शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

उल्हासनगरात शिवसेना ठाकरे गटाच्या होऊ द्या चर्चां कार्यक्रमाला गालबोट

By सदानंद नाईक | Updated: October 7, 2023 17:20 IST

उल्हासनगर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने होऊ द्या चर्चा या कार्यक्रमा अंतर्गत शहरातील विविध चौकात नुक्कड सभा घेऊन सत्ताधारी पक्षाच्या कारभाराचा भांडाफोड करीत होते.

उल्हासनगर : शिवसेना ठाकरे गटाच्या होऊ द्या चर्चा या कार्यक्रमात एका उपस्थित तरुणाने पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात अपशब्द वापरल्याने, भाजप आक्रमक होऊन, गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मध्यवर्ती पोलीस ठाण्यात पक्षाचे जिल्हा समन्वयक धनंजय बोडारे यांच्यासह २७ जणां विरोधात गुन्हा दाखल झाला. तसेच पोलिसांनी पुढील कार्यक्रमाच्या परवानग्या रद्द केल्या आहेत. 

उल्हासनगरशिवसेना ठाकरे गटाच्या वतीने होऊ द्या चर्चा या कार्यक्रमा अंतर्गत शहरातील विविध चौकात नुक्कड सभा घेऊन सत्ताधारी पक्षाच्या कारभाराचा भांडाफोड करीत होते. याप्रकारने नागरिकांत चर्चेला उधाण आले असतांना शुक्रवारी कॅम्प नं-३ येथे झालेल्या होऊ द्या चर्चा या नुक्कड सभेत पंतप्रधान मोदी यांनी तरुणांना नोकऱ्या दिल्या का? असा प्रश्न उपस्थित तरुणांना विचारला. त्यावेळी एका तरुणाने पंतप्रधान मोदी यांच्या बाबत अपशब्द काढले. सादर कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर, पक्ष कार्यकर्त्यांनी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांना याबाबत माहिती दिल्यावर त्यांनी पदाधिकार्यांची बैठक बोलावून, रात्री थेट मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठले.

शिवसेना ठाकरे गटाच्या होऊ द्या चर्चा या नुक्कड सभेच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांच्या बाबत एका तरुणाने अपशब्दाचा वापरल्याने, उपस्थितांनी हसून प्रतिक्रिया दिला. असा आरोप भाजपचे रामचंदानी यांनी केला. या सर्वांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. भाजपच्या शिष्टमंडळात शहर जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, प्रकाश माखिजा, कपिल अडसूळ यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. अखेर रात्री उशिरा कपिल अडसूळ यांच्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक धनंजय बोडारे, शहरप्रमुख रवींद्रसिंग भुल्लर, दिलीप मिश्रा, शिवाजी जावळे, शोभा जाधव यांच्यासह तब्बल २६ जणां विरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकाराने शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसला आहे. 

ही तर हुकूमशाही, कोर्टात जाणार - धनंजय बोडरे (शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक) होऊ द्या चर्चा कार्यक्रमात उपस्थितांना मोदी सरकारने नोकऱ्या दिल्या का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावरील तरुणांच्या प्रतिक्रियेला शिवसेना व पक्षाचे पदाधिकारी जबाबदार नाही. त्यावरून कार्यक्रमाच्या परवानग्या रद्द करून गुन्हे दाखल करणे।म्हणजे ही वाटचाल हुकूमशाहीकडे आहे. लोकशाही धोक्यात आल्याचे संकेत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरNarendra Modiनरेंद्र मोदीShiv Senaशिवसेना