शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

झाडांच्या संगोपनावर गुण देण्याच्या योजनेचा शैक्षणिक धोरणात समावेश करा; २५ वर्षांचा तरुण करतोय १६ हजार किमीचा पायी प्रवास

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: November 7, 2023 19:20 IST

४ डिसेंबर २०२२ रोजी अयोध्यावरुन आशुतोषने आपला पायी प्रवास सुरू केला.

ठाणे : पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना एक झाड देऊन त्या झाडाचे दरवर्षी कशाप्रकारे संगोपन केले आहे यावर त्यांना गूण देण्यात यावे आणि या योजनेचा शैक्षणिक धोरणात समावेश करण्यात यावा यासाठी तसेच, वाढत चाललेले हवा प्रदूषण याला आळा घालण्यासाठी सिमेंट काँक्रीटच्या जंगलात वृक्षांचे रोपण व्हावे यासाठी अयोध्यावरुन निघालेला २५ वर्षांचा तरुण १६ हजार किमीचा पायी प्रवास करीत आहे. तसेच, प्रत्येक शाळेमध्ये वृक्षारोपण करीत आहे. आतापर्यंत त्याने ९४०० किमीची पदयात्रा पूर्ण करुन २३०० वृक्षांचे रोपण शाळाशाळांमध्ये केले आहे. आशुतोष पांड्ये असे या तरुणाचे नाव आहे. 

४ डिसेंबर २०२२ रोजी अयोध्यावरुन आशुतोषने आपला पायी प्रवास सुरू केला. संपूर्ण देशांतील शाळआंमध्ये दहा हजार वृक्षांचे रोपण करण्याचा ध्यास त्याने घेतला आहे. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगढ, ओडीसा, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामीळनाडू, केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र असे १२ राज्य त्याने केले असून पुढे त्याला गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, दिल्ली, हरयाणा, पंजाब, कश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि परत उ. प्रदेश 

या राज्यात पदयात्रा पूर्ण करणार आहे. २०२६ मध्ये त्याची ही पदयात्रा पूर्ण होणार आहे. आयेध्येत पोहोचल्यावर त्या वर्षात एकाच दिवशी एक लाख झाडे लावण्याचा संकल्प त्याने केला आहे. यासाठी तो विविध सामाजिक संघटना, पर्यावरणप्रेमींना सहभागी करुन घेणार आहे. ९४०० किमीच्या प्रवासात त्याने ४ मुख्यमंत्री, सात वनमंत्री, ६८ जिल्हाधिकारी यांची भेट घेतली तर ९७ शाळांमध्ये सेमीनार घेऊन तब्बल ५० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. १५०० गाव आणि ६४ जिल्ह्यांत त्याचा प्रवास झाला आहे.  

१९५२ साली आपल्या देशाची लोकसंख्या ३६ करोड होती. ती आता १५२ करोडोच्या घरात गेली आहे. सिमेंट काँक्रीटचे जंगले उभी राहू लागली आहे. झाडांची कत्तल होऊ लागली आहे. अशातच अशा पर्यावरणाला जोडणाऱ्या शैक्षणिक धोरणाची आवश्यकता असल्याचे आशुतोष याने सांगितले. मी नोकरीतून राजीनामा देऊन पर्यावरण वाचविण्याची ही चळवळ हाती घेतल्याचेही त्याने सांगितले. काल ठाण्यात आल्यावर स्वत्वचे श्रीपाद भालेराव यांनी त्यांच्या घरी आशुतोषची निवास व्यवस्था केली होती.

टॅग्स :thaneठाणे