शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

भिवंडी मनपाच्या शाळांमध्ये मुलभूत सोयीसुविधांची वानवा; अधिवेशनात आमदारांनी वेधले सभागृहाचे लक्ष  

By नितीन पंडित | Updated: December 28, 2022 18:13 IST

भिवंडी मनपाच्या शाळांमध्ये मुलभूत सोयीसुविधांसाठी अधिवेशनात आमदारांनी सर्वांचे लक्ष वेधले.  

भिवंडी : भिवंडी मनपाच्या शाळांची सध्या प्रचंड दुरावस्था झाली असून या शाळांच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनासह महापालिकेने लक्ष द्यावे यासंदर्भात भिवंडी पूर्वचे सपा आमदार रईस शेख यांनी बुधवारी राज्याच्या हिवाळी अधिवेशनात सभागृहाचे लक्ष वेधले. शहरात मनपाच्या ४९ शाळा चालवल्या जात असून सदर शाळांमध्ये एकूण २८,००० विदयार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र या शाळांची स्थिती अत्यंत दयनीय व धोकादायक स्थितीत आहे. सन २०२१-२०२२ माध्यम निहाय संच मान्यतेनूसार ११२ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. तसेच शालेय विदयार्थ्यांना शालेय गणवेश, पुस्तके पुरविले जात नाहीत, शौचालय, पाणी, वीज यांसारख्या मुलभूत सुविधांची वानवा मोठ्या प्रमाणावर आहे.

या शाळांच्या डागडुजी व दुरूस्तीकरीता ३० कोटी रुपयांचा निधीचा प्रस्ताव मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे प्रलंबित आहे. तसेच संच मान्यतेनूसार शिक्षकांच्या जागा रिक्त असूनसुद्धा शासन परवानगीविना जिल्हा बदलीचे आदेश देण्यास मनाई असताना नियमबाहय पद्धतीने शिक्षकांची जिल्हा बदली करण्यात येते. त्यामुळे महागनरपालिकेच्या शाळांमध्ये रिक्त शिक्षकांची संख्या वाढल्याने शिक्षणाचा दर्जा खालावून गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून विदयार्थी वंचित राहत आहेत. त्यामुळे विदयार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. तसेच मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षणाच्या अर्थसंकल्पानुसार भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेने शिक्षणासाठी अर्थसंकल्पाची तरतूद करण्यात यावी अशी मागणी आमदार रईस शेख यांनी सभागृहात केली.

आमदार शेख यांच्या लक्षवेधी सुचेनेला शालेय शिक्षण मंत्री यांनी उत्तर देत शेख यांच्या मागण्या मान्य केल्या असून शाळांच्या डागडुजी व दुरूस्तीकरीता ३० कोटी रुपयांचा निधीचा प्रस्ताव मुख्यमंत्री यांनी जिल्हा नियोजन समितीकडे पाठवायला सांगितले असून रिक्त शिक्षकांची भरती लवकरच सुरू करण्यात येणार असून मुंबईत अतिरिक्त शिक्षक असून त्यामधील उर्दू आणि मराठीचे शिक्षकांना भिवंडी मनपाच्या शाळांमध्ये रुजू होण्याकरिता शिक्षकांना सूचना दिल्या जातील व एक महिन्यात याबाबत कार्यवाही केली जाईल असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्र्यांनी आपल्या प्रश्नांना उत्तर केतांना म्हटले असल्याची माहिती आमदार रईस शेख यांनी दिली आहे.

  

 

टॅग्स :thaneठाणेBhiwandiभिवंडी