शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरातील धोकादायक इमारतीसह अवैध बांधकामे होणार अधिकृत, शासनाचा अध्यादेश

By सदानंद नाईक | Updated: March 14, 2024 20:06 IST

Ulhasnagar News: उल्हासनगर शहरातील बांधकामे व धोकादायक इमारतीची पुनर्बांधणी होणार असल्याची माहिती शहर भाजपाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. शासनाने याबाबत जीआर काढला असल्याची माहिती आमदार कुमार आयलानी यांनी यावेळी दिली.

- सदानंद नाईक उल्हासनगर - शहरातील बांधकामे व धोकादायक इमारतीची पुनर्बांधणी होणार असल्याची माहिती शहर भाजपाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. शासनाने याबाबत जीआर काढला असल्याची माहिती आमदार कुमार आयलानी यांनी यावेळी दिली. यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व विधानसभा अध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी शहरातील विकास कामात भ्रष्टाचार चालला असल्याचा आरोप केल्याने, पक्षातील वाद चव्हाट्यावर आला आहे.

उल्हासनगरात धोकादायक इमारती पडून अनेक जणांचे जीव गेले असून शेकडो जण जखमी झाले. तसेच हजारो नागरीक बेघर झाले असून घर देता का घर असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. शहरातील तब्बल २७ हजार बांधकामे नियमित होणार असल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या आहेत. दरम्यान भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष प्रदिप पुरस्वानी, आमदार कुमार आयलानी, माजी जिल्हाध्ययक्ष जमनुदास पुरस्वानी, लाल पंजाबी, चार्ली पारवानी, राजेश वधारीया, प्रकाश नाथानी आदीजन पत्रकार परिषद घेऊन शासनाने काढलेल्या अध्यादेशाची माहिती दिली. यावेळी आमदार आयलानी यांनी शासनाकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आल्याचे सांगून शहरातील धोकादायक इमारती व अवैध बांधकामे नियमित होणार असल्याची माहिती दिली.

शहरातील बांधकामे नियमित करण्यासाठी सध्याच्या रेडिरेकनरच्या १० टक्के रक्कम भरावे लागणार असल्याचे आमदार आयलानी म्हणाले. तसेच क्लस्टरचे धोरण शहरासाठी बदलण्यात आले असून १० चौ.मी. ऐवजी ४ हजार चौ.मी क्षेत्रफळ ठेवण्यात आले असून त्यामध्ये भविष्यात येणारे अडथळे दूर करण्यात येणार असल्याची माहितीही आयलानी यांनी दिली. भाजपच्या उपस्थित स्थानिक नेते माहिती देत असतांना पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी शहरातील भ्रष्टाचाराबाबत बोलायचे आहे. असे म्हणून बोलण्यास लागताच, त्यांची इतर नेत्यांकडून समजूत काढण्यात आली आहे.

भाजपातील वाद चव्हाट्यावर भाजपची पत्रकार परिषद सुरू असताना पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष व विधानसभा अध्यक्ष जमनुदास पुरस्वानी शहरात सुरू असलेल्या विकास कामात भ्रष्टाचार असल्याचा आरोप केला. मात्र पत्रकार परिषदेत त्यांना इतर नेत्यांनी बोलण्यापासून रोखून त्यांची समजुत काढली. याप्रकाराने भाजपातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरBJPभाजपा