शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

निवडणुकीत वाढीव पाण्याचे गाजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 02:12 IST

भिवंडी आणि कल्याण लोकसभा क्षेत्रातील अनुक्रमे बदलापूर आणि अंबरनाथ या दोन्ही शहरांना निवडणुकीच्या निमित्ताने पाण्याचे गाजर दाखवण्यात येत आहे.

- पंकज पाटील, अंबरनाथभिवंडी आणि कल्याण लोकसभा क्षेत्रातील अनुक्रमे बदलापूर आणि अंबरनाथ या दोन्ही शहरांना निवडणुकीच्या निमित्ताने पाण्याचे गाजर दाखवण्यात येत आहे. सध्या दोन्ही मतदारसंघांत पाण्याचा प्रश्न उमेदवारांना त्रासदायक ठरत आहे. त्रास कमी करण्यासाठी वाढीव पाणी आधीच मंजूर असून त्याचे लवकरच वाटप केले जाणार असल्याचे पोकळ आश्वासन दिले आहे. पाण्यासाठी व्याकूळ झालेल्या मतदारांना अप्रत्यक्ष आमिष दाखवण्याचे काम आता प्रचारादरम्यान केले जात आहे.अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा केला जात आहे. या दोन्ही शहरांची वितरणव्यवस्थेची सर्वस्वी जबाबदारी प्राधिकरणाकडे आहे. दोन्ही शहरांसाठी सरासरी १०० दशलक्ष लीटर पाणी उल्हास नदीतून उचलण्यात येते. मात्र, गेल्या १० वर्षांत अंबरनाथ, बदलापूरसाठी वाढीव पाणी मंजूर झालेले नाही. त्यामुळे आहे त्या पाण्यावर तहान भागवण्याची वेळ आली आहे. त्यातच प्राधिकरणाच्या वितरणव्यवस्थेत अनेक त्रुटी असल्याने गळतीचे प्रमाण वाढले आहे. सरासरी ३५ टक्के पाणीगळती असल्याने खरी टंचाई गळतीमुळे निर्माण झाली आहे. ही त्रूटी भरून काढण्यासाठी प्राधिकरण सक्षम कामे करत नाहीत. अशा बिकट परिस्थितीत नागरिकांना पाणी समस्येला तोंड देण्याची वेळ आली आहे. एकीकडे नागरिक पाण्यासाठी चिंतित असताना लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पाण्याच्या प्रश्नावर उमेदवार काहीएक बोलू शकत नसल्याने आता खोटी आश्वासने पुढे केली जात आहेत. अंबरनाथसाठी २० आणि बदलापूरसाठी ३० असे एकूण ५० दशलक्ष लीटर पाणी मंजूर झाले असून तो पाणीपुरवठा जून, जुलैपासून सुरू होईल, अशी बतावणी केली जात आहे. ज्या शहराला मागील १० वर्षांत दोन ते पाच दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणी मिळाले नाही. या शहरांसाठी थेट ५० दशलक्ष लीटर पाणी येणार म्हणजे नागरिकांना आश्चर्याचा धक्का देणारी बाब म्हणावी लागेल. अर्थात, नागरिकही या आश्वासनाला गांभीर्याने घेत नाही. मुळात हे अतिरिक्त पाणी जे मिळणार आहे, ते केवळ बारवी धरणाचे काम पूर्ण झाल्यावरच. मागील पाच वर्षांपासून बारवीच्या दरवाजांचे काम झालेले असतानाही धरणात अतिरिक्त पाणी साठवता आलेले नाही. पुनर्वसन आणि भरपाईचे विषय अजूनही प्रलंबित असल्याने यंदाही धरणात पूर्ण क्षमतेने पाणी भरेलच, याची ग्वाही अधिकारीही देत नाहीत.पावसाळा सुरू झाल्यावर धरणातील साठ्यात वाढ होईल. त्यामुळे मंजूर पाणी उपलब्ध झाले तरी प्राधिकरण तेवढे पाणी उचलणार की नाही, हाही प्रश्न सुटलेला नाही. अंबरनाथला अतिरिक्त ५ ते १० दशलक्ष लीटर पाणी उपलब्ध झाल्यास समस्या सुटण्यासारखी आहे. अशा परिस्थितीत या शहरासाठी २० दशलक्ष लीटर पाणी उचलणार का, हा प्रश्न सुटलेला नाही. तर, दुसरीकडे बदलापूरला ३० दशलक्ष लीटर पाणी उपलब्ध झाले, तरी त्या अतिरिक्त पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता आहे का, याचाही विचार करण्याची गरज आहे.निवडणूक कुठलीही असो, मतदारांवर आश्वासनांची खैरात केली जाते. त्यातील किती पूर्ण होतात, किती हवेत विरतात, हे आता मतदारांनाही कळून चुकले आहे. त्यामुळे अशा आश्वासनांना मतदारही आताही गांभीर्याने घेत नाही, ही विचार करायला लावणारी बाब आहे.किती पाणी उचलायचे हे गुलदस्त्यातभविष्याचा विचार करून दोन्ही शहरांसाठी पाण्याचे आरक्षण मंजूर केले जात आहे. मात्र, यातील किती पाणी उचलायचे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे निवडणुकीचा काळ सुखात जावा, यासाठी राजकीय पुढारी पाण्याच्या वाढीव आरक्षण मंजुरीचे गाजर दाखवत मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्याला मतदार साथ देतील की नाही, हे अजूनही स्पष्ट नाही.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईbhiwandiभिवंडी