शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवस पाणी नसेल तर कसं जगायचं

By admin | Updated: December 8, 2015 00:29 IST

आजवर पालिकेत नसल्याने भोपर-देसलेपाड्याकडे कोणाचे लक्ष नव्हते. बेकायदा चाळी फोफावल्या. आधीच पाण्याचा प्रश्न बिकट होता

मुरलीधर भवार,  डोंबिवलीआजवर पालिकेत नसल्याने भोपर-देसलेपाड्याकडे कोणाचे लक्ष नव्हते. बेकायदा चाळी फोफावल्या. आधीच पाण्याचा प्रश्न बिकट होता. आता तो आणखी बिकट होत गेला. आठवड्यातून तीन-तीन दिवस पाणी नसेल, तर सांगा कसं जगायचं... डोळ््यांत पाणी आणून मनातली धगधग व्यक्त करत महिला विचारत होत्या. उन्हाळ्याची तीव्रता सुरू होण्यापूर्वीच दोघांचे जीव गेले आहेत. येत्या सहा-सात महिन्यांत आणखी काय भोगायला लागणार आहे, असा संतप्त प्रश्नही त्यांनी लोकमतच्या माध्यमातून पालिका अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना विचारला. निवडणुकीपूर्वी कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट केलेल्या भोपर-देसलेपाडा परिसरात आठवड्यात तीन दिवस पाणी येत नाही. उरलेले चार दिवस कमी दाबाने येते. श्रीसमर्थ कृपा चाळीत राहणाऱ्या प्रमिला अंजारा यांच्या घरी शनिवारी पाणी आले नव्हते. नेव्हीच्या रुग्णालयात कामाला असल्याने त्यांना रविवारी सुटी होती. कपडे धुण्यासाठी त्या नजीकच्या खदाणीवर गेल्या होत्या. त्या वेळी सोबत १८ वर्षांचा मुलगा निखिलही होता. आई कपडे धुताना पाण्यात पडल्याचे पाहताच तिला वाचविण्यासाठी तोही पाण्यात उतरला. पण पोहता येत नसल्याने तो आणि आई दोघेही बुडाले. त्यांच्या मृत्यूला जशी परिसरातील पाणीटंचाई जबाबदार आहे, तसेच त्याकडे दुर्लक्ष करणारे अधिकारी आणि लोकप्रतिनिधीही जबाबदार आहेत, असा आरोप परिसरातील महिलांनी केला. प्रमिला यांच्या शेजारणीने सांगितले, शनिवारी पाणी न आल्याने त्या प्रथमच खदाणीवर गेल्या. सकाळी सात ते दुपारी दोन या वेळेत पाणी येते, तेदेखील कमी दाबाने. त्यामुळे खूप हाल होतात. या परिसरात राहणाऱ्या कविता जाधव म्हणाल्या, गेल्या महिनाभरात शुक्रवार, शनिवार आणि रविवार सलग तीन दिवस पाणी येत नाही. त्यामुळे हाल होतात. यापूर्वी आम्ही दुुसऱ्या चाळीत राहत होतो. ती जागा आम्ही विकली. दुसरीकडे भाड्याने राहण्यासाठी गेलो. जागा बदलली पण पाण्याचा प्रश्न सुटला नाही. माय-लेकांचा जीव गेल्याची घटना ऐकून आमच्यावरही अशीच वेळ येते का, अशी भीती आम्हाला सतावू लागली आहे. ज्येष्ठ महिला मनकर नायंगले यांनी सांगितले, दोन वर्षांपूर्वी आम्ही या परिसरात साडेचार लाख रुपये मोजून घर घेतले. घर विकताना चाळमालकाने आम्हाला पाणी चांगल्या प्रकारे येते असे भासविले. घर घेतल्यानंतर काही महिन्यांत पाण्याचा त्रास समोर आला. पुन्हा दोन हजार रुपये खर्च करून दुसऱ्या वाहिनीवरून नळजोडणी घेतली. तरीदेखील पुरेसे पाणी येत नाही. ज्या खदाणीत मायलेकांचा मृत्यू झाला. त्या खदाणीच्या बाहेरच भोपर, देसलेपाडा ग्रामपंचायतीने बोर्ड लावला आहे... पाणी खोल असल्याने कपडे धुणे व पोहण्यास सक्त मनाई असल्याचा उल्लेख त्यावर आहे. भोपर, देसलेपाडा आता महापालिका हद्दीत आहे. पालिकेतर्फे तेथे कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही. खदाणीतील पाणी कपडे धुण्यासाठी वापरले जाते. तसेच जवळच्या वीटभट्टीवर विटा तयार करण्यासाठीही त्याचा वापर होतो. ज्येष्ठ नागरिक महादेव देसले यांनी सांगितले. अनेक जण या खदाणीत बुडाले आहेत. त्याचा नेमका आकडा त्यांना सांगता आला नाही. काही वर्षांपूवी खदाणीभोवती तारेचे कुंपण घातले होते. ते पुढे काही लोकांनी काढून फेकून दिले.