शहरं
Join us  
Trending Stories
1
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
2
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
3
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
4
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
7
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
8
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
9
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
10
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
11
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
12
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
13
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
14
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
15
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
16
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
17
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
18
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
19
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
20
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

झारखंड येथील सम्मेतशिखर येथील जैनतीर्थं क्षेत्रास पर्यटन स्थळ घोषित; भिवंडीत हजारो जैन धर्मीय रस्त्यावर

By नितीन पंडित | Updated: January 2, 2023 19:37 IST

झारखंड येथील सम्मेतशिखर येथील जैनतीर्थं क्षेत्रास पर्यटन स्थळ घोषित केल्याने त्या स्थळाचे पावित्र्य धोक्यात येणार असून त्या विरोधात संपूर्ण देशभरातील जैन धर्मीय संतप्त झाले असून याठिकाणी घोषित केलेले पर्यटन क्षेत्र तात्काळ रद्द करून जैनतीर्थं क्षेत्र घोषित करावे.

भिवंडी - झारखंड येथील सम्मेतशिखर येथील जैनतीर्थं क्षेत्रास पर्यटन स्थळ घोषित केल्याने त्या स्थळाचे पावित्र्य धोक्यात येणार असून त्या विरोधात संपूर्ण देशभरातील जैन धर्मीय संतप्त झाले असून, याठिकाणी घोषित केलेले पर्यटन क्षेत्र तात्काळ रद्द करून जैनतीर्थं क्षेत्र घोषित करावे. यासाठी भिवंडीत श्री समस्त जैन महासंघ यांच्या नेतृत्वाखाली हजारो जैन धर्मीय स्त्री पुरुष यांनी सोमवारी विराट मोर्चा काढून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.श्री समस्त जैन महासंघ भिवंडी यांच्या नेतृत्वाखाली अंजुरफाटा येथून निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व आचार्य पुण्यरत्न सुरी महाराज,आचार्य यशोरत्न सुरी महाराज,आचार्य अक्षय बोधी सुरी महाराज,मुनिराज विनम्र सागर विजयजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या मोर्च्या मध्ये हजारोच्या संख्येने जैन स्त्री पुरुष युवक युवती सहभागी झाले होते.

जैन धर्मीयांसाठी पवित्र भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सम्मेतशिखर,झारखंड येथील क्षेत्र पर्यटन क्षेत्र म्हणून घोषणा केली असून पालिताना येथील गिरीराज क्षेत्र येथील जैन तिर्थस्थळ असलेल्या ठिकाणी धार्मिक विद्वेष पसरविण्याचे काम केले जात आहे .त्या विरोधात संपूर्ण देश भरातून जैन धर्मीयांमधून संताप व्यक्त केला जात आहे.सदर तीर्थ क्षेत्राला पर्यटन स्थळ म्हणून घोषित केल्यास त्यामुळे सदर तीर्थस्थळावर मांस मदिरा आणि इतर बरेच गैर व्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळे जैन धर्मियांमध्ये रोष निर्माण होत आहे.

त्यामुळे जैन लोकांच्या धार्मिक आस्थेला मोठा आघात झालेला आहे. त्यामुळे जैन धर्माच्या आस्थेला पवित्र स्थळ सम्मेतशिखरजी ला पर्यटन स्थळ घोषित करू नयेत आणि या पुढे देखिल कोणत्याही धार्मिक स्थळ यांना पर्यटन स्थळ घोषित करण्यात येवु नये अशी मागणी आचार्य अक्षयबोधी सुरीश्वरजी महाराज यांनी केली आहे .उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालया समोर आंदोलक आल्या नंतर तहसीलदार अधिक पाटील यांना आपल्या तीव्र भावना व्यक्त करणारे निवेदन श्री समस्त जैन महासंघ भिवंडी चे अध्यक्ष मिठालाल जैन,अशोक जैन व इतर पदाधिकारी यांनी निवेदन दिले.

सरकारचे हे कृत्य समस्त जैन धर्मीय कदापि खपवून घेणार नाही असा इशारा मुनिराज विनम्र सागर विजयजी यांनी देत,या अन्याया विरोधात जैन समाज रस्त्यावर उतरला आहे ,जर हाच समाज बँकेत गेला तर सर्व अर्थ व्यवस्था हादरवून ठेवू शकतो असा गर्भित इशारा मुनिराज विनम्र सागर विजयजी यांनी दिला

टॅग्स :thaneठाणे