शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

उल्हासनगरात शिवसेना ठाकरे गटाच्या होऊ द्या चर्चां कार्यक्रमाला गालबोट

By सदानंद नाईक | Updated: October 7, 2023 17:20 IST

उल्हासनगर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने होऊ द्या चर्चा या कार्यक्रमा अंतर्गत शहरातील विविध चौकात नुक्कड सभा घेऊन सत्ताधारी पक्षाच्या कारभाराचा भांडाफोड करीत होते.

उल्हासनगर : शिवसेना ठाकरे गटाच्या होऊ द्या चर्चा या कार्यक्रमात एका उपस्थित तरुणाने पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात अपशब्द वापरल्याने, भाजप आक्रमक होऊन, गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मध्यवर्ती पोलीस ठाण्यात पक्षाचे जिल्हा समन्वयक धनंजय बोडारे यांच्यासह २७ जणां विरोधात गुन्हा दाखल झाला. तसेच पोलिसांनी पुढील कार्यक्रमाच्या परवानग्या रद्द केल्या आहेत. 

उल्हासनगरशिवसेना ठाकरे गटाच्या वतीने होऊ द्या चर्चा या कार्यक्रमा अंतर्गत शहरातील विविध चौकात नुक्कड सभा घेऊन सत्ताधारी पक्षाच्या कारभाराचा भांडाफोड करीत होते. याप्रकारने नागरिकांत चर्चेला उधाण आले असतांना शुक्रवारी कॅम्प नं-३ येथे झालेल्या होऊ द्या चर्चा या नुक्कड सभेत पंतप्रधान मोदी यांनी तरुणांना नोकऱ्या दिल्या का? असा प्रश्न उपस्थित तरुणांना विचारला. त्यावेळी एका तरुणाने पंतप्रधान मोदी यांच्या बाबत अपशब्द काढले. सादर कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर, पक्ष कार्यकर्त्यांनी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांना याबाबत माहिती दिल्यावर त्यांनी पदाधिकार्यांची बैठक बोलावून, रात्री थेट मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठले.

शिवसेना ठाकरे गटाच्या होऊ द्या चर्चा या नुक्कड सभेच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांच्या बाबत एका तरुणाने अपशब्दाचा वापरल्याने, उपस्थितांनी हसून प्रतिक्रिया दिला. असा आरोप भाजपचे रामचंदानी यांनी केला. या सर्वांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. भाजपच्या शिष्टमंडळात शहर जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, प्रकाश माखिजा, कपिल अडसूळ यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. अखेर रात्री उशिरा कपिल अडसूळ यांच्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक धनंजय बोडारे, शहरप्रमुख रवींद्रसिंग भुल्लर, दिलीप मिश्रा, शिवाजी जावळे, शोभा जाधव यांच्यासह तब्बल २६ जणां विरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकाराने शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसला आहे. 

ही तर हुकूमशाही, कोर्टात जाणार - धनंजय बोडरे (शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक) होऊ द्या चर्चा कार्यक्रमात उपस्थितांना मोदी सरकारने नोकऱ्या दिल्या का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावरील तरुणांच्या प्रतिक्रियेला शिवसेना व पक्षाचे पदाधिकारी जबाबदार नाही. त्यावरून कार्यक्रमाच्या परवानग्या रद्द करून गुन्हे दाखल करणे।म्हणजे ही वाटचाल हुकूमशाहीकडे आहे. लोकशाही धोक्यात आल्याचे संकेत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरNarendra Modiनरेंद्र मोदीShiv Senaशिवसेना