शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ओखी वादळाचा परिणाम : उत्तनच्या मच्छीमारांचे कोट्यवधींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:30 IST

मासेमारीच्या ऐन हंगामात ओखी चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे उत्तन, पाली, चौक आदी भागांतील मच्छीमारांचे नुकसान काही कोटींच्या घरात गेले आहे.

धीरज परब मीरा रोड : मासेमारीच्या ऐन हंगामात ओखी चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे उत्तन, पाली, चौक आदी भागांतील मच्छीमारांचे नुकसान काही कोटींच्या घरात गेले आहे. मासेमारी सोडून किनाºयावर परतावे लागले, तर काहींना जाताच न आल्याने खलाशांचा पगार, डिझेल, बर्फ आदी खर्च अंगावर पडलाच. शिवाय, मासेमारीच करता न आल्याने मच्छीमारांचे दुहेरी नुकसान झाले आहे. सरकारने नुकसानभरपाई देण्याची मागणी मच्छीमारांनी केली आहे.भार्इंदरच्या उत्तन, पाली, चौक आदी किनारपट्टी परिसरात सुमारे ७५० मासेमारी बोटी आहेत. मासेमारी हाच उपजीविकेचा मुख्य व्यवसाय असलेल्या मच्छीमारांना सध्या मासेमारीचा चांगला हंगाम मिळाला होता. ४ डिसेंबरला हवामान खात्याने ओखी चक्रीवादळाचा धोक्याचा इशारा देत पुढील ७२ तास समुद्र खवळलेला राहणार असल्याने मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये तसेच मासेमारीसाठी गेलेल्या बोटींना परत बोलावण्याचा इशारा दिला होता. ठाणे जिल्हा प्रशासनानेही तशी माहिती पोलीस, पालिकेला दिली होती.अनेक मच्छीमार बोटी समुद्रात मासेमारीसाठी गेल्या होत्या. तर, अनेक बोटी जायच्या तयारीत होत्या. धोक्याच्या इशाºयानंतरही खोल समुद्रात गेलेल्या बोटी ४ डिसेंबरला सायंकाळपर्यंत सुखरूप किनारी आल्या. तर, अनेक बोटी वादळाच्या इशाºयामुळे समुद्रात गेल्याच नाहीत. पोलीस, महसूल व मत्स्य विभागाने ओखी वादळाचा इशारा मिळताच दिवसरात्र बोटींशी संपर्क साधून त्यांना माघारी फिरायला लावल्याने बोटींचे नुकसान वा जीवितहानी झाली नाही. परंतु, मासेमारी बुडाल्याने मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे.मासेमारीसाठी खोल समुद्रात जाताना इंधन, बर्फ, किराणा आदीसाठी मोठा खर्च प्रत्येक बोटीला येतो. शिवाय, खलाशांना त्यांचा पगार द्यावा लागतो. त्यामुळे हा सर्व खर्च भरून काढत त्यावर उत्पन्न मिळवायचे म्हटले की, मासेमारी केली पाहिजे व मासेही मिळाले पाहिजेत. परंतु, ओखी वादळामुळे समुद्रात गेलेल्या मच्छीमार बोटींना मासेमारी न करताच मागे फिरावे लागले. त्यामुळे मासे तर मिळाले नाहीतच, शिवाय इंधन, बर्फ, किराणा, खलाशांचा पगार यांचा खर्चही वाया गेला. तर, मासेमारीसाठी जाण्याच्या तयारीने निघालेल्या बोटींनाही अशाच प्रकारे नुकसान सोसावे लागले आहे.

टॅग्स :Ockhi Cycloneओखी चक्रीवादळ