शहरं
Join us  
Trending Stories
1
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी, काल झालेली अटक
2
'३० कॉटेजचे एक आलिशान रिसॉर्ट बांधायचेच राहिले...'; बिझनेसमन धर्मेंद्रची शेवटची इच्छा होती...
3
महिंद्रा-टाटासह 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले! बाजारात अचानक का वाढला विक्रीचा दबाव?
4
दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला; अफगाणिस्तानातून आलेल्या विमानाची चुकीच्या रनवेवर लँडिंग
5
नगरपरिषद निवडणूक होण्यापूर्वीच भाजपाच्या १०० सदस्यांची बिनविरोध निवड; विरोधकांचा हल्लाबोल
6
शर्टच्या आतून लावला बॉम्ब, गेटजवळ पोहचताच दाबले डेटोनेटर, पाकिस्तानातील आत्मघाती हल्ल्याचा फोटो
7
सावधान! सरकार नवीन काहीतरी आणते, लोक फसतात; आता 'SIR फॉर्म' स्कॅमचे जाळे टाकू लागले सायबर भामटे
8
डॉक्टर, सुशिक्षित तरुणांना पाकिस्तानी 'आका'ने दिली ट्रेनिंग; लाल किल्ला स्फोटातील आरोपींचे जैश-ए-मोहम्मदशी थेट कनेक्शन!
9
“मेट्रोसारखी सुंदर लोकल ट्रेन मुंबईकरांना देणार, लवकरच कायापालट”; CM फडणवीसांचे आश्वासन
10
'अरुणाचल'मध्ये जन्मलेल्या भारतीय महिलेला शांघाय विमानतळावर १८ तास डांबले; 'हा' पासपोर्ट अवैध असल्याचे चीनचे फर्मान
11
"भारतीय सिनेमातील एका युगाचा अंत..."; पंतप्रधान मोदी, शरद पवार, राज ठाकरेंनी धर्मेंद्र यांना वाहिली श्रद्धांजली
12
आता सरकारी विमा कंपन्यांचे विलीनीकरण की खासगीकरण? विचार सुरू; सरकार म्हणते...
13
Dharmendra Passed Away: डोळ्यांत अश्रू अन् निस्तेज चेहरा! धर्मेंद्र यांच्या निधनाने पत्नी हेमा मालिनी व्यथित
14
'शोले'चा 'वीरू' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन, बॉलिवूड शोकमग्न
15
IND vs SA : मार्कोचा 'सिक्सर'! १५ वर्षांत पहिल्यांदा असं घडलं! टीम इंडिया २०१ धावांत ऑलआउट
16
Dharmendra: 'बाप'माणूस हरपला! वडिलांच्या निधनाने कोलमडून गेली ईशा देओल, स्मशानभूमीतील भावुक करणारा व्हिडीओ
17
Palmistry: भाग्य रेषा तुटलेली आहे की अखंड? 'या' स्थितीवरून उलगडते संपत्ति आणि नशिबाचे गूढ
18
Nashik Crime: कॉल केला आणि म्हणाली, 'पतीला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवायचे नसेल तर पाच लाख दे!'
19
सरकारी बंगला, २०० लिटर पेट्रोल आणि २० लाखांची ग्रॅच्युइटी! सरन्यायाधीशांना मिळतात 'या' खास सुविधा!
20
भारताच्या वीरपुत्राला अमेरिकेचा सलाम! दुबई एअर शोमध्ये शहीद विंग कमांडर नमांश स्याल यांच्या सन्मानार्थ F-16 डेमॉन्स्ट्रेशन रद्द
Daily Top 2Weekly Top 5

बस वाढूनही उत्पन्न घटले, केडीएमटीची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 06:12 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेत बसची संख्या कमी असताना वर्षाला दोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत होते. आता बसची संख्या वाढूनही उत्पन्नात घट झाली आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेत बसची संख्या कमी असताना वर्षाला दोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत होते. आता बसची संख्या वाढूनही उत्पन्नात घट झाली आहे. याप्रकरणी परिवहन व्यवस्थापक देवीदास टेकाळे यांच्यावर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी सदस्यांनी मंगळवारी झालेल्या परिवहन समितीच्या सभेत केली. सदस्यांच्या या रोषाला सभापती संजय पावशे यांनीही दुजोरा देत व्यवस्थापनाच्या त्रुटींवर बोट ठेवले.परिवहन शिवसेनेचे सदस्य संतोष चव्हाण यांनी, परिवहनच्या दैनंदिन उत्पन्नात घट होत आहे. त्यामुळे त्याला जबाबदार धरणाºया अधिकाºयांवर निलंबनाची कारवाई करावी, असा प्रस्ताव मांडला होता. त्यावर चर्चेदरम्यान चव्हाण म्हणाले, की २०१४ मध्ये परिवहनच्या ताफ्यात केवळ १०० साध्या बस व १० एसी बस होत्या. या बसद्वारे २०१४ मध्ये वर्षभरात परिवहनला २० कोटी रुपये उत्पन्न मिळाले. २०१५ मध्ये २४ कोटी रुपये उत्पन्न मिळाले. २०१६ मध्ये २२ कोटी रुपये उत्पन्न मिळाले. बस कमी असताना उत्पन्न जास्त मिळत होते. परिवहनच्या ताफ्यात सध्या २१८ बस आहेत. बसची संख्या वाढूनही परिवहनचे वार्षिक उत्पन्न घटले आहे. मार्च ते आक्टोबर २०१७ या सात महिन्यात ११ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. उर्वरित पाच महिन्यांत ११ कोटी उत्पन्न प्रवासी वाहतुकीतून मिळणे अपेक्षित नाही. कारण उत्पन्न घटत आहे. बस कमी होत्या, तेव्हा उत्पन्न जास्त आणि बस जास्त आल्या तेव्हा उत्पन्न घटले. परिवहनचे हे उलटे चक्र फिरण्यास जबाबदार असलेल्या अधिकाºयांना निलंबित करावे, अशी जोरदार मागणी चव्हाण यांनी केली. भाजपा सदस्य नितीन पाटील यांनीही त्यांच्या मागणीस पाठिंबा दिला. तसेच कारवाईची मागणी उचलून धरली.परिवहन व्यवस्थापनाने कोणाला विचारून बस फेºयांच्या वेळापत्रकात बदल केला, असा जाब सदस्यांनी प्रशासनाला विचारला. सदस्य प्रल्हाद म्हात्रे यांनी व्यवस्थापक टेकाळे यांच्यावरच प्रथम कारवाई करावी, अशी मागणी केली. सभापती पावशे यांनी सदस्यांचा राग योग्य आहे. प्रशासनाकडून कोणतीच कार्यवाही केली जात नाही.पावशे म्हणाले की, सकाळी ६ ते ८.३०, सकाळी ११ ते दुपारी १.३० आणि दुपारी चार ते रात्री ८.३० दरम्यान बस कमी असतात. डोंबिवली स्टेशन ते निवासी या बसला प्रवासी जास्त आहेत. तरीही पाऊण तास प्रवासी बसच्या प्रतीक्षेत ताटकळत उभे असतात. जुलै २०१६ पासून कल्याण-डोंबिवलीत ठाणे व नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बस जास्त प्रमाणात येत आहेत. त्यामुळे केडीएमटीचे उत्पन्न घटले आहे. रिक्षाचालक, खाजगी बस आणि अन्य परिवहन सेवेसाठी केडीएमटी व्यवस्थापनाने रान मोकळे सोडल्याचा आरोप सदस्यांनी या वेळी केला. फुकट प्रवास करणाºया प्रवाशांकडून दंड वसूल करण्याचे लक्ष्य एकाही तिकीट तपासणीसकाने पार पाडलेले नाही. त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी सदस्यांनी केली.चालक-वाहकांअभावी बस डेपोमध्येचकेडीएमटीचे व्यवस्थापक टेकाळे यांनी सांगितले की, नव्या दाखल झालेल्या बसवर चालक नसल्याने त्या रस्त्यावर येऊ शकत नाहीत. तसेच त्यांच्या देखभाल दुरुस्तीचे आणि चालक भरतीची निविदा काढली होती. तिला प्रतिसाद मिळत नसल्याने नव्या बस दाखल होऊनही उत्पन्न वाढलेले नाही.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका