शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

उड्डाणपुलाचे एकाच दिवसात दोनवेळा उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 00:10 IST

सकाळी ग्रामस्थांनी फोडला नारळ : संध्याकाळी खासदारांच्या हस्ते झाले औपचारिक उद्घाटन

भिवंडी : भिवंडीतील मुंबई-नाशिक महामार्गावरील रांजनोली नाका उड्डाणपुलाचे सोमवारी एकाच दिवशी दोनदा उद्घाटन झाले. सकाळी संतप्त नागरिकांनी जय आगरी सेवा संस्थेचे अध्यक्ष यशवंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली उड्डाणपुलाच्या प्रवेशद्वारांवर नारळ फोडून उद्घाटन केले, तर सायंकाळी ५ वाजता भिवंडीचे खा. कपिल पाटील यांनी त्याच उड्डाणपुलाचे उद्घाटन केले. सकाळीच या उड्डाणपुलाचे उद्घाटन झाल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने अधिकारी व भाजपच्या नेत्यांची पंचाईत झाली.

मुंबई-नाशिक बायपास भिवंडी-कल्याण महामार्गावरील रांजनोली चौकातील पुलाचे उद्घाटन उड्डाणपूल तयार होऊनही गेल्या महिनाभरापासून रखडले होते. निवडणुकीपूर्वी काम पूर्ण होऊनही, केवळ बड्या सत्ताधारी नेत्यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन करण्याचा योग जुळून येत नसल्याने एमएमआरडीएने पूल वाहतुकीकरिता खुला केला नव्हता. त्यामुळे या महामार्गावर वाहतूककोंडीची समस्या जैसे थे होती. भिवंडी पूर्व विधानसभेचे आ. रईस शेख यांच्यासह ग्रामस्थांनी हा उड्डाणपूल तातडीने वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी केली होती. मात्र, त्याकडे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी शासकीय अधिकारी व पोलिसांना कोणतीही माहिती न देता रांजनोली उड्डाणपुलावर जाऊन नारळ फोडून उद्घाटन केल्याचे जाहीर केले. या अनौपचारिक उद्घाटनाची व्हिडीओ क्लिप समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केल्याने तालुक्यात खळबळ माजली. मुंबई-नाशिक महामार्गावरील भिवंडी-रांजनोली चौकात प्रवासी वाहतूककोंडीने हैराण आहेत. एमएमआरडीएने रांजनोली येथील हा उड्डाणपूल उभारण्याचे काम हाती घेतले होते. मात्र, कंत्राटदाराच्या बेफिकिरी व संथगती कारभारामुळे काम वेळेत पूर्ण झाले नाही. त्यामुळे या परिसरात कित्येक महिने मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत होती. आता गेल्या महिनाभराहून अधिक काळ पुलाचे काम पूर्ण होऊनही तो बंद ठेवला होता. त्यामुळे वाहतूककोंडीत अडकणारे प्रवासी प्रशासनाच्या नावाने बोटं मोडत होते.उड्डाणपुलाच्या मागणीसाठी २०१३ पासून स्थानिक नागरिकांनी आंदोलन केले होते. त्यामुळे हा उड्डाणपूल मंजूर झाला. मात्र, कोणत्याही एका नेत्याने या उड्डाणपुलाच्या कामाचे श्रेय घेऊ नये, यासाठी सोमवारी आम्ही या पुलाचे उद्घाटन केले आहे, अशी प्रतिक्रिया जय आगरी सेवा संस्थेचे अध्यक्ष यशवंत पाटील यांनी दिली. येथील नेत्यांना केवळ उद्घाटनाचे नारळ फोडायचीच माहिती आहे, अशी टीकाही पाटील यांनी खा. कपिल पाटील यांचा नामोल्लेख न करता केली.

टॅग्स :bhiwandiभिवंडीthaneठाणे