शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या दिड महिन्यातच भंडार्लीचा कचरा प्रकल्प पडला बंद, प्लान्टमध्ये पाणी शिरले, मशीनमध्ये साड्या, गाद्यांचा लोड

By अजित मांडके | Updated: September 15, 2022 17:51 IST

ठाणे  महापालिकेच्या माध्यमातून भंडार्ली येथे कचऱ्यावर शास्त्रोक्तपध्दतीने प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने पावले उचलली. त्यानुसार जानेवारी महिन्यात येथील प्रकल्प सुरु होईल असा दावा पालिकेकडून करण्यात आला होता.

ठाणे : भंडार्ली येथील कचऱ्यावर दिड महिन्यांपूर्वी प्रक्रिया सुरु करण्यात आल्याचा दावा पालिकेने केला आहे. परंतु पावसाळ्यात प्लान्टमध्ये पाणी शिरल्याने आणि मशिनमध्ये साड्या, गाड्या, फर्निचरचे साहित्य अडकत असल्याने दोनही मशीन बंद पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा प्रकल्प ७ सप्टेंबर पासून बंद करण्यात आला असून पुन्हा कचरा दिवा डम्पींगवर टाकला जात आहे. मात्र येत्या २ ऑक्टोबर पासून दिव्याचे डम्पींग कायमचे बंद करण्याचा दावा पालिकेने केला आहे.  

  ठाणे  महापालिकेच्या माध्यमातून भंडार्ली येथे कचऱ्यावर शास्त्रोक्तपध्दतीने प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने पावले उचलली. त्यानुसार जानेवारी महिन्यात येथील प्रकल्प सुरु होईल असा दावा पालिकेकडून करण्यात आला होता. त्यानंतर साधारणपणो दिड महिन्यापूर्वी येथे ६०० मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया सुरु करण्यात आल्याचा दावा पालिकेच्या घनकचरा विभागाने केला आहे. उर्वरीत ३०० मेट्रीक टन कचरा हा दिवा डम्पींगवरच टाकला जात होता असेही पालिकेने स्पष्ट केले आहे. परंतु मधल्या काळात झालेल्या धुवाधार पावसामुळे त्याचा परिणाम येथील प्रकल्पावर झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच या ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी दोन मशिन असून या मशिनमध्ये कचऱ्या  ऐवजी साडय़ा, गाद्या, फर्निचर आदींसह इतर वस्तु अधिक प्रमाणात येत होत्या. त्या मशिनमध्ये अकडून मशिन वारंवार बंद पडत होत्या. त्यातही प्लान्टमध्ये पाणी शिरल्याने त्याचा परिणाम देखील या प्रकल्पावर झाला. याशिवाय पावसामुळे येथील जोड रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे वाहने जाणो देखील मुकि झाल्याने अखेर ७ सप्टेंबर पासून येथे कचरा टाकणो किंबहुना हा प्रकल्प बंद करण्यात आल्याची माहिती घनकचरा विभागाने दिली.  

२ ऑक्टोबर पासून दिव्याचे डम्पींग होणार बंदएकीकडे या प्रकल्पात आजही अडचणी असल्याचे दिसत आहे. याठिकाणी संपूर्ण क्षमतेने कचऱ्यावर प्रक्रिया होत नाही. मुंब्रा आणि दिव्याचा ३०० मेट्रीक टन कचरा आजही या प्रकल्पाच्या ठिकाणी जात नसल्याची बाबही समोर आली आहे. यामध्ये अडचणी असल्याने येथील कचरा भंडार्लीला नेता येत नसल्याचे पालिकेचे म्हणने आहे. याठिकाणी आवश्यक असलेले १० चाकी मोठे डम्पंर (आयवा वाहने) जात नाहीत, येथील रस्ता देखील अरुंद असल्याने वाहनांची ये जा करणो शक्य नाही. तसेच प्रोसेसींगची सुविधा व इतर सुविधा उपलब्ध नसल्याने येथील कचरा आजही दिव्याच्या डम्पींगवर टाकला जात आहे. परंतु आता येत्या २ ऑक्टोबर पासून दिव्याचे डम्पींग बंद करण्याचा दावा पालिकेने केला आहे.

मुंब्रा, दिव्याचा कचऱ्याला दिली जाणार तात्पुरती पर्यायी जागामुंब्रा, दिव्यातील 3क्क् मेट्रीक टन कचऱ्यासाठी आता पालिकेने दोन पर्याय पुढे आणले आहेत. त्यामध्ये मुंब्य्रातील कचरा आता एमएम व्हॅली येथील पालिकेच्या आरक्षित भुखंडावर तर दिव्यातील कचरा हा डावले येथील शासकीय भुखंडावर टाकला जाणार आहे. येत्या २८ सप्टेंबर र्पयत हे दोन्ही तात्पुरत्या स्वरुपातील प्रकल्प सुरु होणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. याठिकाणी गोळा होणारा कचरा पुढे भंडार्लीला नेला जाणार असून २ ऑक्टोबर पासून पूर्ण क्षमतेने येथील प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे.

दिव्याची कचऱ्याची समस्या येत्या २ऑक्टोबर पासून कायमची सुटणार आहे. भंडार्ली येथील प्रकल्प याच दिवसापासून पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार आहे. त्यासाठीच पालिकेने मुंब्रा आणि दिव्यात तात्पुरत्या स्वरुपातील कचरा डम्प करण्यासाठी जागा शोधल्या आहेत.(मनीष जोशी - उपायुक्त, घनकचरा विभाग, ठामपा) 

टॅग्स :thaneठाणे