शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील ४६ हजार पदवीधर मतदारांची संख्या वाढवा; नवीन नोंदणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

By जितेंद्र कालेकर | Updated: September 27, 2023 19:44 IST

कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदारयादी तयार करण्याकरिता केंद्रीय निवडणूक आयोगाकडून तीन महिन्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

ठाणे: कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदारयादी तयार करण्याकरिता केंद्रीय निवडणूक आयोगाकडून तीन महिन्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ठाणे जिल्ह्यात ४६ हजार पदवीधर मतदारांची नोंद असून नवीन नोंदणी करून ही संख्या आणखी वाढवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी बुधवारी केले.

निवडणूक आयोगाने १ नोव्हेंबर २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी शिनगारे यांनी राजकीय पक्षांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत यासंबंधी माहिती दिली. ३० सप्टेंबर ते ३० डिसेंबर २०२३ या कालावधीत पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने याद्या तयार करण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. पात्र पदवीधरांना कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील मतदार यादीत यापूर्वी नाव नोंदणी केली असली तरी परत नव्याने नाव नोंदणी करावी लागणार आहे. यासाठीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे, असे शिनगारे यांनी सांगितले.

दरम्यान, पदवीधर मतदारसंघाच्या सध्या अस्तित्वात असलेल्या यादीमध्ये ज्या व्यक्तींची नावे समाविष्ट आहेत, अशा सर्व पात्र पदवीधरांना नवीन यादी तयार करताना विहीत नमुन्यात नव्याने अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. पदवीधर मतदारसंघाच्या अर्हतेसाठी जी व्यक्ती भारताची नागरिक आहे, त्या मतदारसंघातील सर्वसाधारण रहिवासी आहे, १ नोव्हेंबर २०२३ पूर्वी किमान ३ वर्षे भारताच्या राज्य क्षेत्रातील विद्यापीठाची एकतर पदवीधर असेल किंवा त्याच्याशी समतुल्य असलेली अर्हता धारण करीत असेल, अशी प्रत्येक व्यक्ती मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यास पात्र आहे. तीन वर्षांचा कालावधी हा ज्या दिनांकास अर्हता पदवी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आणि ते विद्यापीठ किंवा अन्य संबंधित प्राधिकरण यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आले, त्या दिनांकापासून मोजण्यात येईल, असे जिल्हाधिकारी शिनगारे यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात यापूर्वीच्या नोंदणीत ४६ हजार पदवीधरांनी मतदार यादीत नाव नोंदणी केली होती. यावेळी यामध्ये आणखी वाढ हाेण्याची अपेक्षा आहे. पदवीधरांनी माेठ्या संख्येने नाव नोंदणीसाठी सहभाग घ्यावा. या मतदारांची संख्या वाढावी, यासाठी राजकीय पक्षांनीही पुढाकार घेण्याचे आवाहन शिनगारे यांनी केले. मतदार नोंदणीसाठी जिल्ह्यात १८ ठिकाणी पदनिर्देशित अधिकारी नियुक्त केल्याचेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :thaneठाणे