शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

उल्हासनगरातील कल्याण-अंबरनाथ रस्ता रुंदीकरणात १६ बांधकामाचा खोडा दुकानदारांची पर्यायी जागेची मागणी 

By सदानंद नाईक | Updated: December 12, 2023 16:53 IST

उल्हासनगर महापालिकेने सन-२०१५ मध्ये कल्याण-अंबरनाथ रस्त्याचे १०० फुटी रुंदीकरण केले आहे.

उल्हासनगर : शहरातील कल्याण ते अंबरनाथ रस्त्याचे १०० फूटी रुंदीकरण होऊन रस्त्याची बांधणी झाली. मात्र पर्यायी जागेच्या मागणीसाठी न्यायालयात घाव घेतलेले १६ दुकाने रस्त्यात खोडा बनल्या असून रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न अध्यापही टांगला गेला आहे. 

उल्हासनगर महापालिकेने सन-२०१५ मध्ये कल्याण-अंबरनाथ रस्त्याचे १०० फुटी रुंदीकरण केले आहे. यामध्ये ९०० पेक्षा जास्त दुकाने व घरे बाधित झाले. तर काही दुकाने पूर्णतः बाधित झाले. यापैकी १६ दुकानदारांनी पर्यायी जागेची मागणी करीत न्यायालयात धाव घेतल्याने, या दुकानावर महापालिकेने पाडकाम कारवाई केली नाही?. तेंव्हा पासून या बांधकामाचा प्रश्न सुटला नाही. तत्कालीन आयुक्तांनी या दुकानदारा सोबत अनेकदा वाटाघाटी केल्या. मात्र त्या निष्फळ ठरल्या आहेत. या १६ बांधकामा बाबत तोडगा न निघाल्याने, ही बांधकामे रस्त्यातील खोडा बनून राहिली आहेत. रस्त्यातील अपघातास ही बांधकामे कारणीभूत ठरू शकतात. अशी शक्यता व्यक्त होत आहे.

शहरातील कल्याण-अंबरनाथ रस्त्याचे रुंदीकरण होऊन त्यानंतर रस्त्याची बांधणी झाली. तसेच रस्त्याच्यावर ५०० कोटी पेक्षा जास्त निधीतून उड्डाणफुल बांधण्याचा प्रस्ताव शासनाकडे पडून आहे. मात्र गेल्या ८ वर्षांपासून रस्त्यात खोडा ठरलेल्या १६ बांधकामाबाबत तोडगा निघत नसल्याने, सर्वस्तरातून टीकेची झोळ उठली आहे. महापालिका अधिकारी, स्थानिक नेत्यांनी या १६ दुकानदाराबाबत तोडगा काढवा, नाहीतर शासन दरबारी हा प्रश्न लावून धरावा. अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे. रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या दुकानदारांना कॅम्प नं-३ येथील इंदिरा गांधी भाजी मंडई ठिकाणी इमारत बांधून २०० फुटाचा पर्यायी गाळा बांधून देण्याचे आश्वासन महापालिकेच्या महासभेत विविध पक्षाच्या नगरसेवकांनी दिले होते. ते आश्वासन फक्त आश्वासन राहिले आहे.

दुकानाची प्रश्न न्यायालयात प्रलंबित...अतिक्रमण विभाग प्रमुख गणेश शिंपी

सन-२०१५ साली कल्याण-अंबरनाथ रस्त्याचे १०० फुटी रुंदीकरण झाले असून यामध्ये ८५० पेक्षा जास्त दुकाने व घरे बाधित झाले. त्यापैकी १६ दुकानदारांनी न्यायालयात धाव घेऊन पर्यायी जागेची मागणी केली. मात्र बांधकामे अवैध असल्याने, पर्यायी जागा देता येत नाही. त्यामुळे याबाबत तोडगा निघाला नसून प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरkalyanकल्याण