शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

हलगर्जीपणा करणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करा; उध्दव सेनेची मागणी

By अजित मांडके | Updated: July 9, 2024 16:30 IST

कळवा रुग्णालय बालके मृत्यू प्रकरण.

अजित मांडके, ठाणे :ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मागील महिनाभरात याच रुग्णालयात नवजात २१ बालके दगावल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या कारभाराबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले असतांनाच मंगळवारी उध्दव सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेऊन याचा जाब विचारला. ज्यांच्या गलथान कारभारामुळे ही घटना घडली आहे, त्या अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस यांना निलंबित करण्याची मागणी यावेळी जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी केली.महापालिकेच्या छपत्रती शिवाजी महाराज रुग्णालयात जून महिन्यात तब्बल २१ नवजात बालकांचा मृत्यु झाला आहे. या प्रकरणाचा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यानुसार पुढील कारवाई निश्चित करण्यात आली आहे. परंतु मृत्यु पावलेल्या नवजात बालकांचे वजन हे दिड किलो पेक्षा कमी असल्याचे निर्दशनास आले आहे. 

दरम्यान, या घटनेची दखल घेत मंगळवारी उध्दव सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कळवा रुग्णालयात धडक दिली. यावेळी त्यांनी रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठाता डॉ. राकेश बारोट, वैद्यकिय अधिक्षक डॉ. अनिरुध्द माळगावकर यांच्या सोबत चर्चा करतांना दोषींवर निलंबनाची कारवाईची मागणी केली. वारंवार मृत्यु होण्याची कारण काय? रुग्णालयावरील ताण कमी करण्यासाठी काय उपाय योजना केल्या जातात, खाजगी संस्थांच्या माध्यमातून रुग्णालयाचा कारभार कशासाठी चालविला जातो, रुग्ण संख्या वाढत असतांना रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा सज्ज असते का? असे अनेक सवाल यावेळी उपस्थित करण्यात आले आहेत. औषधांचा देखील रुग्णालयात तुटवडा असल्याचे त्यांनी निर्दशनास आणले. 

रुग्णालयात मोफत तपासण्या केल्या जात असतील त्याचे फलक रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर लावणे अपेक्षित आहे. रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत असेल तर जे चॅरीटीवर रुग्णालये सुरु आहेत, त्यांच्याकडे रुग्णांना पाठविण्याची व्यवस्था करण्यात यावी अशा विविध स्वरुपाच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या. यापुढे अशा प्रकारच्या तक्रारी येणार नाहीत, याची काळजी घेतली जावी, परंतु भविष्यात अशा तक्रारी आल्या तर पक्षाच्या वतीने कठोर पावले उचलली जातील असा इशाराही यावेळी दिघे यांनी दिला.

टॅग्स :thaneठाणेhospitalहॉस्पिटल