शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

भाईंदरमध्ये राजकारण्यांचे छटपूजेचे बेकायदा बॅनर पालिकेने काढले 

By धीरज परब | Updated: October 30, 2022 23:35 IST

मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा बॅनरवर गुन्हे दाखल करण्यासह कठोर कारवाईचे आदेश सातत्याने दिले आहेत.

मीरारोड- भाईंदर पश्चिमेला मोठ्या प्रमाणात भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य काही लोकांनी छटपूजेसाठी लावलेले बेकायदेशीर बॅनर तक्रारीनंतर पालिकेने काढून टाकले.  तर बेकायदा बॅनरबाज राजकारण्यांवर गुन्हे दाखल करून बॅनर काढण्यासाठीचा खर्च व दंड वसुली करण्याची मागणी जागरूक नागरिकांनी केली आहे. 

मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा बॅनरवर गुन्हे दाखल करण्यासह कठोर कारवाईचे आदेश सातत्याने दिले आहेत. राजकीय पक्षांनी देखील न्यायालयात बेकायदा बॅनर लावणार नाही म्हणून लेखी प्रतिज्ञापत्र दिलेली आहेत. कायदे नियम नुसार बेकायदा बॅनर, कमान लावता येत नाही. विशेष म्हणजे मीरा भाईंदर महापालिकेत तर खुद्द नगरसेवकांनीच बॅनर बंदीचा ठराव केलेला आहे. केंद्र सरकारने तर नुकतेच फ्लॅक्स बंदी केली आहे. 

परंतु सार्वजनिक ठिकाणी बॅनर लावून फुकटची प्रसिद्धी लाटण्यासाठी हपापलेल्या राजकारण्यांना व काही चमकोगिरीना बेकायदा बॅनर लावण्यासाठी निमित्त हवी असतात. भाईंदर पश्चिमेला छटपूजा निमित्ताने भाजपाचे सर्वात जास्त प्रमाणात बेकायदा बॅनर लागलेले असल्याचे रविवारी सकाळी आढळून आले. भाजपाच्या स्थानिक दोन गटात तर बॅनर स्पर्धाच लागली असल्याचे चित्र होते. या शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य काहींचे बॅनर सुद्धा बेकायदा लावलेले होते. 

सदर बॅनर सार्वजनिक ठिकाणी झाडांवर, विजेचे खांब, पालिकेच्या मालमत्तांवर लावण्यात आले होते. या प्रकरणाची तक्रार थेट पोलीस नियंत्रण कक्ष व भाईंदर पोलिसांना तसेच महापालिके पर्यंत झाली. लागलीच भाईंदर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुगुट पाटील यांनी पालिकेला कारवाई भाबत कळवले तसेच पोलिसांना पाठवून बॅनरबाजीचा आढावा घेतला. 

महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र चव्हाण यांनी पालिकेच्या संबंधित प्रभागातील अधिकाऱ्यांना बेकायदा बॅनर वर कारवाईच्या सूचना केल्या. काही वेळातच पालिकेचे कनिष्ठ अभियंता व पथकाने भाईंदर पश्चिम खाडी किनारा, मासळी मार्केट व छत्रपती शिवाजी महाराज मार्ग व परिसरातील बेकायदा बॅनर काढून टाकले. 

या प्रकरणी शहराचे विद्रुपीकरण करत झाडांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी बेकायदा बॅनर लावल्या बद्दल गुन्हा दाखल करणे, बेकायदा बॅनर काढण्यासाठीचा खर्च तसेच पालिकेचा महसूल बुडवला तो दंडासह वसूल करणे व न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याची कारवाई करण्याची मागणी जागरूक नागरिकांनी केली आहे.  

 

टॅग्स :thaneठाणेMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक