शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

उल्हासनगरात समोसाचे पीठ पायाने मळणाऱ्या दुकानावर कारवाईची बडगा 

By सदानंद नाईक | Updated: March 5, 2024 20:12 IST

शहरपूर्व आशाळेगाव येथील एका मिठाईच्या दुकानात समोशा व कचोरीचे पीठ पायाने मळण्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

उल्हासनगर: शहरपूर्व आशाळेगाव येथील एका मिठाईच्या दुकानात समोशा व कचोरीचे पीठ पायाने मळण्याचा व्हिडीओ व्हायरल होताच, संतप्त नागरिकांनी दुकानाला घेराव घालून समोशे फेकून दिले होते. मंगळवारी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने दुकानाची पाहणी केल्याने, दुकानावर कारवाईची शक्यता व्यक्त होत आहे.

उल्हासनगर पूर्वेतील आशेळेगाव येथील १५ ते २० वर्ष जुने हरिओम मिठाईच्या दुकानात समोशे व कचोरीचे पीठ पायाने मळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. व्हायरल व्हिडीओ बघून परिसरातील संतप्त नागरिकांनी दुकानाच्या दिशेने धाव घेऊन दुकांनदाराला जाब विचारून कारवाईची मागणी विठ्ठलवाडी पोलिसांकडे केली. तसेच नागरिकांनी दुकानातील समोसा, बजे, कचोरी रस्त्यावर फेकून दिली. 

दरम्यान घटनेचे गांभीर्य बघून विठ्ठलवाडी पोलिसांनी झालेला प्रकार अन्न व औषध प्रशासन विभागाला दिली. परिसरातील संतप्त झालेल्या नागरिकामुळे दुकानदाराने सोमवार रात्री पासून बंद केले. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने मंगळवारी आशेळेगाव येथील हरिओम मिठाईच्या दुकानाची पाहणी करून विभागा अंतर्गत कारवाई करण्याचे संकेत दिले. अन्न व औषध प्रशासन विभागाने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली नसल्याने, दुकानावर विभागा अंतर्गत कारवाई होण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली आहे. सोमवार रात्री पासून दुकान बंद असून परिसरातून मिठाईचे दुकान हलविण्याची व त्यावर करवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत. अधिक तपास अन्न व औषध प्रशासन विभाग करीत आहेत. 

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगर