शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

नागरिकांच्या मानगुटीवर पाणीपट्टी दरवाढीसह नवीन पाणीपुरवठा लाभ कराचा वाढीव बोजा; स्थायी समितीची मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2017 17:18 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेकडून शहरात होणाऱ्या पाणी पुरवठ्यापोटी शनिवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत पाणीपट्टीच्या निवासी दरात २ रुपये तर वाणिज्य दरात १० रुपये वाढीसह नवीन सुर्या प्रकल्प योजनेच्या पुर्णत्वासाठी पाणीपुरवठा लाभ कर लागू करण्यास मान्यता देण्यात आली.

- राजू काळे भाईंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेकडून शहरात होणाऱ्या पाणी पुरवठ्यापोटी शनिवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत पाणीपट्टीच्या निवासी दरात २ रुपये तर वाणिज्य दरात १० रुपये वाढीसह नवीन सुर्या प्रकल्प योजनेच्या पुर्णत्वासाठी पाणीपुरवठा लाभ कर लागू करण्यास मान्यता देण्यात आली. मात्र ही दरवाढ अन्यायकारक असल्याचा दावा करीत शिवसेना व काँग्रेसच्या सदस्यांनी त्याला तीव्र विरोध दर्शविला. 

पालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आहे. यापूर्वीदेखील भाजपा-शिवसेना युतीची सत्ता होती. त्यावेळी २० मार्च २०१५ रोजीच्या महासभेत पाणीपट्टीच्या निवासी दरात ३ रुपये व वाणिज्य दरात १२ रुपये वाढ केली होती. दिड वर्षानंतर पुन्हा भाजपा सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर निवासी दरात आणखी २ रुपये व वाणिज्य दरात १० रुपये वाढीला शनिवारच्या स्थायी समिती बैठकीत मान्यता दिली. यापूर्वी प्रशासनाकडून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावात निवासी पाणीपट्टीचा दर १० रुपयांवरुन १८ रुपये तर वाणिज्य पाणीपट्टीचा दर ४० रुपयांवरुन १०० रुपये इतका प्रस्तावित करण्यात आला होता. या भरमसाठी दरवाढीमुळे सामान्य नागरीकांवर कराचा बोजा पडण्याची शक्यता गृहित धरुन त्यात अनुक्रमे ६ व ५० रुपये कपात करुन निवासी दरासाठी १२ व वाणिज्य दरासाठी ५० रुपये दर निश्चित करण्यात आला. परंतू, ही  दरवाढ अन्यायकारक असल्याचा दावा करीत शिवसेना व काँग्रेस या विरोधी सदस्यांनी त्याला तीव्र विरोध दर्शविला. परंतू, सत्ताधारी भाजपाने बहुमताने त्याला मान्यता दिली. तसेच पालिकेला राज्य सरकारने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत अतिरीक्त ७५ एमएलडी पाणीपुरवठा २०१४ मध्ये मंजूर केला. ही योजना २६९ कोटी ६२ लाख रुपये खर्चाची असून त्यात पालिकेला १०२ कोटी १८ लाखांची निधी खर्ची घालावा लागणार आहे. उर्वरीत १६७ कोटी ४४ लाखांचे अनुदान राज्य सरकारकडुन देण्यात येणार आहे. दरम्यान पालिकेला या योजनेंतर्गत ५० एमएलडी पाणीपुरवठा उपलब्ध झाला असुन त्यासाठी पालिकेने सुमारे १२५ कोटींचा खर्च केला आहे. उर्वरीत२५ एमएलडी पाणीपुरवठा अद्याप उपलब्ध करण्यात आलेला नसुन पालिकेने या योजनेसाठी एमएमएआरडीएकडुन ५४ कोटींचे कर्ज काढले आहे. त्यातील काही रक्कम पालिकेकडून उचलण्यात आली असली तरी त्याचा हप्ता अद्याप सुरु झालेला नाही. तत्पुर्वी पालिकेला भुयारी गटार योजनेसाठी उचलेल्या कर्जापोटी ६ कोटी ३५ लाखांचा वार्षिक हप्ता अदा करावा लागत असून त्यात नवीन कर्जाच्या हप्त्याची वाढ होणार आहे. 

२०१६-१७ मधील पाणीपुरवठा विभागाच्या अंदाजपत्रकात महसुली जमा ५० कोटी ४१ लाख तर खर्च १२ कोटी ५४ लाखांनी वाढल्याचे दर्शविण्यात आले आहे. हि तफावत भरुन काढण्यासह भविष्यात एमएमआरडीएमार्फत सुर्या प्रकल्पातुन २१८ एमएलडी अतिरीक्त पाणीपुरवठा शहराला उपलब्ध होणार आहे. ही योजना एमएमआरडीए स्वत:च्या खर्चातून पूर्ण करणार असली तरी त्याची मुख्य जलवाहिनी शहराच्या सीमेपर्यंतच आणण्यात येणार आहे. त्यापुढे शहरातंर्गत योजना पुर्ण करण्यासाठी पालिकेने सुमारे ४०० कोटींचा खर्च गृहित धरला आहे. त्यासाठी पालिकेला स्वत:चा निधी उभा करावा लागणार आहे. यामुळे प्रशासनाने शनिवारच्या स्थायीत पाणीपुरवठा लाभ कर हा मालमत्ता कर योग्य मुल्यावर आधारीत ८ टक्के इतका प्रस्तावित केला होता. मात्र या दोन्ही योजना अद्याप पुर्ण न झाल्याने पाणीपुरवठा लाभ कर लागु करण्यात येऊ नये, अशी मागणी विरोधकांनी करुन त्याला विरोध दर्शविला. मात्र सत्ताधारी भाजपाने त्यालाही बहुमताच्या जोरावर मान्यता दिली. 

त्याचप्रमाणे पालिका राबवित असलेल्या भुयारी गटार योजनेचा खर्च ४९१ कोटी ९६ लाख इतका आहे. या योजनेचे सुमारे ९५ टक्के काम  अद्याप पुर्ण झाले असुन त्यातील १० पैकी ६ मलनि:स्सारण केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. त्यांच्या देखभाल, दुरुस्ती व वीजपुरवठ्याचा खर्च वर्षाला १५ कोटी ६० लाख इतका होतो. हा खर्च भरुन काढण्यासाठी मालमत्ता कराच्या करयोग्य मुल्यावर ५ टक्के मलप्रवाह कर लागु करण्याचा प्रस्तावही प्रशासनाकडुन प्रस्तावित करण्यात आला होता. परंतु, हि योजना देखील पुर्ण झाली नसल्याचा दावा करीत विरोधकांसह सत्ताधारी भाजपाने प्रशासनाला सविस्तर प्रस्ताव सादर करण्याची सुचना करीत तो तुर्तास प्रलंबित ठेवला.