शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बंदी असतानाही भिवंडीत अवजड वाहनांची अवैध वाहतूक; कारवाई करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 19:07 IST

Bhiwandi : नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी वाहतूक पोलीस विभागाकडून या मार्गावर दिवसा अवजड वाहनांना बंदी घालण्यरत आली आहे .

- नितिन पंडीत 

भिवंडी : भिवंडी ठाणे तसेच भिवंडी अंजूरफाटा माणकोली या दोन्ही महामार्गांवर वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षित कारभारामुळे बंदी असलेल्या अवजड वाहनांना प्रवेश दिला जात असल्याने या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. विशेष म्हणजे, दंडाच्या रूपाने वाहतूक पोलीस या अवजड वाहनांकडून पावत्या फाडून या अवजड वाहनांना प्रवेश देत असल्यानेच या दोन्ही महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुनील भगत यांनी केला आहे. 

विशेष म्हणजे, त्यासंदर्भातील लेखी निवेदन देखील वंचितच्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले असून वाहतूक पोलिसांनी या अवजड वाहनांवर या मार्गावरून प्रवासास दिवसाची बंदी घातली नाही तर वंचितच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील वंचितच ठाणे जिल्हाध्यक्ष सुनील भगत यांनी दिला आहे. भिवंडी काल्हेर ठाणे मार्गावर सध्या मेट्रोचे काम सुरु आहे त्यामुळे हा रास्ता आधीच अरुंद झाला आहे. त्याचबरोबर चिंचोटी अंजूरफाटा माणकोली हा रस्ता अहमदाबाद महामार्गाला जोडला जात असल्याने तसेच दोन्ही मार्गांवर गोदाम पट्टा असल्याने या दोन्ही मार्गांवर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची ये जा असते त्यामुळे या दोन्ही मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. ज्याचा नाहक त्रास स्थानिक नागरिकांसह प्रवाशांना सहन करावा लागत आहे. 

विशेष म्हणजे नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी वाहतूक पोलीस विभागाकडून या मार्गावर दिवसा अवजड वाहनांना बंदी घालण्यरत आली आहे . मात्र वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षित कारभारामुळे अवजड वाहने या मार्गावरून दिवसभर ये जा करत असल्याने या मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्यां आजही जैसे थे अशीच आहे . या मार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीकडे वंचितने लक्ष वेधले असून या दोन्ही महामार्गावरून अवजड वाहनांची अवैध वाहतूक बंद करण्याचे कठोर निर्देश वाहतूक पोलिस प्रशासनास द्यावे अशी मागणी भगत यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

वाहतूक पोलीस अवजड वाहनांकडून पैसे घेतात व बंदी असतानाही ही अवजड वाहने या दोन्ही रस्त्यावर ये जा करतात, वाहतूक पोलिसांनी ही अवैध अवजड वाहतूक बंद केली नाही, तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुनील भगत यांनी दिली आहे .  

टॅग्स :Bhiwandiभिवंडी