शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी शहरात सुधारणा, ग्रामीणमध्ये चिंतेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 01:05 IST

प्रशासनाकडून उपाययोजना। रुग्णवाढ दुपटीचा कालावधी ६५ दिवसांवर

भिवंडी : भिवंडी महापालिका क्षेत्रात कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यात आरोग्य यंत्रणेसह पालिका प्रशासनाला यश आले आहे. भिवंडीतील रुग्णवाढदुपटीचा कालावधी ६५ दिवसांवर आला आहे. मात्र, ग्रामीण भागात आरोग्य सेवा सक्षम नसल्याने तेथे परिस्थिती बिकट होत चालली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने सरकारने जुलैमध्ये भिवंडी पालिकेच्या आयुक्तपदी डॉ. पंकज आशिया यांची नियुक्ती केली. त्यांनी राबवलेल्या उपाययोजनांचा परिणाम जुलैच्या अखेरीस दिसून आला.

आज शहरातील अनेक खासगी कोविड रुग्णालयांत बेड रिकामे होत आहेत. त्याचबरोबर रुग्ण मृत्युमुखी पडण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. शहरातील खाजगी कोविड रुग्णालयांकडून होणारी रुग्णांची पिळवणूक थांबविण्यात प्रशासनाने कंबर कसली असल्याने शहरातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आली आहे.तर, ग्रामीण भागातील रुग्णांना सुरुवातीपासून रुग्णालयात दाखल होण्यापासून उपचार मिळविण्यासाठी झगडावे लागत आहे. जिल्हा प्रशासन आरोग्य सुविधा मिळवून देण्यात यशस्वी न झाल्याने ग्रामीण भागातील कोरोना परिस्थिती सुधारलेलीनाही.येत्या आठवड्यात गणेशपुरी येथील नित्यानंद रुग्णालयात ३०० बेडचे कोविड सेंटर सुरू होणार असून कोनगाव येथे २०० तर काल्हेर येथे १०० बेडसह सवाद येथे ७०० बेडचे कोविड केअर सेंटर उभारले जाणार आहेत. विशेष म्हणजे हीच कोविड सेंटर आधीपासूनच सुरू केली असती, तर ही परिस्थिती आली नसती. ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा सक्षम नसल्याने तेथील रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.शहरात मृत्युदर ५.४४ टक्केदरम्यान, शहरातील रुग्णवाढीचा वेग मंदावला असून रुग्णदुपटीचा कालावधी ६५ दिवसांवर पोहोचला, तर शहरातील मृत्युदर ५.४४ टक्के तर ग्रामीण भागात मृत्युदर ३.१२ टक्के आहे. दरम्यान, ‘जून महिन्यात झालेल्या मृत्यूंची संख्या जुलै महिन्यात मिळाली असल्याने जुलै महिन्यात मृत्यूंच्या संख्येत वाढ दिसत आहे. मात्र, जुलैपासून कोरोना रुग्णसंख्या रोखण्यात व मृत्युदर कमी करण्यात मनपासह आरोग्य यंत्रणेला नक्कीच यश आले आहे, अशी प्रतिक्रिया मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन मोकाशी यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्या