शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ६११ रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:54 IST

ठाणे : जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे ६११ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आता दोन लाख ६३ हजार ६२५ रुग्णांची नोंद झाली ...

ठाणे : जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे ६११ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आता दोन लाख ६३ हजार ६२५ रुग्णांची नोंद झाली असून सात रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृतांची संख्या सहा हजार २६३ वर गेली आहे.

ठाणे शहरात १८५ रुग्ण आढळल्याने येथील रुग्णसंख्या आता ६१ हजार ९३० झाली आहे. शहरात दोन मृत्यू झाल्यामुळे मृत्यूंची संख्या एक हजार ३८४ झाली. कल्याण-डोंबिवलीत १७५ रुग्णांची वाढ झाली असून एक मृत्यू आहे. आता ६२ हजार ७८४ रुग्ण बाधित असून एक हजार १९६ मृत्यूंची नोंंद आहे.

उल्हासनगरमध्ये १३ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. येथील बाधितांची संख्या ११ हजार ८१६ झाली आहे. आतापर्यंत ३७२ मृतांची नोंद कायम आहे. भिवंडीला सात बाधित आढळून आले असून एकही मृत्यू नाही. आता बाधित सहा हजार ७७६ असून मृतांची संख्या ३५५ कायम आहे. मीरा-भाईंदरमध्ये ३८ रुग्ण आढळले असून एक मृत्यू आहे. या शहरात बाधितांची संख्या २७ हजार आठ असून मृतांची संख्या ८०४ झाली आहे.

अंबरनाथला १२ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. येथे बाधित आठ हजार ७७७ असून मृत्यू ३१५ आहेत. बदलापूरमध्ये ४१ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधित नऊ हजार ८७२ झाले आहेत. या शहरात एक मृत्यू आहे. आता येथील मृत्यूंची संख्या १२७ आहे. ग्रामीणमध्ये २१ रुग्णांची वाढ झाली असून एकही मृत्यू नाही. आता बाधित १९ हजार ५०९ आणि आतापर्यंत ५९२ मृत्यूंची नोंद कायम आहे.