शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

केडीएमसी हद्दीत रुग्ण आढळण्याचे प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 00:50 IST

आयुक्तांची माहिती : मृत्युदर १.८ टक्क्यांवर, नागरिकांना दिलासा

कल्याण : केडीएमसी हद्दीत कोरोनाचे नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी होत आहे. तसेच रुग्णदुपटीचा दर हा ५२ दिवसांवर जाऊन ठेपला आहे. तो येत्या काळात ६० दिवसांवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती तूर्तास तरी नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे, अशी माहिती केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शुक्रवारी दिली.

सध्या दिवसाला नवीन २५० नवे रुग्ण आढळत आहेत. केडीएमसी हद्दीत कोरोनामुळे मृत्यूचा दर हा १.८ टक्के असून, तो अन्य महापालिकांच्या तुलनेत कमी आहे. शहरात सुरुवातीच्या काळात कोरोना रुग्णांना सुविधा पुरविण्यात काही मर्यादा होत्या. त्यावेळी काही व्यवस्थाच नव्हती. आता कोरोना रुग्णांसाठी ६०० खाटांची सुविधा आहे. त्यामुळे आता रुग्णांसाठी खाटांची वानवा नाही. सध्या बेड रिक्त आहेत, असे चित्र आहे. त्यामुळे खाटांसाठी रुग्णांना जास्त वेळ भटकंती करण्याची गरज भासत नाही, असे सूर्यवंशी म्हणाले.कोरोना रुग्णांसाठी कल्याणमधील गौरीपाडा येथे पीपीई तत्त्वावर क्रेष्णा डायग्नोस्टिकने सुरू केलेल्या टेस्टिंग लॅबमुळे रुग्ण चाचणीचा दर वाढला आहे. दिवसाला एक हजार रुग्णांची चाचणी केली जात असून, त्याचा अहवालही आठ ते नऊ तासांत मिळत आहे. त्यामुळे त्याच दिवशी पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार करणे शक्य झाले आहे. त्याचबरोबर ‘फॅमिली डॉक्टर कोविड फायटर’ या मोहिमेंतर्गत रुग्णांची तपासणी केली जात आहे, असे ते म्हणाले.दिवसाचा हजार अ‍ॅण्टीजेन चाचणीचा मानसच्अ‍ॅण्टीजेन टेस्टचे प्रमाण वाढले आहे. दिवसाला एक हजार अ‍ॅण्टीजेन चाचण्या करण्याचा डॉक्टरांचा मानस आहे. प्रत्येक प्रभागातही रुग्णांचे स्क्रिनिंग सुरू आहे.च्आरटीपीसी कोरोना टेस्ट व अ‍ॅण्टीजेन टेस्ट करण्याचे प्रमाण वाढल्याने कोरोना चाचणीपश्चात पॉझिटिव्ह रुग्णांचा दर यापूर्वी ४१ टक्के होता. आता तो कमी होऊन २१ टक्क्यांवर आला आहे, असे आयुक्तांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेkdmcकल्याण डोंबिवली महापालिका