शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

झारखंड येथील सम्मेतशिखर येथील जैनतीर्थं क्षेत्रास पर्यटन स्थळ घोषित; भिवंडीत हजारो जैन धर्मीय रस्त्यावर

By नितीन पंडित | Updated: January 2, 2023 19:37 IST

झारखंड येथील सम्मेतशिखर येथील जैनतीर्थं क्षेत्रास पर्यटन स्थळ घोषित केल्याने त्या स्थळाचे पावित्र्य धोक्यात येणार असून त्या विरोधात संपूर्ण देशभरातील जैन धर्मीय संतप्त झाले असून याठिकाणी घोषित केलेले पर्यटन क्षेत्र तात्काळ रद्द करून जैनतीर्थं क्षेत्र घोषित करावे.

भिवंडी - झारखंड येथील सम्मेतशिखर येथील जैनतीर्थं क्षेत्रास पर्यटन स्थळ घोषित केल्याने त्या स्थळाचे पावित्र्य धोक्यात येणार असून त्या विरोधात संपूर्ण देशभरातील जैन धर्मीय संतप्त झाले असून, याठिकाणी घोषित केलेले पर्यटन क्षेत्र तात्काळ रद्द करून जैनतीर्थं क्षेत्र घोषित करावे. यासाठी भिवंडीत श्री समस्त जैन महासंघ यांच्या नेतृत्वाखाली हजारो जैन धर्मीय स्त्री पुरुष यांनी सोमवारी विराट मोर्चा काढून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.श्री समस्त जैन महासंघ भिवंडी यांच्या नेतृत्वाखाली अंजुरफाटा येथून निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व आचार्य पुण्यरत्न सुरी महाराज,आचार्य यशोरत्न सुरी महाराज,आचार्य अक्षय बोधी सुरी महाराज,मुनिराज विनम्र सागर विजयजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या मोर्च्या मध्ये हजारोच्या संख्येने जैन स्त्री पुरुष युवक युवती सहभागी झाले होते.

जैन धर्मीयांसाठी पवित्र भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सम्मेतशिखर,झारखंड येथील क्षेत्र पर्यटन क्षेत्र म्हणून घोषणा केली असून पालिताना येथील गिरीराज क्षेत्र येथील जैन तिर्थस्थळ असलेल्या ठिकाणी धार्मिक विद्वेष पसरविण्याचे काम केले जात आहे .त्या विरोधात संपूर्ण देश भरातून जैन धर्मीयांमधून संताप व्यक्त केला जात आहे.सदर तीर्थ क्षेत्राला पर्यटन स्थळ म्हणून घोषित केल्यास त्यामुळे सदर तीर्थस्थळावर मांस मदिरा आणि इतर बरेच गैर व्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळे जैन धर्मियांमध्ये रोष निर्माण होत आहे.

त्यामुळे जैन लोकांच्या धार्मिक आस्थेला मोठा आघात झालेला आहे. त्यामुळे जैन धर्माच्या आस्थेला पवित्र स्थळ सम्मेतशिखरजी ला पर्यटन स्थळ घोषित करू नयेत आणि या पुढे देखिल कोणत्याही धार्मिक स्थळ यांना पर्यटन स्थळ घोषित करण्यात येवु नये अशी मागणी आचार्य अक्षयबोधी सुरीश्वरजी महाराज यांनी केली आहे .उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालया समोर आंदोलक आल्या नंतर तहसीलदार अधिक पाटील यांना आपल्या तीव्र भावना व्यक्त करणारे निवेदन श्री समस्त जैन महासंघ भिवंडी चे अध्यक्ष मिठालाल जैन,अशोक जैन व इतर पदाधिकारी यांनी निवेदन दिले.

सरकारचे हे कृत्य समस्त जैन धर्मीय कदापि खपवून घेणार नाही असा इशारा मुनिराज विनम्र सागर विजयजी यांनी देत,या अन्याया विरोधात जैन समाज रस्त्यावर उतरला आहे ,जर हाच समाज बँकेत गेला तर सर्व अर्थ व्यवस्था हादरवून ठेवू शकतो असा गर्भित इशारा मुनिराज विनम्र सागर विजयजी यांनी दिला

टॅग्स :thaneठाणे