शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी शहरात सुधारणा, ग्रामीणमध्ये चिंतेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 01:05 IST

प्रशासनाकडून उपाययोजना। रुग्णवाढ दुपटीचा कालावधी ६५ दिवसांवर

भिवंडी : भिवंडी महापालिका क्षेत्रात कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यात आरोग्य यंत्रणेसह पालिका प्रशासनाला यश आले आहे. भिवंडीतील रुग्णवाढदुपटीचा कालावधी ६५ दिवसांवर आला आहे. मात्र, ग्रामीण भागात आरोग्य सेवा सक्षम नसल्याने तेथे परिस्थिती बिकट होत चालली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने सरकारने जुलैमध्ये भिवंडी पालिकेच्या आयुक्तपदी डॉ. पंकज आशिया यांची नियुक्ती केली. त्यांनी राबवलेल्या उपाययोजनांचा परिणाम जुलैच्या अखेरीस दिसून आला.

आज शहरातील अनेक खासगी कोविड रुग्णालयांत बेड रिकामे होत आहेत. त्याचबरोबर रुग्ण मृत्युमुखी पडण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. शहरातील खाजगी कोविड रुग्णालयांकडून होणारी रुग्णांची पिळवणूक थांबविण्यात प्रशासनाने कंबर कसली असल्याने शहरातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आली आहे.तर, ग्रामीण भागातील रुग्णांना सुरुवातीपासून रुग्णालयात दाखल होण्यापासून उपचार मिळविण्यासाठी झगडावे लागत आहे. जिल्हा प्रशासन आरोग्य सुविधा मिळवून देण्यात यशस्वी न झाल्याने ग्रामीण भागातील कोरोना परिस्थिती सुधारलेलीनाही.येत्या आठवड्यात गणेशपुरी येथील नित्यानंद रुग्णालयात ३०० बेडचे कोविड सेंटर सुरू होणार असून कोनगाव येथे २०० तर काल्हेर येथे १०० बेडसह सवाद येथे ७०० बेडचे कोविड केअर सेंटर उभारले जाणार आहेत. विशेष म्हणजे हीच कोविड सेंटर आधीपासूनच सुरू केली असती, तर ही परिस्थिती आली नसती. ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा सक्षम नसल्याने तेथील रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.शहरात मृत्युदर ५.४४ टक्केदरम्यान, शहरातील रुग्णवाढीचा वेग मंदावला असून रुग्णदुपटीचा कालावधी ६५ दिवसांवर पोहोचला, तर शहरातील मृत्युदर ५.४४ टक्के तर ग्रामीण भागात मृत्युदर ३.१२ टक्के आहे. दरम्यान, ‘जून महिन्यात झालेल्या मृत्यूंची संख्या जुलै महिन्यात मिळाली असल्याने जुलै महिन्यात मृत्यूंच्या संख्येत वाढ दिसत आहे. मात्र, जुलैपासून कोरोना रुग्णसंख्या रोखण्यात व मृत्युदर कमी करण्यात मनपासह आरोग्य यंत्रणेला नक्कीच यश आले आहे, अशी प्रतिक्रिया मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन मोकाशी यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्या