शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

उल्हासनगर महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांत गटबाजी, यांची उचलबांगडी करा - भारत गंगोत्री

By सदानंद नाईक | Updated: August 28, 2023 17:12 IST

ठाण मांडून बसलेल्या अश्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे भारत गंगोत्री राज्य शासनाकडे करणार आहेत.

उल्हासनगर : महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांत गतबाजीला ऊत आल्याने, कंत्राटी कामगाराच्या वेतनावर ठेकेदाराला डल्ला, सुरक्षा रक्षकांनी गेल्या तीन वर्षात एकही सुट्टी न घेणे, बोगस कर्मचारी, रस्त्याची दुरावस्था आदी असंख्य समस्या उभ्या ठाकल्या आहेत. ठाण मांडून बसलेल्या अश्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे भारत गंगोत्री राज्य शासनाकडे करणार आहेत.

 उल्हासनगर महापालिकेत गेल्या काही महिन्यांपासून गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याने, मूलभूत सुखसुविधाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकून ८३ सुरक्षा रक्षकांनी एकही दिवस सुट्टी घेतली नसल्याचा प्रकार उघड झाला आहे. एका सुरक्षा रक्षकाने लग्न असतानाही त्याला महापालिका सेवेत हजर दाखविण्यात आले. तर अनेक जणांनी तीन वर्षात रुग्णालयात उपचार घेऊनही आल्यावरही कामावर हजर असल्याची नोंद आहे. हे कमी म्हणून की काय, नगररचनाकार विभागात वर्षानुवर्षे बोगस कर्मचारी काम करीत असल्याचे उघड झाले. रस्ता बांधणी, कोट्यवधींकिमतीचे साहित्य खरेदी करूनही, महापालिका रुग्णालयाचे खाजगीकरण, रस्त्याची दुरावस्था, महापालिका शाळा मैदानावर खाजगी संस्थेला दिलेली सनद, शहरातील खुल्या व विविध शासकीय कार्यालयाच्या जागेवर सनद, आरसीसीची अवैध बहुमजली बांधकामे, पाणी टंचाई, डम्पिंगचा प्रश्न आदी असंख्य समस्या उभ्या ठाकल्या असतांना प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांच्या गटबाजी निर्माण झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे गंगोत्री यांनी केला आहे.

 महापालिकेत प्रशासकीत राजवट असल्याने, माजी नगरसेवक, सतर्क नागरिक महापालिका मुख्यालयात जाऊन विकास कामाचा जाब विचारात नसल्याने, प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले. दरम्यान अधिकाऱ्यांत गटबाजी निर्माण होऊन कर्मचाऱ्यांची विभागणी अधिकाऱ्यांत होऊ लागल्याने, महापालिकेत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यातूनच चलती है क्या बाहेर? असे प्रकार घडत आहेत. एकूणच महापालिकेचा कारभार पूर्वपदावर आणण्यासाठी प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी करून, त्याजागी नवीन अधिकारी पाठविण्याची मागणी राज्य शासनाकडे करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे भारत गंगोत्री यांनी दिली आहे. प्रतिनियुक्तीचा काळ संपूनही ठाण -महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेल्या अनेक अधिकाऱ्याचा प्रतिनियुक्तीचा कालावधी संपूनही ठाण मांडून बसले आहे. प्रतिनियुक्तीचा कालावधी वाढविण्यासाठी अनेक अधिकारी मंत्रालयाचे व नेत्यांचे उंबरठे झिजवीत आहेत. काही अधिकारी यामध्ये यशस्वी झाले असून त्यांनी चिरीमिरी दिल्यानेच, त्यांचा प्रतिनियुक्तीचा कालावधी वाढविल्याने बोलले जात आहेत. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरUlhasnagar Municipal Corporation Electionउल्हासनगर महानगरपालिका निवडणुक 2022