शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

फेरीवाला बसल्यास फोटो काढा अन् संपर्क साधा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 00:16 IST

महापालिकेच्या लोगोसह केलेल्या फलकबाजीने वेधले लक्ष; केडीएमसी प्रशासन मात्र अनभिज्ञ

डोंबिवली : केडीएमसीकडून फेरीवाला पुनर्वसन धोरणाच्या अंमलबजावणीबाबत वेळकाढूपणा सुरू असताना दुसरीकडे पूर्वेतील फडके मार्गावर एका ठिकाणी महापालिकेच्या लोगोसह लावलेल्या दोन सूचनाफलकांनी मात्र सर्वांचे लक्ष वेधले आहे. बेकायदा फेरीवाले, हातगाडीवाले बसल्यास फोटो काढा, तत्काळ संपर्क साधावा व लेखी तक्रार करावी, असे आवाहन महापालिकेने केल्याचे त्यावर म्हटले आहे. परंतु, हा फलक केडीएमसीने लावला नसल्याचे ‘फ’ प्रभाग अधिकारी अरुण भालेराव हे सांगत असले तरी त्यांचे व नगरसेवक संदीप पुराणिक यांचे मोबाइल क्रमांकही दिले आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.केडीएमसीने २०१४ मधील सर्वेक्षणयादीतील फेरीवाल्यांच्या कागदपत्रांच्या पडताळणीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे फेरीवाला धोरणाची लवकरच अंमलबजावणी होणार आहे. त्या दृष्टीने २१ फेब्रुवारीला फेरीवाला धोरण पुनर्वसन समितीचे अध्यक्ष आयुक्त गोविंद बोडके यांनी डोंबिवलीतील ‘ग’ आणि ‘फ’ प्रभागांतील पात्र ठरलेल्या फेरीवाल्यांचे नियोजन करण्यासाठी विशेष बैठक बोलावली होती. परंतु, त्या दिवशी आयुक्त तहकूब महासभेत व्यस्त होते. त्यामुळे विशेष बैठक होऊ शकली नाही. परिणामी, धोरणाची अंमलबजावणी कृतीअभावी कागदावरच राहिली आहे.दुसरीकडे जेथे धंदा होऊ शकतो, अशाच जागा फेरीवाल्यांसाठी उपलब्ध करून द्या, अशी भूमिका फेरीवाला संघटनांनी घेतली आहे. मात्र, रेल्वेस्थानकापासून १५० मीटर हद्दीत फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास मनाई आहे. परंतु, या हद्दीबाहेरही फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास विरोध होत आहे. फडके रोडवर लावलेले फलक पाहून त्याची प्रचीती येते.काही महिन्यांपूर्वी याच रस्त्यावरील मुजोर फेरीवाल्यांविरोधात राज्यमंत्री व आमदार रवींद्र चव्हाण यांनी आक्रमक भूमिका घेत त्यांना पिटाळाले होते. त्यावेळी झालेल्या वादात फेरीवाल्यांच्या नेत्यांना तुरुंगवारीही घडली होती. काही फेरीवाल्यांमुळे तो प्रकार घडला असला तरी सरसकट फेरीवाल्यांना १५० मीटर हद्दीबाहेर व्यवसाय करू न देणे, हे कितपत योग्य आहे, असा सवाल त्या फलकबाजीवरून उपस्थित केला जात आहे.डोंबिवली कष्टकरी हॉकर्स भाजीविक्रेता संघटनेने या फलकांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. १५० मीटर हद्दीतील फेरीवाल्यांवर कारवाई सुरू असताना त्याच्या बाहेरही, अशा प्रकारे फलकबाजी करून अन्याय चालू असेल, तर ते चुकीचे आहे, असे मत संघटनेचे अध्यक्ष बबन कांबळे यांनी व्यक्त केले. जर महापालिका म्हणते, आम्ही फलक लावले नाहीत, तर अशा प्रकारे बेकायदा फलक लावून दिशाभूल करणाऱ्यांवर कारवाई होणार का, असाही सवाल कांबळे यांनी केला आहे.फलकांबाबत माहीत नाहीआम्ही अशा प्रकारचे फलक लावलेले नाहीत. जर कोणी बेकायदा फलक लावले असतील, तर ते तत्काळ हटवले जातील, असे मत ‘फ’ प्रभाग क्षेत्र अधिकारी अरुण भालेराव यांनी व्यक्त केले.त्यामुळे फलक लावलेफलक लावले आहेत, तेथे अरुंद गल्ली आहे. तेथे फेरीवाले बसत होते. तसेच हातगाड्या लागत असल्याने कोंडी तसेच वादही होत असत. त्यामुळेच तेथील स्थानिक रहिवाशांनी फलक लावले आहेत, असे स्थानिक नगरसेवक संदीप पुराणिक यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाhawkersफेरीवाले