शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

मागण्यांबाबत तोडगा न निघाल्यास शेतकऱ्यांप्रमाणे आंदोलन , १४ एप्रिल रोजी होणार समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 03:40 IST

ओबीसींच्या विविध मागण्यांसंदर्भात डिसेंबरमध्ये नागपूरहून निघालेली राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलची राज्यस्तरीय जागृती रॅली बुधवारी कल्याणमधून मार्गस्थ झाली.

कल्याण : ओबीसींच्या विविध मागण्यांसंदर्भात डिसेंबरमध्ये नागपूरहून निघालेली राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलची राज्यस्तरीय जागृती रॅली बुधवारी कल्याणमधून मार्गस्थ झाली. या वेळी ओबीसींच्या मागण्यांसंदर्भात १४ एप्रिलपर्यंत योग्य तो तोडगा न निघाल्यास शेतकºयांप्रमाणे ओबीसीही आंदोलन छेडतील, असा इशारा ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी या वेळी दिला.१९ डिसेंबरला या जागृती अभियान रॅलीला प्रारंभ झाला आहे. १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी तिचा समारोप होणार आहे.कल्याणमार्गे बुधवारी ही रॅली पुढे मार्गस्थ झाली. या वेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते, राजेश शिंदे, राजेंद्र नांदोस्कर, प्रसन्न अचलकर, एकनाथ म्हात्रे, निरंजन भोसले व कार्यकर्ते सहभागी झाले होते. या रॅलीचे नेतृत्व ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष बाळबुधे करत आहेत.मागासवर्ग आयोगावर ओबीसी समाजाचा अध्यक्ष असावा. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह उभारावे. ओबीसींची जातनिहाय जनगणना जाहीर करून त्यांना केंद्र सरकारच्या नीती आयोगाकडून निधीची वेगळी तरतूद करावी. ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला पाच हजार कोटी रुपये भांडवल द्यावे. उद्योग-व्यवसायासाठी १० लाखांपर्यंत कर्जमर्यादा वाढवावी. क्रिमिलेअरची अट रद्द करावी. स्वामिनाथन समितीच्या शिफारशींची तातडीने आणि ठोस अंमलबजावणी करा. मंडल कमिशनची १०० टक्के अंमलबजावणी करा. शेतकºयांच्या मुलीच्या लग्नासाठी अर्थसाहाय्य उपलब्ध करा. त्याचबरोबर शेतकºयांच्या तरुण मुलांना उद्योगासाठी विनाव्याज कर्ज द्या. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, महापालिकांमध्ये ओबीसी आरक्षण आहे, पण विधानसभा व लोकसभेत ओबीसींना २७ टक्के आरक्षण मिळाले पाहिजे. तीन वर्षांपासून प्रलंबित शिष्यवृत्ती व फ्री-शिप ताबडतोब अदा करावी. स्पर्धा परीक्षेत महिलांना क्रिमिलेअरची जाचक अट रद्द करावी तसेच देशात १६०० ओबीसी विद्यार्थी आयएएस झाले आहेत, परंतु नॉन-क्रिमिलेअरच्या अटीमुळे या प्रक्रियेतून त्यांना बाद ठरवले गेले. त्यांना पुन्हा संधी द्यावी, अशा प्रमुख मागण्या ओबीसी सेलच्या असल्याकडे बाळबुधे यांनी या वेळी लक्ष वेधले.>उल्हासनगरकडे रॅली मार्गस्थबुधवारी सकाळी ११ च्या सुमारास शीळफाटामार्गे कल्याण ग्रामीण भागात निघालेली ही अभियान रॅली पुढे मानपाडा, गोळवली, कल्याण पूर्वेकडील सूचकनाका, चक्कीनाका, तिसगाव चौक, काटेमानिवली, विठ्ठलवाडी रेल्वेस्थानक, वालधुनी उड्डाणपूलमार्गे कल्याण पश्चिमेकडील सुभाष चौक, पौर्णिमा चौक, बिर्ला महाविद्यालय, खडकपाडा चौक, आधारवाडी चौक, लालचौकी, पारनाका, टिळक चौक, महापालिका मुख्यालय, शिवाजी चौक, बाजारपेठमार्गे नेहरू चौक यानंतर महात्मा फुले चौकमार्गे उल्हासनगरकडे या रॅलीचे प्रस्थान झाले.