शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

राजकारणी नाचले तरच नाट्यसंमेलन यशस्वी होईल - अशोक समेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 05:53 IST

राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे नाट्यसंमेलनाच्या अनिश्चिततेबाबत नाट्य परिषदेच्या भूमिकेचा आम्ही निषेध करतो, असे वक्तव्य ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ आणि ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी ‘लोकमत’कडे केले.

प्रज्ञा म्हात्रे ठाणे : राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे नाट्यसंमेलनाच्या अनिश्चिततेबाबत नाट्य परिषदेच्या भूमिकेचा आम्ही निषेध करतो, असे वक्तव्य ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ आणि ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी ‘लोकमत’कडे केले. नाट्यसंमेलनाच्या रंगमंचावर राजकारणी नाचले तरच तुमचे संमेलन यशस्वी होणार आहे का, असा सवाल करतानाच सरकारी मदतीखेरीज नाट्य परिषदेला संमेलन करता येत नसेल, तर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावे, अशी मागणी समेळ यांनी केली.महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती अस्थिर असल्याने नाट्यसंमेलन पुढे का ढकलायचे, असा सवाल समेळ यांनी केला तर उद्या पाच वर्षे कोणतेही सरकार आले नाही आणि अशीच अस्थिर परिस्थिती राहिली, राष्ट्रपती राजवट सुरू राहिली तर पाच वर्षे कोणतेही संमेलन घेणार नाहीत का? असा सवाल बागवे यांनी केला.ठाण्यात गुरुवारी गंधार गौरव सोहळा पार पडला. त्यानंतर ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी हा निषेधाचा सूर व्यक्त केला. समेळ म्हणाले की, नाट्य परिषदेने नाट्यसंमेलन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले आहे, असे अलीकडेच जाहीर केले. अस्थिर राजकारणामुळे नाट्यसंमेलन पुढे ढकलण्याचे कारण काय? नाट्यसंमेलन मराठी प्रेक्षकांसाठी आहे. तेथे राजकारण कशाला यायला हवे. नाट्यसंमेलनासाठी मराठी नाट्यरसिकांकडे देणगी मागितल्यास कोट्यवधी रुपये जमा होतील. नाट्यसंमेलनाकरिता सरकारकडून पैसे मागण्याची गरज नाही. सरकारच्या पैशांखेरीज नाट्यसंमेलन करून दाखवावे. ती ताकद नसेल तर राजीनामा द्यावा आणि गप्प बसावे. राजकारण्यांनी पैसा दिला किंवा ते स्टेजवर येऊन नाचले तरच तुमचे नाट्यसंमेलन होणार आहे का? नाट्यसंमेलन पुढे ढकलण्याच्या भूमिकेचा मी निषेध करतो, असे समेळ म्हणाले. आजही मराठी रसिकांना आवाहन करा, ते त्यांच्या खिशातून लाखो रुपये काढून देतील आणि तुमचे नाट्यसंमेलन करतील, असेही ते म्हणाले.बागवे म्हणाले की, आमच्या सूत्रांकडून कळले आहे की, नाट्यसंमेलन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले आहे. साहित्यसंमेलन आता जानेवारीमध्ये आहे ते पण पुढे ढकलणार का? एवढे मोठे महानाट्य महाराष्ट्राच्या रंगभूमीवर चालले असल्यामुळे नाट्यसंमेलन पुढे ढकलले आहे का? सरकार देत असलेल्या देणगीमूल्यावर सर्व संमेलने होत असतात. मग आपण सगळे कलाकार, लेखक इतके लाचार झालो आहोत, की राजकीय अस्थिरतेमुळे आपली संमेलने, आपले सांस्कृतिक कार्यक्रम पुढे ढकलावे? आता या सगळ्या कलाकारांनीच या राजकारण्यांना कुठेतरी ढकलावे. सामान्य रसिकांना संमेलने व्हावी आणि त्यांच्या प्रगल्भतेत वाढ व्हावी, असे वाटत असते. नाट्यसंमेलन नावाची एवढी मोठी गोष्ट राजकीय अस्थिरतेमुळे पुढे ढकलत असतील, तर आम्ही आमची नाराजी प्रकट करणार.संमेलन म्हणजे सर्वजण एकत्र येणे. राजकीय लोक एकत्र येत नाहीत. पण कलाकार एकत्र येतात. नाट्यसंमेलन रसिकांच्या देणगीतून होऊ शकते. एका सभागृहात साधेपणाने संमेलन घेता येईल. कोणत्याही कलाकाराला मानधन द्यायचे नाही. जेवणाचे डबे आणायचे असतील, त्याला आमची हरकत नाही. अशी साधेपणाने संमेलने होऊ शकतात, हे लोकांना दाखवून देण्याची गरज आहे, असे बागवे म्हणाले.संमेलनाच्या मंचावर राजकीय नेते कशाला पाहिजेत. कुठल्याही संमेलनाच्या व्यासपीठावर स्वागताध्यक्ष राजकीय नेता हवा असतो, कारण तो पैसे देतो, त्याचा कलेशी काही संबंध नसतो. त्याचा ‘न कलेशी’ संबंध असतो. त्यामुळे नाट्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना सांगावे वाटते की, आपण आपली कला राजकारण्यांवर सोपवू नये. या राजकारण्यांना आपण सांगितले पाहिजे, कलेतून कसे एकत्र यावे. संमेलन कसे करावे आणि रसिकांना आनंद कसा द्यावा. नाट्यसंमेलन पुढे ढकलले याचा आंतरिक निषेध करतोय, असेही बागवे म्हणाले.>'महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती अस्वस्थ करणारी'सध्याची महाराष्ट्रातील राजकीय स्थिती एक कलाकार म्हणून अस्वस्थ करणारी आहे. जनतेने तुम्हाला कौल दिला होता. कुणी राज्य करावे व कुणी विरोधात बसावे, हे स्पष्ट निर्देशित केले होते. आपणाला जनतेसाठी काम करायचे की वैयक्तिक हिताकरिता काम करायचे, याचा विचार राजकारण्यांनी करावा. मात्र सारेच पक्ष आपले घोडे दामटण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे मला मान्य नाही. आजची राजकीय परिस्थिती चिंताजनक आहे. -अशोक समेळ