शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

भिवंडीत पुन्हा कचराकोंडी; स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा 

By नितीन पंडित | Updated: November 25, 2022 16:42 IST

भिवंडीत पुन्हा कचराकोंडी झाली असून ठिकठिकाणी कचऱ्याचे स्राम्राज्य पाहायला मिळत आहे. 

भिवंडी : शहरात सध्या मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे या कचऱ्याच्या ढिगार्‍यांमुळे नागरिक हैराण झाले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. ठिकठिकाणी साचलेल्या या कचऱ्याच्या ढिगार्‍यांमुळे महापालिकेच्या स्वच्छ भारत अभियानाचा देखील पुरता बोजवारा उडाला असल्याचे चित्र सध्या शहरात पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे शहरात साचलेल्या कचऱ्याच्या ढिगार्‍यांकडे मनपा प्रशासनाच्या स्वच्छता व आरोग्य विभागाचे पुरता दुर्लक्ष झाल्याने नागरिकांकडून मनपा प्रशासना विरोधात तीव्र नाराजी पसरली आहे.

भिवंडी शहरातील कल्याण रोड वरील नवी वस्ती परिसरात असलेल्या उड्डाणपुलाच्या खाली कचऱ्याचे मोठे ढीग साचले असून शहरातील इतर अनेक ठिकाणी देखील अशाच प्रकारे कचऱ्याचे ढिग साचले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भिवंडी महापालिकेच्या लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ सध्या संपुष्टात आल्याने मनपा प्रशासनावर अधिकाऱ्यांचाच वरचष्मा आहे. लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपल्याने स्थानिक नगरसेवक देखील शहरातील कचऱ्याच्या समस्यांकडे फारसे डोळसपणे पाहत नसून नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्याने नागरिक ही कचऱ्याच्या तक्रारी घेऊन स्थानिक नगरसेवकांकडे फारसे जात नाहीत. लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपल्याने मनपाचे अधिकारी देखील कचऱ्याच्या समस्येकडे फारसे गांभीर्याने पहात नसल्याने शहरात कचऱ्याचे ढीग साचले असून मनपा प्रशासनाच्या स्वच्छता व आरोग्य विभागाकडून स्वच्छतेविषयी फारसे गांभीर्याने घेतले जात नसल्याचा आरोप सुज्ञ नागरिक करीत आहे. 

  

टॅग्स :thaneठाणेbhiwandiभिवंडी