शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

रिक्षात दोनपेक्षा जास्त प्रवासी घेतल्यास उगारू कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 23:45 IST

मीरा राेड :  भाईंदरमध्ये दोनऐवजी तीन ते चार प्रवासी घेऊन भाडे मात्र वाढीव आकारणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करणार असल्याचा इशारा ...

मीरा राेड :  भाईंदरमध्ये दोनऐवजी तीन ते चार प्रवासी घेऊन भाडे मात्र वाढीव आकारणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करणार असल्याचा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे. या शिवाय रिक्षा स्थानक जाहीर करणे, रिक्षांवर माहितीचा स्टिकर लावणे आदी मुद्द्यांवरही चर्चा झाली.

सरकारने कोरोनाच्या अनुषंगाने रिक्षात दोन प्रवासीच बसविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे भाईंदरमध्ये शेअर भाडे घेणाऱ्या रिक्षांमध्ये तीनऐवजी दोन प्रवासी घ्यायचे, म्हणून शेअर भाडे मात्र प्रति प्रवासी ५० टक्के पेक्षा जास्त घेतले जात आहेत. किमान शेअर भाडे १० रुपये होते, पण दोन प्रवासी घ्यायचे, म्हणून किमान शेअर भाडे १५ रुपये केले आहे. त्याप्रमाणेच अंतरानुसार शेअर भाडे वाढविले आहे. उत्तनसाठी तर ३० चे ५० रुपये प्रति प्रवासी केले आहेत.

एकीकडे दोन प्रवासी घ्यायचे, म्हणून भाडे वाढविणाऱ्या अनेक रिक्षाचालकांनी चक्क तीन ते चार प्रवासी घेत, भाडे मात्र जास्तीचेच वसूल करून प्रवाशांची लूट चालविल्याच्या तक्रारी होऊ लागल्या. रात्रीच्या वेळी तर सर्रास तीन ते चार प्रवासी भरले जातात. यावरून प्रवाशांसोबत रिक्षाचालकांचे वाद होऊ लागले. मीटरप्रमाणे भाडे नेणे बंधनकारक असताना, मीटर न टाकता मनमानी भाडे सांगितले जाते. याबाबत शुक्रवारी सायंकाळी भाईंदर पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे, उपनिरीक्षक एम. जी. पाटील यांच्यासह रिक्षा संघटनांचे पदाधिकारी, रिक्षाचालक, नगरसेवक सुरेश खंडेलवाल, ध्रुवकिशोर पाटील आदींची चर्चा झाली.

यावेळी काही रिक्षाचालकांनी पाटील यांच्यावर राग व्यक्त करत, तुम्ही जुने असून सर्वांना ओळखता, तरीही आमच्याकडे अडचण न सांगता, थेट सरसकट सर्व रिक्षाचालकांवर लूट करत असल्याचे आरोप करता हे योग्य नाही, असे खडे बोल सुनावले. काही रिक्षाचालक जास्त प्रवासी घेतात हे मान्य करत त्यांच्यावर कारवाई करा. आम्ही मध्ये येणार नाही, असे संघटनांनी स्पष्ट केले. रेल्वे स्थानकाजवळील सुशोभीकरणाच्या कामामुळे होणारी वाहतूककोंडी, अधिकृत रिक्षा स्थानक करून देणे, बोगस व परवाने नसलेल्या रिक्षांवर कारवाई करणे आदी मुद्देही चर्चेत आले.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर