शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

उल्हासनगरात रस्ते दुरुस्ती जोरात, रस्ते चकाचक

By सदानंद नाईक | Updated: November 14, 2022 19:18 IST

मनसेने प्रश्नचिन्हे उपस्थित केल्यानंतर कामाला वेग

सदानंद नाईक, उल्हासनगर: शहरातील रस्ते दुरुस्तीवर मनसेने प्रश्नचिन्हे उभे करून डांबरी रस्त्यात डांबर वापरत नसल्याचा प्रकार उघड केला होता. त्यानंतर रस्ते दुरुस्तीला वेग आला असून रस्ते चकाचक झाल्याचे चित्र शहरात आहे. उल्हासनगर महापालिकेने पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीसाठी ८ कोटीची तरतूद केली होती. मात्र पावसाळ्या पूर्वी काही अपवाद सोडल्यास रस्ता दुरुस्ती व रस्त्यातील खड्डेच भरले नव्हते.

परिणामी पावसाळ्यात रस्त्यात खड्डेच खड्डे झाले. रस्त्याच्या दुरावस्था बाबत सर्वत्र ओरड झाल्यावर महापालिकेने रेती, दगड व सिमेंट मिक्सर करून रस्त्यातील खड्डे भरण्याचा केवलवाणा प्रयत्न केला. मात्र दिवाळी दरम्यान पावसाने पूर्णतः विश्रांती घेतल्यावरही महापालिकेने रस्ता दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरण्यास सुरवात केली नाही. मात्र काही ठिकाणी मात्र डांबरीकरण झाले होते. मात्र त्यामध्ये डांबरीकरण झालेल्या रस्त्यात डांबर नसल्याने रस्ता हाताने उखळला जात असल्याचा प्रकार मनसेचे शहाराध्यक्ष बंडू देशमुख यांनी उघड केला. तसेच रस्त्यातील डांबर चोरीला गेल्याचे निवेदन सहायक पोलिस आयुक्त मोतीचंद राठोड यांना देऊन खळबळ उडून दिली.

अखेर महापालिका सार्वजनिक विभागाने गेल्या तीन दिवसांपासून रस्ता दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली. गेल्या तीन दिवसात रस्ते चकाचक झाल्याचे चित्र शहरात असून रस्ता दुरुस्ती कोणत्या निधीतून करण्यात आली. असा प्रश्न नागरिकांना पडला. शहर पूर्वेतील रस्ते दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरण्याचे काम प्रगती पथावर तर शहर पश्चिम मधील रस्त्याचे काम पूर्ण झाल्याचे परिपत्रक महापालिका बांधकाम विभागाने काढण्यात आले. याबाबत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत साळुंके यांना याबाबत संपर्क केला असता झाला नाही.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरroad safetyरस्ते सुरक्षाMNSमनसे