शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

पुन्हा लॉकडाऊन झाल्यास लघुउद्योग कोलमडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने लॉकडाऊनचे संकेत दिले जात आहेत. परंतु, तसे झाल्यास ठाणे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने लॉकडाऊनचे संकेत दिले जात आहेत. परंतु, तसे झाल्यास ठाणे जिल्ह्यातील लघुउद्योग पूर्णपणे कोलमडणार असल्याचे चित्र आहे. पुन्हा लॉकडाऊन नकोच असेच म्हणणे या उद्योगांनी कथन केले आहे. नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले पाहिजे, अन्यथा सर्वांनाच त्याचे भोग भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला. कोरोना नंतर आता कुठे उद्योगधंदे सावरण्याच्या तयारीत आले आहेत. परंतु, पुन्हा जर लॉकडाऊन झाला तर ते न परवडणारे असेल, अशी भीतीही व्यक्त केली आहे.

नागरिकांकडून होत असलेल्या चुकांमुळे पुन्हा कोरोना वाढताना दिसत आहे. आधी घेतलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे कंबरडे मोडले आहे. उत्पन्नाची साधनेही तोकडी झाली आहेत. अशात आता पुन्हा तो घेतला गेला तर उद्योगांपुढे मोठे संकट उभे राहणार आहे. वागळे इस्टेट भागात आशिया खंडातील सर्वांत मोठी उद्योग संस्था येथे होती. परंतु, आता हातावरच्या बोटावर मोजता येतील एवढे उद्योग येथे कसेबसे तग धरून आहेत. त्यात मागील वर्षी झालेल्या लॉकडाऊनचा फटका या उद्योगांना बसलेला आहे. उद्योगधंदे बंद असतांनाही कामगारांचे पगार, भरमसाठ वीजबिल, पाणीबिल या उद्योगांनी आता कुठे भरले आहे. त्यातून आता कुठे ते सावरण्याच्या तयारीत आले आहेत. परंतु पुन्हा लॉकडाऊन घेतला तर ते परवडणारे नसल्याचे येथील उद्योजक सांगत आहेत. ठाण्यात तीन हजारांच्या आसपास उद्योगधंदे शिल्लक राहिलेले आहेत. त्यात आता कुठे येथे कामगार पुन्हा कामावर येऊ लागले आहेत. परंतु, लॉकडाऊन झाल्यास कामगार परत जातील, अशी भीती तर आहेच, शिवाय मार्चअखेर जवळ येत असल्याने सर्वच गणित कोलमडून पडणार आहे. जीएसटी रिटर्न असेल किंवा इतर रिटर्न भरण्यासाठीदेखील वेळ मिळणार नाही. याशिवाय जे काही ग्राहक किंवा इतर कंपन्या जोडल्या गेल्या आहेत. तेदेखील पाठ फिरवतील अन् त्यातून खूप मोठे नुकसान उद्योगांना सहन करावे लागणार आहे.

.......

कोरोनाचे रुग्ण-६१,१२६

बरे झालेले रुग्ण-५८,५२९

कोरोना बळी-१,३८०

धोका वाढतोय

मागील दीड ते दोन महिने कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात होती. परंतु, गेल्या आठ ते दहा दिवसांपासून ठाण्यात कोरोनारुग्णांची संख्या वाढवत आहे. राज्यातील इतर काही जिल्ह्यांसारखीच ठाण्याचीही परिस्थिती निर्माण होऊ पाहत आहे. ठाण्यात रुग्णांची संख्या पुन्हा दुपटीने वाढताना दिसत आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने पुन्हा नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोरोनासेंटर सज्ज केले आहेत. शहराच्या अनेक भागांत आजही मार्केट परिसरातही गर्दी दिसत आहे. मास्क न घालता वावरणाऱ्यांचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. त्यामुळेच हा धोका आणखी वाढला आहे.

आठवडाभरात वाढली रुग्णांची संख्या

मागील दीड ते दोन महिने रुग्णवाढीचा दर सारखा होता. ८० ते १०० च्या आतमध्ये रुग्ण आढळत होते. परंतु, गेल्या सात दिवसांत रुग्णवाढ अधिक होताना दिसत आहे. आता दिवसाला १०० ते १७५ पर्यंत ते आढळत आहेत. सात दिवसांपूर्वी रुग्णवाढ ही २.१० टक्के एवढा होती. ती आता वाढून ५.१२ टक्क्यांवर आली आहे.

......

सर्व जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शासनाने योग्य निर्णय घेतला आहे की मास्क लावा ,अंतर राखा आणि पुन्हा लॉकडाऊन टाळा. परंतु, मूठभर न ऐकणाऱ्या लोकांमुळे लॉकडाऊन न करता मास्क न लावणाऱ्याविरुद्ध थोडे कडक निर्बंध घाला. कारण लॉकडाऊन कोणालाही परवडणारा नाही. आता कुठे उद्योग आपले डोके वर काढत आहेत. मार्च अखेरचे कामाचे प्रेशर आहे. ऑर्डर रद्द होऊ शकतात.

- सुजाता सोपारकर, वरिष्ठ उपाध्यक्ष, ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रिज असोसिएशन

.....

आता कुठे उद्योग व्यवसाय वेग घेत आहेत. कामगार नुकतेच कामावर परत येत आहेत.आता बंद करणे म्हणजे उद्योगासमोर मोठे आव्हान आहे. उद्योगांचे प्रचंड नुकसान होईल हा एक भाग पण ग्राहक नाखूष होतील ऑर्डर जातील त्याचे काय. मार्चअखेर कामाचे प्रेशर आहेच. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेक शासकीय कामे/रिटर्न्स भरणे थांबतील, त्यापेक्षा मास्क न लावणाऱ्यावर कडक निर्बंध घाला.

- संदीप पारिख, वरिष्ठ उपाध्यक्ष, कोसिआ

-----------

आधीच्या लॉकडाऊनमुळे मेटाकुटीस आलेल्या व्यापाऱ्यांची गाडी आता कुठे रुळावर येत आहे. शासनाने योग्य निर्णय घेतला आहे की मास्क लावा, अंतर ठेवा व लॉकडाऊन टाळा. पुन्हा लॉकडाऊन परवडणारा नाही त्यापेक्षा कडक निर्बंध लावा, मास्क न लावणाऱ्यावर कारवाई करा.

- भावेश मारू, मानद सचिव, ठाणे व्यापारोद्योग महासंघ

-------