शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

उल्हासनगरातील धोकादायक इमारतीसह अवैध बांधकामे होणार अधिकृत, शासनाचा अध्यादेश

By सदानंद नाईक | Updated: March 14, 2024 20:06 IST

Ulhasnagar News: उल्हासनगर शहरातील बांधकामे व धोकादायक इमारतीची पुनर्बांधणी होणार असल्याची माहिती शहर भाजपाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. शासनाने याबाबत जीआर काढला असल्याची माहिती आमदार कुमार आयलानी यांनी यावेळी दिली.

- सदानंद नाईक उल्हासनगर - शहरातील बांधकामे व धोकादायक इमारतीची पुनर्बांधणी होणार असल्याची माहिती शहर भाजपाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. शासनाने याबाबत जीआर काढला असल्याची माहिती आमदार कुमार आयलानी यांनी यावेळी दिली. यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व विधानसभा अध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी शहरातील विकास कामात भ्रष्टाचार चालला असल्याचा आरोप केल्याने, पक्षातील वाद चव्हाट्यावर आला आहे.

उल्हासनगरात धोकादायक इमारती पडून अनेक जणांचे जीव गेले असून शेकडो जण जखमी झाले. तसेच हजारो नागरीक बेघर झाले असून घर देता का घर असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. शहरातील तब्बल २७ हजार बांधकामे नियमित होणार असल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या आहेत. दरम्यान भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष प्रदिप पुरस्वानी, आमदार कुमार आयलानी, माजी जिल्हाध्ययक्ष जमनुदास पुरस्वानी, लाल पंजाबी, चार्ली पारवानी, राजेश वधारीया, प्रकाश नाथानी आदीजन पत्रकार परिषद घेऊन शासनाने काढलेल्या अध्यादेशाची माहिती दिली. यावेळी आमदार आयलानी यांनी शासनाकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आल्याचे सांगून शहरातील धोकादायक इमारती व अवैध बांधकामे नियमित होणार असल्याची माहिती दिली.

शहरातील बांधकामे नियमित करण्यासाठी सध्याच्या रेडिरेकनरच्या १० टक्के रक्कम भरावे लागणार असल्याचे आमदार आयलानी म्हणाले. तसेच क्लस्टरचे धोरण शहरासाठी बदलण्यात आले असून १० चौ.मी. ऐवजी ४ हजार चौ.मी क्षेत्रफळ ठेवण्यात आले असून त्यामध्ये भविष्यात येणारे अडथळे दूर करण्यात येणार असल्याची माहितीही आयलानी यांनी दिली. भाजपच्या उपस्थित स्थानिक नेते माहिती देत असतांना पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी शहरातील भ्रष्टाचाराबाबत बोलायचे आहे. असे म्हणून बोलण्यास लागताच, त्यांची इतर नेत्यांकडून समजूत काढण्यात आली आहे.

भाजपातील वाद चव्हाट्यावर भाजपची पत्रकार परिषद सुरू असताना पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष व विधानसभा अध्यक्ष जमनुदास पुरस्वानी शहरात सुरू असलेल्या विकास कामात भ्रष्टाचार असल्याचा आरोप केला. मात्र पत्रकार परिषदेत त्यांना इतर नेत्यांनी बोलण्यापासून रोखून त्यांची समजुत काढली. याप्रकाराने भाजपातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरBJPभाजपा