शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

खबरदार लॉकडाऊन कराल तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 00:13 IST

वस्तू घेण्यासाठी नागरिकांचे हाल झाले. त्यांना दुकानाबाहेर रांगा लावाव्या लागल्या. अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकले. देशात अस्थिरतेचे वातावरण पसरले.

मुरलीधर भवार कल्याण : कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर केल्यावर सर्व व्यवहार ठप्प झाले. वस्तू घेण्यासाठी नागरिकांचे हाल झाले. त्यांना दुकानाबाहेर रांगा लावाव्या लागल्या. अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकले. देशात अस्थिरतेचे वातावरण पसरले. मात्र काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी ‘अनलॉक १’ ची घोषणा करुन जीवन आता कुठे पूर्वपदावर येत असतानाच कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे कारण पुढे करत व्यापाऱ्यांकडूनच कल्याण-डोंबिवलीत पुन्हा लॉकडाऊन होणार असे वातावरण तयार केले जात असल्याने सर्वसामान्य पुन्हा धास्तावला आहे. कोरोनासोबत जगायचे असे सांगितले जात असताना पुन्हा लॉकडाऊन कशासाठी असा सवाल ते विचारत आहेत. यामागे राजकीय नेते, व्यापाºयांचे साटेलोटे तर नाही ना, अशी शंकेची पाल चुकचुकत आहे.दरम्यान, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीतही राजकीय नेत्यांनी लॉकडाऊनसाठी आग्रह धरला आहे. ८ जूनपासून जीवन पूर्वपदावर येत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढू लागले. मग व्यापाºयांनाही पुन्हा लॉकडाऊन होणार अशी पुडी सोडली. किराणा व अत्यावश्यक वस्तू खरेदी करा, असे दुकानदारच सांगू लागल्याने नागरिक धास्तावले आहेत. बहुतांश दुकाने सुरु केल्याने नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडला. त्यामुळेच पुन्हा लॉकडाऊन होणार, अशी चर्चा किराणा व्यापाºयांकडून केल्या जात आहेत. वास्तविक पाहता मुख्यमंत्र्यांनी नागरिकांशी संवाद साधताना पुन्हा लॉकडाऊन केला जाणार नाही, असे स्पष्ट केले होते. अशा परिस्थितीत कल्याण- डोंबिवलीत रुग्ण संख्या वाढल्याचे कारण पुढे करत लोकप्रतिनिधींनी पुन्हा लॉकडाऊनची मागणी केली. यातून राजकीय नेते व व्यापारी यांचे उखळ पांढरे होण्याचा वास येत आहे. राजकीय नेत्यांनी नागरिकांना वाटण्यासाठी मोठ्या प्रमाणात धान्य खरेदी केले. त्यामुळे एका दुकानदाराने सांगितले की, दिवाळीत जितका किराणा विकला जात नाही, त्याच्या कितीतरी पटीने किराणा विकला गेला. लॉकडाऊन ही किराणा दुकानदारांसाठी ‘दिवाळी’ ठरली. दिल्ली, बेंगळुरु, कोलकाता सारख्या शहरात पुन्हा लॉकडाऊन लागू केलेला नाही. कल्याण डोंबिवलीची लोकसंख्या १८ लाख असून एकूण लोकसंख्येपैकी २५० ते ३०० रुग्ण दिवसाला आढळत असतील तर एकूण लोकसंख्येच्या तुलनेत आढळणारे रुग्णांचे प्रमाण ०.१३ ते ०.१५ टक्के इतके आहे.।व्यापारी व नागरिकांच्या हितासाठी किमान १५ दिवसांचा कडक लॉकडाऊन घेणे गरजेचे आहे.- विजय पंडित, अध्यक्ष, कल्याण व्यापारी संघटना।कोरोना केवळ कपडे व सोने-चांदीच्या दुकानांतून पसरत नाही. त्यामुळे लॉकडाऊन लागू केल्यास त्यात भेदभाव नसावा. किराणा दुकानातून पावभाजी, केक तयार करण्यासाठी साहित्य खरेदीसाठी गर्दी आहे. त्यातून कोरोना पसरत नाही का? शंभर टक्के लॉकडाऊन केल्यास विरोध नाही. मात्र, अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली कुणालाही सूट दिली जाऊ नये.- राकेश मुथा, कपड्याचे व्यापारी