खैरात केली जाते. त्यातील किती पूर्ण होतात, किती हवेत विरतात, हे आता मतदारांनाही कळून चुकले आहे. त्यामुळे अशा आश्वासनांना मतदारही आताही गांभीर्याने घेत नाही, ही विचार करायला लावणारी बाब आहे.किती पाणी उचलायचे हे गुलदस्त्यातभविष्याचा विचार करून दोन्ही शहरांसाठी पाण्याचे आरक्षण मंजूर केले जात आहे. मात्र, यातील किती पाणी उचलायचे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे निवडणुकीचा काळ सुखात जावा, यासाठी राजकीय पुढारी पाण्याच्या वाढीव आरक्षण मंजुरीचे गाजर दाखवत मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्याला मतदार साथ देतील की नाही, हे अजूनही स्पष्ट नाही.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईbhiwandiभिवंडी