शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
4
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
5
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
6
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
7
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
8
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
9
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
10
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
11
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
12
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
13
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
14
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
15
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
16
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
17
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
18
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
19
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
20
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू

झारखंड येथील सम्मेतशिखर येथील जैनतीर्थं क्षेत्रास पर्यटन स्थळ घोषित; भिवंडीत हजारो जैन धर्मीय रस्त्यावर

By नितीन पंडित | Updated: January 2, 2023 19:37 IST

झारखंड येथील सम्मेतशिखर येथील जैनतीर्थं क्षेत्रास पर्यटन स्थळ घोषित केल्याने त्या स्थळाचे पावित्र्य धोक्यात येणार असून त्या विरोधात संपूर्ण देशभरातील जैन धर्मीय संतप्त झाले असून याठिकाणी घोषित केलेले पर्यटन क्षेत्र तात्काळ रद्द करून जैनतीर्थं क्षेत्र घोषित करावे.

भिवंडी - झारखंड येथील सम्मेतशिखर येथील जैनतीर्थं क्षेत्रास पर्यटन स्थळ घोषित केल्याने त्या स्थळाचे पावित्र्य धोक्यात येणार असून त्या विरोधात संपूर्ण देशभरातील जैन धर्मीय संतप्त झाले असून, याठिकाणी घोषित केलेले पर्यटन क्षेत्र तात्काळ रद्द करून जैनतीर्थं क्षेत्र घोषित करावे. यासाठी भिवंडीत श्री समस्त जैन महासंघ यांच्या नेतृत्वाखाली हजारो जैन धर्मीय स्त्री पुरुष यांनी सोमवारी विराट मोर्चा काढून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.श्री समस्त जैन महासंघ भिवंडी यांच्या नेतृत्वाखाली अंजुरफाटा येथून निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व आचार्य पुण्यरत्न सुरी महाराज,आचार्य यशोरत्न सुरी महाराज,आचार्य अक्षय बोधी सुरी महाराज,मुनिराज विनम्र सागर विजयजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या मोर्च्या मध्ये हजारोच्या संख्येने जैन स्त्री पुरुष युवक युवती सहभागी झाले होते.

जैन धर्मीयांसाठी पवित्र भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सम्मेतशिखर,झारखंड येथील क्षेत्र पर्यटन क्षेत्र म्हणून घोषणा केली असून पालिताना येथील गिरीराज क्षेत्र येथील जैन तिर्थस्थळ असलेल्या ठिकाणी धार्मिक विद्वेष पसरविण्याचे काम केले जात आहे .त्या विरोधात संपूर्ण देश भरातून जैन धर्मीयांमधून संताप व्यक्त केला जात आहे.सदर तीर्थ क्षेत्राला पर्यटन स्थळ म्हणून घोषित केल्यास त्यामुळे सदर तीर्थस्थळावर मांस मदिरा आणि इतर बरेच गैर व्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळे जैन धर्मियांमध्ये रोष निर्माण होत आहे.

त्यामुळे जैन लोकांच्या धार्मिक आस्थेला मोठा आघात झालेला आहे. त्यामुळे जैन धर्माच्या आस्थेला पवित्र स्थळ सम्मेतशिखरजी ला पर्यटन स्थळ घोषित करू नयेत आणि या पुढे देखिल कोणत्याही धार्मिक स्थळ यांना पर्यटन स्थळ घोषित करण्यात येवु नये अशी मागणी आचार्य अक्षयबोधी सुरीश्वरजी महाराज यांनी केली आहे .उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालया समोर आंदोलक आल्या नंतर तहसीलदार अधिक पाटील यांना आपल्या तीव्र भावना व्यक्त करणारे निवेदन श्री समस्त जैन महासंघ भिवंडी चे अध्यक्ष मिठालाल जैन,अशोक जैन व इतर पदाधिकारी यांनी निवेदन दिले.

सरकारचे हे कृत्य समस्त जैन धर्मीय कदापि खपवून घेणार नाही असा इशारा मुनिराज विनम्र सागर विजयजी यांनी देत,या अन्याया विरोधात जैन समाज रस्त्यावर उतरला आहे ,जर हाच समाज बँकेत गेला तर सर्व अर्थ व्यवस्था हादरवून ठेवू शकतो असा गर्भित इशारा मुनिराज विनम्र सागर विजयजी यांनी दिला

टॅग्स :thaneठाणे