शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

जिल्ह्यात कोरोनाच्या ८८७ रुग्णांची वाढ, ६१ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:36 IST

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे ८८७ रुग्ण शुक्रवारी आढळले. तर गेल्या २४ तासांत ६१ जणांचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे. ...

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे ८८७ रुग्ण शुक्रवारी आढळले. तर गेल्या २४ तासांत ६१ जणांचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पाच लाख सात हजार ३१६ बाधित व आठ हजार ७६८ मृतांची नोंद करण्यात आली आहे.

ठाणे शहर परिसरात १६९ रुग्णांची वाढ होऊन नऊ जणांचा मृत्यू झाला. यासह शहरात एक लाख २७ हजार ४५५ रुग्णांसह एक हजार ८४६ मृतांची नोंद झाली आहे. कल्याण-डोंबिवलीत २१५ रुग्ण सापडले असून २२ मृत्यू झाले आहेत. यामुळे येथे आता एक लाख ३१ हजार २४६ बाधितांसह एक हजार ७९० मृतांची नोंद झाली आहे.

उल्हासनगरमध्ये १७ रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. या शहरातल्या एकूण १९ हजार ८९८ रुग्णांसह ४६४ मृत्यू नोंदले आहे. भिवंडीत १२ रुग्ण सापडले असून एकाचा मृत्यू झाला आहे. येथील रुग्णांची संख्या १० हजार २८६ व ४२८ मृत्यू नोंदले आहेत. मीरा-भाईंदरला दिवसभरात १२७ बाधितांसह सात मृत्यू झाल्याचे उघड झाले. या शहरात आतापर्यंत ४५ हजार ८२२ बाधित व एक हजार २३१ मृतांची नोंद करण्यात आली.

अंबरनाथला २८ बाधित सापडले असून तिघांचा मृत्यू झाला. येथील एकूण रुग्णसंख्या १८ हजार ७१ बाधित व ४०१ मृत्यू झाले आहेत. कुळगांव-बदलापूर नगरपरिषद क्षेत्रात ४४ रुग्णांची वाढ होऊन एकही मृत्यू नाही. या शहरातील २० हजार २७२ बाधितांची व २३३ मृतांची नोंद झाली. ग्रामीण गांवपाड्यांत १३६ रुग्णांसह नऊ मृत्यू झाल्याचे आढळून आले. या परिसरातील बाधितांची संख्या ३४ हजार २४९ व ८३१ मृत्यू नोंदले गेले आहेत.