शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

माझी ई शाळा, डिजिटल साक्षर मिशन अभियानाचे शिक्षण मंत्री केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन 

By नितीन पंडित | Updated: November 19, 2022 22:46 IST

इंग्रजी भाषेचा आपल्यावर असलेला पगडा देखील हळूहळू कमी होणार असल्याचे मत केसरकर यांनी यावेळी व्यक्त केले

भिवंडीकोरोना संकट काळानंतर ऑनलाईन शिक्षण पद्धती सर्वत्र वापरली जात असल्याने राज्याच्या डिजिटल शाळा सुरु झाली पाहिजे असे निर्णय राज्य शासनाने घेतला असून राज्यातील माझी इ शाळा या डिजिटल साक्षर मिशन अभियानाची सुरुवात भिवंडीतून करण्यात आली.शनिवारी भिवंडीतील काल्हेर जिल्हा परिषद शाळेत या अभियानाचे उदघाटन राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.प्रथम इन्फोटेक फाउंडेशन,जिल्हा परिषद ठाणे व राज्य शासनाच्या समग्र शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्यासह एल अँड टी,प्रथम फाउंडेशनचे अधिकारी तसेच शिक्षण विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात मातृभाषेतून शिक्षण ही नवीन शिक्षण पद्धती अमलात आणल्याने आता विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण घेणे सोयीचे होणार आहे.  इंजीनियरिंग व मेडिकल मधील विद्यार्थ्यांना त्याचा निश्चितच फायदा होणार असून इंग्रजी भाषेचा आपल्यावर असलेला पगडा देखील हळूहळू कमी होणार असल्याचे मत केसरकर यांनी यावेळी व्यक्त केले. पंतप्रधान मोदींचे भरभरून कौतुक केले.विदेशातील नागरिकांना मातृभाषेवर प्रेम असल्याने अनेक देशांमध्ये स्थानिक मातृभाषेतून शिक्षण घेत असल्याने ही राष्ट्र शिक्षणात व आर्थिक सुबत्त्यात अग्रेसर असल्याचे मत देखील केसरकर यांनी व्यक्त केले.

स्किल डेव्हलपमेंट महत्त्वाचे असून शाळांना सॅटॅलाइटवर जोडण्यात येणार असल्याने आदिवासी व दुर्गम भागातील ऑनलाइन शिक्षण पद्धतीतील अडचणी दूर होणार असून शिक्षकांनी फळ्यावर लिहिलेली अक्षरे विद्यार्थ्यांच्या मोबाईल ॲप वर संग्रहित होणार असल्याची टेक्नॉलॉजी देखील लवकरच राज्यात विकसित करण्यात येणार असल्याचेही यावेळी केसरकर यांनी सांगितले.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर