शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

खबरदार लॉकडाऊन कराल तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 00:13 IST

वस्तू घेण्यासाठी नागरिकांचे हाल झाले. त्यांना दुकानाबाहेर रांगा लावाव्या लागल्या. अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकले. देशात अस्थिरतेचे वातावरण पसरले.

मुरलीधर भवार कल्याण : कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर केल्यावर सर्व व्यवहार ठप्प झाले. वस्तू घेण्यासाठी नागरिकांचे हाल झाले. त्यांना दुकानाबाहेर रांगा लावाव्या लागल्या. अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकले. देशात अस्थिरतेचे वातावरण पसरले. मात्र काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी ‘अनलॉक १’ ची घोषणा करुन जीवन आता कुठे पूर्वपदावर येत असतानाच कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे कारण पुढे करत व्यापाऱ्यांकडूनच कल्याण-डोंबिवलीत पुन्हा लॉकडाऊन होणार असे वातावरण तयार केले जात असल्याने सर्वसामान्य पुन्हा धास्तावला आहे. कोरोनासोबत जगायचे असे सांगितले जात असताना पुन्हा लॉकडाऊन कशासाठी असा सवाल ते विचारत आहेत. यामागे राजकीय नेते, व्यापाºयांचे साटेलोटे तर नाही ना, अशी शंकेची पाल चुकचुकत आहे.दरम्यान, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीतही राजकीय नेत्यांनी लॉकडाऊनसाठी आग्रह धरला आहे. ८ जूनपासून जीवन पूर्वपदावर येत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढू लागले. मग व्यापाºयांनाही पुन्हा लॉकडाऊन होणार अशी पुडी सोडली. किराणा व अत्यावश्यक वस्तू खरेदी करा, असे दुकानदारच सांगू लागल्याने नागरिक धास्तावले आहेत. बहुतांश दुकाने सुरु केल्याने नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडला. त्यामुळेच पुन्हा लॉकडाऊन होणार, अशी चर्चा किराणा व्यापाºयांकडून केल्या जात आहेत. वास्तविक पाहता मुख्यमंत्र्यांनी नागरिकांशी संवाद साधताना पुन्हा लॉकडाऊन केला जाणार नाही, असे स्पष्ट केले होते. अशा परिस्थितीत कल्याण- डोंबिवलीत रुग्ण संख्या वाढल्याचे कारण पुढे करत लोकप्रतिनिधींनी पुन्हा लॉकडाऊनची मागणी केली. यातून राजकीय नेते व व्यापारी यांचे उखळ पांढरे होण्याचा वास येत आहे. राजकीय नेत्यांनी नागरिकांना वाटण्यासाठी मोठ्या प्रमाणात धान्य खरेदी केले. त्यामुळे एका दुकानदाराने सांगितले की, दिवाळीत जितका किराणा विकला जात नाही, त्याच्या कितीतरी पटीने किराणा विकला गेला. लॉकडाऊन ही किराणा दुकानदारांसाठी ‘दिवाळी’ ठरली. दिल्ली, बेंगळुरु, कोलकाता सारख्या शहरात पुन्हा लॉकडाऊन लागू केलेला नाही. कल्याण डोंबिवलीची लोकसंख्या १८ लाख असून एकूण लोकसंख्येपैकी २५० ते ३०० रुग्ण दिवसाला आढळत असतील तर एकूण लोकसंख्येच्या तुलनेत आढळणारे रुग्णांचे प्रमाण ०.१३ ते ०.१५ टक्के इतके आहे.।व्यापारी व नागरिकांच्या हितासाठी किमान १५ दिवसांचा कडक लॉकडाऊन घेणे गरजेचे आहे.- विजय पंडित, अध्यक्ष, कल्याण व्यापारी संघटना।कोरोना केवळ कपडे व सोने-चांदीच्या दुकानांतून पसरत नाही. त्यामुळे लॉकडाऊन लागू केल्यास त्यात भेदभाव नसावा. किराणा दुकानातून पावभाजी, केक तयार करण्यासाठी साहित्य खरेदीसाठी गर्दी आहे. त्यातून कोरोना पसरत नाही का? शंभर टक्के लॉकडाऊन केल्यास विरोध नाही. मात्र, अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली कुणालाही सूट दिली जाऊ नये.- राकेश मुथा, कपड्याचे व्यापारी