शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

ओखी वादळाचा परिणाम : उत्तनच्या मच्छीमारांचे कोट्यवधींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:30 IST

मासेमारीच्या ऐन हंगामात ओखी चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे उत्तन, पाली, चौक आदी भागांतील मच्छीमारांचे नुकसान काही कोटींच्या घरात गेले आहे.

धीरज परब मीरा रोड : मासेमारीच्या ऐन हंगामात ओखी चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे उत्तन, पाली, चौक आदी भागांतील मच्छीमारांचे नुकसान काही कोटींच्या घरात गेले आहे. मासेमारी सोडून किनाºयावर परतावे लागले, तर काहींना जाताच न आल्याने खलाशांचा पगार, डिझेल, बर्फ आदी खर्च अंगावर पडलाच. शिवाय, मासेमारीच करता न आल्याने मच्छीमारांचे दुहेरी नुकसान झाले आहे. सरकारने नुकसानभरपाई देण्याची मागणी मच्छीमारांनी केली आहे.भार्इंदरच्या उत्तन, पाली, चौक आदी किनारपट्टी परिसरात सुमारे ७५० मासेमारी बोटी आहेत. मासेमारी हाच उपजीविकेचा मुख्य व्यवसाय असलेल्या मच्छीमारांना सध्या मासेमारीचा चांगला हंगाम मिळाला होता. ४ डिसेंबरला हवामान खात्याने ओखी चक्रीवादळाचा धोक्याचा इशारा देत पुढील ७२ तास समुद्र खवळलेला राहणार असल्याने मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये तसेच मासेमारीसाठी गेलेल्या बोटींना परत बोलावण्याचा इशारा दिला होता. ठाणे जिल्हा प्रशासनानेही तशी माहिती पोलीस, पालिकेला दिली होती.अनेक मच्छीमार बोटी समुद्रात मासेमारीसाठी गेल्या होत्या. तर, अनेक बोटी जायच्या तयारीत होत्या. धोक्याच्या इशाºयानंतरही खोल समुद्रात गेलेल्या बोटी ४ डिसेंबरला सायंकाळपर्यंत सुखरूप किनारी आल्या. तर, अनेक बोटी वादळाच्या इशाºयामुळे समुद्रात गेल्याच नाहीत. पोलीस, महसूल व मत्स्य विभागाने ओखी वादळाचा इशारा मिळताच दिवसरात्र बोटींशी संपर्क साधून त्यांना माघारी फिरायला लावल्याने बोटींचे नुकसान वा जीवितहानी झाली नाही. परंतु, मासेमारी बुडाल्याने मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे.मासेमारीसाठी खोल समुद्रात जाताना इंधन, बर्फ, किराणा आदीसाठी मोठा खर्च प्रत्येक बोटीला येतो. शिवाय, खलाशांना त्यांचा पगार द्यावा लागतो. त्यामुळे हा सर्व खर्च भरून काढत त्यावर उत्पन्न मिळवायचे म्हटले की, मासेमारी केली पाहिजे व मासेही मिळाले पाहिजेत. परंतु, ओखी वादळामुळे समुद्रात गेलेल्या मच्छीमार बोटींना मासेमारी न करताच मागे फिरावे लागले. त्यामुळे मासे तर मिळाले नाहीतच, शिवाय इंधन, बर्फ, किराणा, खलाशांचा पगार यांचा खर्चही वाया गेला. तर, मासेमारीसाठी जाण्याच्या तयारीने निघालेल्या बोटींनाही अशाच प्रकारे नुकसान सोसावे लागले आहे.

टॅग्स :Ockhi Cycloneओखी चक्रीवादळ