शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

बंदी असतानाही भिवंडीत अवजड वाहनांची अवैध वाहतूक; कारवाई करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 19:07 IST

Bhiwandi : नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी वाहतूक पोलीस विभागाकडून या मार्गावर दिवसा अवजड वाहनांना बंदी घालण्यरत आली आहे .

- नितिन पंडीत 

भिवंडी : भिवंडी ठाणे तसेच भिवंडी अंजूरफाटा माणकोली या दोन्ही महामार्गांवर वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षित कारभारामुळे बंदी असलेल्या अवजड वाहनांना प्रवेश दिला जात असल्याने या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. विशेष म्हणजे, दंडाच्या रूपाने वाहतूक पोलीस या अवजड वाहनांकडून पावत्या फाडून या अवजड वाहनांना प्रवेश देत असल्यानेच या दोन्ही महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुनील भगत यांनी केला आहे. 

विशेष म्हणजे, त्यासंदर्भातील लेखी निवेदन देखील वंचितच्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले असून वाहतूक पोलिसांनी या अवजड वाहनांवर या मार्गावरून प्रवासास दिवसाची बंदी घातली नाही तर वंचितच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील वंचितच ठाणे जिल्हाध्यक्ष सुनील भगत यांनी दिला आहे. भिवंडी काल्हेर ठाणे मार्गावर सध्या मेट्रोचे काम सुरु आहे त्यामुळे हा रास्ता आधीच अरुंद झाला आहे. त्याचबरोबर चिंचोटी अंजूरफाटा माणकोली हा रस्ता अहमदाबाद महामार्गाला जोडला जात असल्याने तसेच दोन्ही मार्गांवर गोदाम पट्टा असल्याने या दोन्ही मार्गांवर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची ये जा असते त्यामुळे या दोन्ही मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. ज्याचा नाहक त्रास स्थानिक नागरिकांसह प्रवाशांना सहन करावा लागत आहे. 

विशेष म्हणजे नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी वाहतूक पोलीस विभागाकडून या मार्गावर दिवसा अवजड वाहनांना बंदी घालण्यरत आली आहे . मात्र वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षित कारभारामुळे अवजड वाहने या मार्गावरून दिवसभर ये जा करत असल्याने या मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्यां आजही जैसे थे अशीच आहे . या मार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीकडे वंचितने लक्ष वेधले असून या दोन्ही महामार्गावरून अवजड वाहनांची अवैध वाहतूक बंद करण्याचे कठोर निर्देश वाहतूक पोलिस प्रशासनास द्यावे अशी मागणी भगत यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

वाहतूक पोलीस अवजड वाहनांकडून पैसे घेतात व बंदी असतानाही ही अवजड वाहने या दोन्ही रस्त्यावर ये जा करतात, वाहतूक पोलिसांनी ही अवैध अवजड वाहतूक बंद केली नाही, तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुनील भगत यांनी दिली आहे .  

टॅग्स :Bhiwandiभिवंडी