शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

बदली न केल्यास सुट्टीवर जाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 01:29 IST

ज्यांनी माझा ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसीडर म्हणून वापर केला, ज्यांच्या नजरेत मी कालपर्यंत हीरो होतो, त्यांनीच मला आज झीरो केले आहे.

ठाणे : ज्यांनी माझा ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसीडर म्हणून वापर केला, ज्यांच्या नजरेत मी कालपर्यंत हीरो होतो, त्यांनीच मला आज झीरो केले आहे. माझ्यावर वैयक्तिक टीका करुन माझ्या बदनामीचे प्रयत्न केले जात असल्याचा टोला ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सत्ताधारी भाजपाचा उल्लेख न करता लगावला. भाजपाचे गटनेते मिलिंद पाटणकर यांनी सातत्याने जयस्वाल यांना लक्ष्य केले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पाटणकर यांची टीका रोखली नसल्याने ते व्यथित झाल्याचे चित्र दिसले. एप्रिलपर्यंत बदली झाली नाही तर बदलीचे आदेश प्राप्त होईपर्यंत मी सुट्टीवर जाईन, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.जयस्वाल म्हणाले की, मलाच आयुक्तपदी राहण्याची अजिबात इच्छा नाही. परंतु शासन माझी बदली करीत नाही, त्यामुळे आता सभागृहानेच माझ्या विरोधात अविश्वास ठराव करावा आणि मला येथून परत पाठवावे. आईशप्पथ मी या ठरावाला कोणताही विरोध करणार नाही.ठाणे पालिकेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जयस्वाल यांच्या कामाची तारीफ केली होती व त्यांना आलेल्या धमक्यांचा मुद्दा प्रचारात मांडून शिवसेनेला लक्ष्य केले होते. साहजिकच जयस्वाल ब्रँडचा वापर भाजपाने केला होता. मात्र वर्षभरातच महापालिकेतील भाजपाचे गटनेते पाटणकर यांनी जयस्वाल यांच्यावर सातत्याने आरोप, टीका यांचा भडीमार सुरु केल्याने ते दु:खी झाले आहेत.मंगळवारी महासभा सुरु होताच, मुंब्रा स्टेडीयमच्या मुद्यावरुन राष्टÑवादी आणि भाजपामध्ये चांगलेच वातावरण तापले होते. तसेच याच महासभेत भाजपाचे गटनेते पाटणकर यांनी पोलिसांना बुलेट देण्याच्या प्रकरणावरुन सभा तहकुबी मांडली होती. त्यामुळे प्रशासनातील सर्वच अधिकारी चिंतेत होते. त्यातच मुंब्य्राच्या स्टेडीअमवर सुरु असलेल्या वादाच्या वेळेस भाजपाच्या नगरसेवकाने प्रशासनाने मोबाईलवर वाचलेल्या पत्रावर आक्षेप घेतल्याने आयुक्त संतप्त झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या बदलीसाठी भावनिक आवाहन केले. स्थायी समिती नसल्याने ३५ (अ) नुसार प्रशासकीय वित्तीय मान्यतेचे विषय हे महासभेच्या पटलावर येत असतात. त्यामुळे महासभेत येणाºया विषयांची संख्या वाढली आहे. परंतु, काही मंडळी प्रशासनावर बोट ठेवत आहेत हे चुकीचे आहे. तीन वर्षे मी माझे घरदार विसरुन शहराचा विकास व्हावा यासाठी दिवस-रात्र प्रयत्न केले. परंतु आॅक्टोबर महिन्यात माझी ज्या पध्दतीने वैयक्तिक बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हापासूनच मी व्यथित होतो. माझी बदली व्हावी यासाठी मी प्रयत्न करीत होतो. परंतु माझी बदलीची विनंती मान्य झाली नसल्याचेही जयस्वाल यांनी कबुल केले. काही राजकीय घटकांनी माझ्या विरोधात वातावरण तयार करुन मला बदनाम करण्याचे कारस्थान रचले. काहींनी माझी बदली व्हावी यासाठी प्रयत्न केले. तीन वर्षात ज्या मंडळींनी माझा वापर ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसीडेर म्हणून केला, ज्यांनी मला हिरो ठरवले. त्याच लोकांनी माझ्यावर वैयक्तिक टीका करुन एका क्षणात झिरो ठरवण्याचा प्रयत्न केला, अशी टीका त्यांनी भाजपाचा उल्लेख न करता केली. मला हुकमशहा, औरंगजेब अशा उपाधी देऊन माझ्यावर टीका झाली. मी संवेदनशील असल्याने मला याचे दु:ख होते. माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्याचे मला जास्त दु:ख होत असल्याचे त्यांनी सांगितले. भांडणे कोणाची होत नाही, असा सवाल जयस्वाल यांनी केला.हीरोचा झिरो करण्याचा प्रयत्नब्रॅन्ड अ‍ॅम्बेसीडर म्हणून ज्यांनी माझा वापर केला, हीरो ठरवले. त्यांनीच हुकमशहा, औरंगजेब अशी उपाधी देत, वैयक्तिक टीका करुन एका क्षणात झिरो ठरवण्याचा प्रयत्न केला, अशी टीका त्यांनी भाजपाचा उल्लेख न करता केली. सभागृहानेच माझ्या विरोधात अविश्वास ठराव करावा आणि मला येथून परत पाठवावे, असे तेम्हणाले.कुणी माझ्यावर कितीही टीका केली तरी जनतेच्या मनात माझे रिपोर्ट कार्ड तयार आहे. त्यामुळे मला टीकेची मुळीच चिंता वाटत नाही. परंतु आता मलाच या शहराच्या आयुक्तपदी राहायचे नाही. त्यासाठी आजपासूनच मी सुट्टीवर जाणार होतो. परंतु रात्री मला एकाने आश्वासन दिल्याने मी सुट्टी रद्द केली आहे. माझ्यावर अविश्वासाचा ठराव जे मांडतील त्यांचे मी मनापासून आभार मानेन, असेही त्यांनी यावेळी सांगितले.मी बदलीची वाट पाहीन. एप्रिलपर्यंत जर माझी बदली झाली नाही, तर मात्र जोपर्यंत माझ्या बदलीची आॅर्डर येत नाही, तोपर्यंत मी सुट्टीवर जाईन, असा इशाराही त्यांनी सभागृहातील आपल्या भाषणादरम्यान दिला.माझेही सभागृहातील सदस्यांबरोबर कित्येक वेळेला भांडण झाले. परंतु त्याचा राग मनात ठेवत मी कधीही ते वैयक्तिक पातळीवर नेले नाही किंवा त्यावरून कुणावर वैयक्तिक टीका केली नाही. मात्र माझ्यावर वैयक्तिक आरोप करत माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न झाला, असे जयस्वाल म्हणाले.