शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

उल्हासनगरात राष्ट्रवादीतील वाद चव्हाट्यावर; गंगोत्रीने केले आव्हाड व परांजपे यांच्यावर आरोप

By सदानंद नाईक | Updated: May 26, 2023 23:29 IST

गेल्या महापालिका निवडणुकीत कलानी परिवाराने सत्तेसाठी भाजप सोबत घरोबा केल्याने, पक्ष अस्तित्वावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले होते.

उल्हासनगर : राष्ट्रवादी पक्षाचे माजीं सभागृहनेते व प्रदेश सचिव भारत गंगोत्री यांना विश्वासात न घेता, त्यांच्या स्थानिक प्रभागात शनिवारी रात्री पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम कलानी यांनी ठेवला. यावरून गंगोत्री यांनी थेट पक्षनेते जितेंद्र आव्हाड व माजी खासदार आनंद परांजपे यांच्यावर टीकास्त्र सोडल्याने, पक्षातील वाद चव्हाट्यावर आला आहे.

 गेल्या महापालिका निवडणुकीत कलानी परिवाराने सत्तेसाठी भाजप सोबत घरोबा केल्याने, पक्ष अस्तित्वावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले होते. अश्यावेळी भारत गंगोत्री टीमने राष्ट्रवादीचे ४ नगरसेवक निवडून आणून पक्षाचे अस्तित्व महापालिकेत कायम ठेवले. दरम्यान कलानी परिवाराने पुन्हा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. याप्रकारने शहरात कलानी व गंगोत्री असे दोन गट राष्ट्रवादीत पडले. शहरजिल्हाध्यक्ष पंचम कलानी यांनी गंगोत्री यांच्या प्रभागात शनिवारी पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम गंगोत्री यांना विश्वासात न घेता ठेवण्यात आला. असा आरोप गंगोत्री समर्थकांनी केला. तसेच भारत गंगोत्री यांनी प्रसिद्धपत्रक काढून पक्षनेते जितेंद्र आव्हाड व आनंद परांजपे यांच्यावर टीका केली. दोन्ही नेते जिल्हयात पक्ष मजबूत करण्या ऐवजी पक्ष कमकुवत करीत असल्याचा आरोप केल्याने, पक्षातील वाद चव्हाट्यावर आला आहे. 

राष्ट्रवादीच्या पडती काळात शहरात पक्ष वाढविण्याचे काम गंगोत्री गटाने केले. मात्र त्यांनाच अप्रत्यक्षपणे पक्षाचा बाहेरचा रस्ता दाखवीत असल्याचा आरोप गंगोत्री गटाने केला. कलानी सत्तेसाठी पुन्हा भाजप सोबत हातमिळवणी करू शकतो. असा संशयही त्यांनी व्यक्त केला. गंगोत्री यांनी त्यांनी काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात आव्हाड व परांजपे यांच्यावर आरोप केल्याने, पक्ष प्रमुख काय कारवाई करतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले. गंगोत्री यांनी अन्य पक्षात प्रवेश केल्यास, शहर पूर्वेत राष्ट्रवादी कमकुवत होणार असल्याचे बोलले जात आहे. गंगोत्री यांच्यासह समर्थक पक्षप्रमुख शरद पवार यांची भेट घेऊन झालेला प्रकार कानावर घालणार आहेत. तर कलानी समर्थकांनी पक्ष वाढीसाठी शनिवारी पक्षप्रवेश कार्यक्रम ठेवल्याची माहिती दिली. शहरजिल्हाध्यक्ष पंचम कलानी, ओमी कलानी यांच्या सोबत संपर्क केला असता, झाला नाही.

याप्रकरणी शिवराज संजय पाटील (रा. संजोग कॉलनी, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास सर्व संशयित तीन मोटारीतून पाटील यांच्या घरी गेले. तेथे ‘आम्ही एलसीबीचे लोक आहोत’ असे सांगून स्वाती संजय पाटील (वय ५८) यांना जबरस्तीने गाडीत घालून घेऊन गेले. तेथून संशयितांनी त्यांना मिरजेत नेले. तेथे नेऊन त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगली शहर पोलिसांनी सर्व संशयितांना अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्यांना ३० मेपर्यंत पोलिस कोठडी सुनाविण्यात आली आहे. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस