शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
2
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
3
पैसे घेऊन कोणी आपलं आयुष्य विकायला तयार नाही; मतदानानंतर काय म्हणाले उद्धव ठाकरे?
4
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
5
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
6
Fact Check: राहुल गांधींच्या हातातील 'ते' लाल रंगाचं संविधान चीनचं नाही; व्हायरल दावा चुकीचा
7
Multibagger Stock: शेअर असावा तर असा! २ वर्षांत ५००% पेक्षा अधिक रिटर्न, तुमच्याकडे आहे का?
8
World Record! काय भारी धावली राव; भारताच्या लेकीनं रचला इतिहास, जिंकलं सुवर्ण
9
Fact Check: अखिलेश यादव PM मोदींना भेटले? १० वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल; जाणून घ्या सत्य
10
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
11
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
12
ख्रिस गेल पुढच्या IPL मध्ये पुन्हा खेळताना दिसणार? विराटच्या VIDEO नंतर चर्चांना उधाण
13
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
14
'मुलाला सांभाळता येत नाही'; नेटकऱ्यांच्या कमेंट्स जिव्हारी लागल्या, 'त्या' बाळाच्या आईने स्वतःला संपवलं
15
गौरव मोरे ते स्पृहा जोशी; मराठमोळ्या या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
16
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
17
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
18
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
19
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
20
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास

...पण गळतीकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 3:10 AM

या चौकात नेहमीच वर्दळ असते. येथेच वाहतूक विभागाचे कार्यालय आहे. २५ दिवसांपूर्वी येथे जलवाहिनी टाकण्यात आली. मात्र, तिला गळती लागल्याने रस्त्याच्या अंतर्गत भागातून पाणी बाहेर पडून मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत.

कल्याण : पूर्वेकडील कोळसेवाडी चक्कीनाका भागातील चौकात नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम काही दिवसांपूर्वी करण्यात आले होते. परंतु, या जलवाहिनीला गळती लागल्याने येथे सर्वत्र पाणीचपाणी होऊन मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. याकडे केडीएमसीचे पुरते दुर्लक्ष झाल्याने सध्या येथे अपघातही घडत आहेत. या पार्श्वभूमीवर कोळसेवाडी वाहतूक पोलीस उपविभागाच्या वतीने महापालिकेकडे पत्रव्यवहार करून तातडीने गळक्या जलवाहिनीच्या दुरुस्तीची मागणी केली आहे.पूर्वेकडील चक्कीनाका चौक परिसर हा कल्याण, उल्हासनगर, डोंबिवली या शहरांकडून हाजीमलंग रोडकडे जाणारा आणि येणारा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे या चौकात नेहमीच वर्दळ असते. येथेच वाहतूक विभागाचे कार्यालय आहे. २५ दिवसांपूर्वी येथे जलवाहिनी टाकण्यात आली. मात्र, तिला गळती लागल्याने रस्त्याच्या अंतर्गत भागातून पाणी बाहेर पडून मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. या खड्ड्यांमध्ये पाणी साठते आहे. शिवाय, या खड्ड्यांची खोली किती आहे, याचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. यामुळे अपघातही घडत आहेत.एकीकडे शहरात पाणीकपात लागू असताना दुसरीकडे अशा गळतीच्या माध्यमातून होत असलेली पाण्याची नासाडी हा चर्चेचा विषय आहे. दरम्यान, कोळसेवाडी भागातील शहर वाहतूक उपशाखा विभागाचे एस.एन. जाधव यांनी केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाला पत्र पाठवून याकडे लक्ष वेधले आहे.अपघात घडल्यास जबाबदारी महापालिकेचीजलवाहिनीची दुरुस्ती आणि खड्डे भरण्याची कार्यवाही लवकरात लवकर पार पाडावी, अन्यथा भविष्यात अपघात घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी महापालिकेची राहील, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. बऱ्याच ठिकाणी पाण्याच्या व्हॉल्व्हचे लिकेज होऊन रस्त्यावर पाणी आल्याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.यासंदर्भात ‘लोकमत’ने पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा