शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

उल्हासनगरात राष्ट्रवादीतील वाद चव्हाट्यावर; गंगोत्रीने केले आव्हाड व परांजपे यांच्यावर आरोप

By सदानंद नाईक | Updated: May 26, 2023 23:29 IST

गेल्या महापालिका निवडणुकीत कलानी परिवाराने सत्तेसाठी भाजप सोबत घरोबा केल्याने, पक्ष अस्तित्वावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले होते.

उल्हासनगर : राष्ट्रवादी पक्षाचे माजीं सभागृहनेते व प्रदेश सचिव भारत गंगोत्री यांना विश्वासात न घेता, त्यांच्या स्थानिक प्रभागात शनिवारी रात्री पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम कलानी यांनी ठेवला. यावरून गंगोत्री यांनी थेट पक्षनेते जितेंद्र आव्हाड व माजी खासदार आनंद परांजपे यांच्यावर टीकास्त्र सोडल्याने, पक्षातील वाद चव्हाट्यावर आला आहे.

 गेल्या महापालिका निवडणुकीत कलानी परिवाराने सत्तेसाठी भाजप सोबत घरोबा केल्याने, पक्ष अस्तित्वावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले होते. अश्यावेळी भारत गंगोत्री टीमने राष्ट्रवादीचे ४ नगरसेवक निवडून आणून पक्षाचे अस्तित्व महापालिकेत कायम ठेवले. दरम्यान कलानी परिवाराने पुन्हा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. याप्रकारने शहरात कलानी व गंगोत्री असे दोन गट राष्ट्रवादीत पडले. शहरजिल्हाध्यक्ष पंचम कलानी यांनी गंगोत्री यांच्या प्रभागात शनिवारी पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम गंगोत्री यांना विश्वासात न घेता ठेवण्यात आला. असा आरोप गंगोत्री समर्थकांनी केला. तसेच भारत गंगोत्री यांनी प्रसिद्धपत्रक काढून पक्षनेते जितेंद्र आव्हाड व आनंद परांजपे यांच्यावर टीका केली. दोन्ही नेते जिल्हयात पक्ष मजबूत करण्या ऐवजी पक्ष कमकुवत करीत असल्याचा आरोप केल्याने, पक्षातील वाद चव्हाट्यावर आला आहे. 

राष्ट्रवादीच्या पडती काळात शहरात पक्ष वाढविण्याचे काम गंगोत्री गटाने केले. मात्र त्यांनाच अप्रत्यक्षपणे पक्षाचा बाहेरचा रस्ता दाखवीत असल्याचा आरोप गंगोत्री गटाने केला. कलानी सत्तेसाठी पुन्हा भाजप सोबत हातमिळवणी करू शकतो. असा संशयही त्यांनी व्यक्त केला. गंगोत्री यांनी त्यांनी काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात आव्हाड व परांजपे यांच्यावर आरोप केल्याने, पक्ष प्रमुख काय कारवाई करतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले. गंगोत्री यांनी अन्य पक्षात प्रवेश केल्यास, शहर पूर्वेत राष्ट्रवादी कमकुवत होणार असल्याचे बोलले जात आहे. गंगोत्री यांच्यासह समर्थक पक्षप्रमुख शरद पवार यांची भेट घेऊन झालेला प्रकार कानावर घालणार आहेत. तर कलानी समर्थकांनी पक्ष वाढीसाठी शनिवारी पक्षप्रवेश कार्यक्रम ठेवल्याची माहिती दिली. शहरजिल्हाध्यक्ष पंचम कलानी, ओमी कलानी यांच्या सोबत संपर्क केला असता, झाला नाही.

याप्रकरणी शिवराज संजय पाटील (रा. संजोग कॉलनी, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास सर्व संशयित तीन मोटारीतून पाटील यांच्या घरी गेले. तेथे ‘आम्ही एलसीबीचे लोक आहोत’ असे सांगून स्वाती संजय पाटील (वय ५८) यांना जबरस्तीने गाडीत घालून घेऊन गेले. तेथून संशयितांनी त्यांना मिरजेत नेले. तेथे नेऊन त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगली शहर पोलिसांनी सर्व संशयितांना अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्यांना ३० मेपर्यंत पोलिस कोठडी सुनाविण्यात आली आहे. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस