शहरं
Join us  
Trending Stories
1
भावाचा हातात हात, तोंडावर मास्क, हात उंचावून अभिवादन; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर
2
"मी हे मान्यच करू शकत नाही..."; टीम इंडियाच्या पराभवानंतर चेतेश्वर पुजाराने चांगलंच सुनावलं
3
भारताचा अमेरिकेसोबत ऐतिहासिक LPG करार; घरगुती गॅस सिलिंडरची किंमत कमी होणार?
4
गौतम अदानी आणताहेत देशातील सर्वात मोठा राइट्स इश्यू; ७१६ रुपये स्वस्त मिळतोय शेअर, पाहा डिटेल्स
5
खळबळजनक! थारसाठी पत्नीची हत्या, हुंड्यासाठी पती झाला हैवान; भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
6
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
7
सुश्मिता सेनने पूर्ण शुद्धीत राहूनच केलेली अँजिओप्लास्टी, दोन वर्षांपूर्वी आलेला हार्टॲटॅक
8
काँगोमधील तांब्याच्या खाणीत मोठी दुर्घटना; पूल कोसळून ३२ जणांचा मृत्यू, अनेक जण अजूनही बेपत्ता
9
आई वडिलांची एक चूक नडली, मुलाला झाला गंभीर आजार; हाताचे बोट कापावे लागले, कारण काय?
10
Delhi Blast : दिल्ली स्फोटातील डॉ. शाहीनच्या कोट्यवधींच्या फंडिंगबाबत धक्कादायक खुलासा, ATS-NIA चे छापे
11
टॅक्स भरणे झाले सोपे! बँक, नेट बँकिंगचा झंझट नाही; आता UPI ॲपद्वारे मिनिटांत भरा प्राप्तीकर
12
पालघर साधू हत्याकांडात आरोप केले, त्यालाच पक्षात घेतले? चौफेर टीका होताच भाजपानं दिलं असं स्पष्टीकरण
13
देवेंद्र फडणवीसांना भेटला, सत्कार करून घेतला; पंतप्रधान कार्यालयात सचिव म्हणणारा निघाला...
14
नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी सुवर्णसंधी! ९०% कंपन्या 'या' पदावर प्रोफेशनल्सची करणार भरती
15
देवेंद्र फडणवीसांचं 'धक्कातंत्र'! उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर पुन्हा सोपवली जबाबदारी
16
टीम इंडिया ९३ धावांवर 'ऑलआउट', दुसरीकडे करुण नायरने एकट्याने केल्या त्यापेक्षा जास्त धावा
17
अजय देवगणपेक्षाही खतरनाक! विकी कौशलच्या 'तौबा तौबा' गाण्यावर काजोलने केला डान्स, सर्वांची हसून पुरेवाट
18
पुण्यातील या नगर परिषदेत ठाकरे आणि शिंदे गट एकत्र, नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा
19
"इंडस्ट्रीत पदार्पण मिळू शकते, पण...", करीना कपूर बॉलिवूडमधील नेपोटिझ्मबद्दल स्पष्टच बोलली
20
ट्रम्प यांचा यु-टर्न! अमेरिकेच्या 'या' निर्णयानं भारताला होणार २६ हजार कोटींचा फायदा, 'यांना' मिळणार मोठा लाभ
Daily Top 2Weekly Top 5

...तर ठामपा मुख्यालयाच्या दारातच आंब्यांची विक्री करू, आनंद परांजपे यांचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 14:53 IST

भाजपाच्या नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील तसेच शहरातील समस्या सोडवण्यासाठी राजकारण करावे;

ठाणे - भाजपाच्या नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील तसेच शहरातील  समस्या सोडवण्यासाठी राजकारण करावे; गोरगरीब शेतकरी आपले शेतकी उत्पादन विकण्यासाठी ठाण्यात येत असतील तर त्यांना हुसकावून लावण्याचे राजकारण करू नये; असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी लगावला.दरम्यान, ‘ठामपाने अद्यापही फेरीवाला धोरणाची अमलबजावणी केलेली नाही. त्यामुळेच अशी परिस्थिती निर्माण होत असून ठाणे पालिकेने सत्ताधार्‍यांच्या हातचे बाहुले होऊ नये; गोरगरीब शेतकर्‍यांना त्यांनी उत्पादीत केलेला आंबा विकण्यासाठी पुन्हा स्टॉल उभारुन न दिल्यास सर्व आंबा विक्रेत्यांना घेऊन पालिकेच्या दारात विक्रीकेंद्र सुरू करू’, असा इशाराही आनंद परांजपे यांनी दिला. ठाण्यातील विष्णु नगर येथे फुटपाथवर आंबे विक्रीचा स्टॉल लावण्यात आला आहे, शेतकरी ते थेट ग्राहक सुविधेचा हा स्टॉल उभारण्यात आला होता.भाजपाच्या स्थानिक नगरसेवकांनी या कोकणातील शेतकर्‍याला विरोध केला, दरम्यान मराठी माणसाचे हे स्टॉल असल्याने हा स्टॉल हटवू नका अशी भूमिका मनसेने घेतली. यामुळे भाजप आणि मनसेचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला. या संदर्भात शुक्रवारी आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषद घेऊन, राष्ट्रवादी काँग्रेस शेतकर्‍यांच्या हितासाठी लढत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना केलेला विरोध आपण सहन करणार नसून त्यांच्या संरक्षणासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सज्ज असल्याचे सांगितले.आनंद परांजपे म्हणाले की, सध्या ठाण्यात आंब्यावरुन वातावरण गरम झाले आहे. शहरात भीषण पाणी टंचाई आहे. त्यावर तोडगा काढण्यात सत्ताधार्‍यांना अपयश आले आहे. अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांच्या पुन:र्वसनचा प्रश्न आ वासून उभा आहे. पावसाळा तोंडावर आलेला असतानाही नालेसफाईचे काम रेंगाळत पडलेले आहे. मेट्रोच्या बांधकामामुळे शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. यासारखे अनेक विषय असतानाही भाजपचे नगरसेवक आणि शहराध्यक्ष हे गोरगरीब शेतकर्‍यांना विरोध करुन राजकारण करीत आहेत. काल जे घडले तर ठाणे शहरात प्रथमच घडले आहे. किंबहुना ठाण्याची ती संस्कृतीही नाही. गेली 25 वर्षे ठामपात शिवसेनेच्या साथीने सत्ता उपभोगणार्‍या भाजपला या शहरात राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अमलबजावणी करता आलेली नाही.अशा स्थितीमध्ये जर शेतकरी आपला शेतमाल थेट विक्री करीत असेल तर सेना-भाजपच्या दावणीला बांधून घेत पालिका प्रशासनानेही या शेतकर्‍यांवर कारवाई करणे सर्वार्थाने चुकीचेच आहे. भाजपच्या केंद्रातील आणि राज्यातील सरकारला 2 कोटी रोजगार उपलब्ध करुन देता आलेले नाहीत; शेतकर्‍यांना देशोधडीला लावलेले आहे. या अपयशी मोदी सरकारचे प्रतिनिधीत्व करणार्‍या ठाण्यातील भाजप नगरसेवकांनी तरी ठाण्याच्या विकासाचे राजकारण करावे. ठाण्यात येऊन आपला शेतमाल विकणार्‍या शेतकर्‍यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे. या शेतकर्‍यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. त्यांची अडवणूक करु नये. ठामपानेही माणूसकीच्या नात्याने या शेतकर्‍यांवर कारवाई करु नये; अन्यथा, या शेतकर्‍यांना घेऊन आम्ही पालिकेच्या दारात आंबा विक्रीचे स्टॉल लावू, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला. 

मनसेच्या धरणे आंदोलनाला राष्ट्रवादीमुळे बळ   गुरुवारी रात्री झालेल्या प्रकाराचा निषेध म्हणून मनसैनिकांनी विष्णू नगर येथे धरणे आंदोलन केले. या धरणे आंदोलनाच्या ठिकाणी आनंद परांजपे, माजी नगरसेवक अमीत सरय्या, राष्ट्रवादीचे कोपरी-पाचपाखाडी विधानसभाध्यक्ष नितीन पाटील, रवी पालव यांनी भेट दिली. यावेळी आनंद परांजपे यांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना आंबा भेट दिला. तसेच, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भेट दिल्यामुळे मनसेच्या आंदोलनालाही बळ मिळाले. त्यांनी लगेचच या ठिकाणी शेतकर्‍यांच्या आंबाविक्रीसाठी स्टॉल बांधण्यास सुरुवात केली,

टॅग्स :thaneठाणे