शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

राजकारणी नाचले तरच नाट्यसंमेलन यशस्वी होईल - अशोक समेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 05:53 IST

राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे नाट्यसंमेलनाच्या अनिश्चिततेबाबत नाट्य परिषदेच्या भूमिकेचा आम्ही निषेध करतो, असे वक्तव्य ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ आणि ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी ‘लोकमत’कडे केले.

प्रज्ञा म्हात्रे ठाणे : राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे नाट्यसंमेलनाच्या अनिश्चिततेबाबत नाट्य परिषदेच्या भूमिकेचा आम्ही निषेध करतो, असे वक्तव्य ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ आणि ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी ‘लोकमत’कडे केले. नाट्यसंमेलनाच्या रंगमंचावर राजकारणी नाचले तरच तुमचे संमेलन यशस्वी होणार आहे का, असा सवाल करतानाच सरकारी मदतीखेरीज नाट्य परिषदेला संमेलन करता येत नसेल, तर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावे, अशी मागणी समेळ यांनी केली.महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती अस्थिर असल्याने नाट्यसंमेलन पुढे का ढकलायचे, असा सवाल समेळ यांनी केला तर उद्या पाच वर्षे कोणतेही सरकार आले नाही आणि अशीच अस्थिर परिस्थिती राहिली, राष्ट्रपती राजवट सुरू राहिली तर पाच वर्षे कोणतेही संमेलन घेणार नाहीत का? असा सवाल बागवे यांनी केला.ठाण्यात गुरुवारी गंधार गौरव सोहळा पार पडला. त्यानंतर ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी हा निषेधाचा सूर व्यक्त केला. समेळ म्हणाले की, नाट्य परिषदेने नाट्यसंमेलन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले आहे, असे अलीकडेच जाहीर केले. अस्थिर राजकारणामुळे नाट्यसंमेलन पुढे ढकलण्याचे कारण काय? नाट्यसंमेलन मराठी प्रेक्षकांसाठी आहे. तेथे राजकारण कशाला यायला हवे. नाट्यसंमेलनासाठी मराठी नाट्यरसिकांकडे देणगी मागितल्यास कोट्यवधी रुपये जमा होतील. नाट्यसंमेलनाकरिता सरकारकडून पैसे मागण्याची गरज नाही. सरकारच्या पैशांखेरीज नाट्यसंमेलन करून दाखवावे. ती ताकद नसेल तर राजीनामा द्यावा आणि गप्प बसावे. राजकारण्यांनी पैसा दिला किंवा ते स्टेजवर येऊन नाचले तरच तुमचे नाट्यसंमेलन होणार आहे का? नाट्यसंमेलन पुढे ढकलण्याच्या भूमिकेचा मी निषेध करतो, असे समेळ म्हणाले. आजही मराठी रसिकांना आवाहन करा, ते त्यांच्या खिशातून लाखो रुपये काढून देतील आणि तुमचे नाट्यसंमेलन करतील, असेही ते म्हणाले.बागवे म्हणाले की, आमच्या सूत्रांकडून कळले आहे की, नाट्यसंमेलन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले आहे. साहित्यसंमेलन आता जानेवारीमध्ये आहे ते पण पुढे ढकलणार का? एवढे मोठे महानाट्य महाराष्ट्राच्या रंगभूमीवर चालले असल्यामुळे नाट्यसंमेलन पुढे ढकलले आहे का? सरकार देत असलेल्या देणगीमूल्यावर सर्व संमेलने होत असतात. मग आपण सगळे कलाकार, लेखक इतके लाचार झालो आहोत, की राजकीय अस्थिरतेमुळे आपली संमेलने, आपले सांस्कृतिक कार्यक्रम पुढे ढकलावे? आता या सगळ्या कलाकारांनीच या राजकारण्यांना कुठेतरी ढकलावे. सामान्य रसिकांना संमेलने व्हावी आणि त्यांच्या प्रगल्भतेत वाढ व्हावी, असे वाटत असते. नाट्यसंमेलन नावाची एवढी मोठी गोष्ट राजकीय अस्थिरतेमुळे पुढे ढकलत असतील, तर आम्ही आमची नाराजी प्रकट करणार.संमेलन म्हणजे सर्वजण एकत्र येणे. राजकीय लोक एकत्र येत नाहीत. पण कलाकार एकत्र येतात. नाट्यसंमेलन रसिकांच्या देणगीतून होऊ शकते. एका सभागृहात साधेपणाने संमेलन घेता येईल. कोणत्याही कलाकाराला मानधन द्यायचे नाही. जेवणाचे डबे आणायचे असतील, त्याला आमची हरकत नाही. अशी साधेपणाने संमेलने होऊ शकतात, हे लोकांना दाखवून देण्याची गरज आहे, असे बागवे म्हणाले.संमेलनाच्या मंचावर राजकीय नेते कशाला पाहिजेत. कुठल्याही संमेलनाच्या व्यासपीठावर स्वागताध्यक्ष राजकीय नेता हवा असतो, कारण तो पैसे देतो, त्याचा कलेशी काही संबंध नसतो. त्याचा ‘न कलेशी’ संबंध असतो. त्यामुळे नाट्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना सांगावे वाटते की, आपण आपली कला राजकारण्यांवर सोपवू नये. या राजकारण्यांना आपण सांगितले पाहिजे, कलेतून कसे एकत्र यावे. संमेलन कसे करावे आणि रसिकांना आनंद कसा द्यावा. नाट्यसंमेलन पुढे ढकलले याचा आंतरिक निषेध करतोय, असेही बागवे म्हणाले.>'महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती अस्वस्थ करणारी'सध्याची महाराष्ट्रातील राजकीय स्थिती एक कलाकार म्हणून अस्वस्थ करणारी आहे. जनतेने तुम्हाला कौल दिला होता. कुणी राज्य करावे व कुणी विरोधात बसावे, हे स्पष्ट निर्देशित केले होते. आपणाला जनतेसाठी काम करायचे की वैयक्तिक हिताकरिता काम करायचे, याचा विचार राजकारण्यांनी करावा. मात्र सारेच पक्ष आपले घोडे दामटण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे मला मान्य नाही. आजची राजकीय परिस्थिती चिंताजनक आहे. -अशोक समेळ