शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

उड्डाणपुलाचे काम न झाल्यास अवमान याचिका दाखल करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 00:58 IST

सुरळके यांचा इशारा । ४२ गावांना होणार फायदा

शहापूर : केंद्र व राज्य सरकारने डिसेंबरअखेर वासिंद येथील ४२ गावांना जोडणारा उड्डाणपूल बांधणार, असे प्रतिज्ञापत्र दिलेले असतानाही सरकारच्या उदासीनतेमुळे पुलाचे काम पूर्ण होण्याची सुतराम शक्यता नाही. कारण, पुलाचे काम संथगतीने सुरू आहे. यासंदर्भात याचिकाकर्ते संजय सुरळके यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतिम निकालानुसार मार्चअखेरपर्यंत उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण करावे, अन्यथा अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

गेल्या ४० वर्षांपासून वासिंद व परिसरातील ४२ गावांतील हजारो ग्रामस्थांचा वासिंद रेल्वे उड्डाणपूल व पावसाळ्यात जाचक ठरणाऱ्या भुयारी मार्गाबाबत उच्च न्यायालयाने नुकताच अंतिम निकाल जाहीर केला होता. मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदरजोग व न्यायमूर्ती नितीन जामदार यांनी निकालपत्रामध्ये याचिकाकर्ते सुरळके यांनी या नागरी समस्यांच्या बाबतीत गंभीरपणे मांडलेल्या वासिंद रेल्वे बोगदा व बंद रेल्वे गेटचे विश्लेषण केले. तसेच न्यायमूर्ती अभय ओक यांच्या समितीने भेट देऊन पाहणी अहवाल सादर केला होता.सरकारी दिरंगाईबाबतही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. सलग दोन वर्षे उच्च न्यायालयात जनहित याचिका सादर केली जात होती. केंद्र व राज्य सरकारने डिसेंबरअखेर पूल बांधण्याचे शपथपत्र दिले होते. या चालू आर्थिक वर्षाअखेर उड्डाणपुलाचे बांधकाम शक्य तितक्या लवकर पूर्ण झाले पाहिजे, असे आदेश दिले आहेत. मात्र, पुलाचे बांधकाम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. सुरळके हे स्वत: या दिरंगाईच्या निषेधार्थ आंदोलनाच्या तयारीत आहेत. उड्डाणपूल झाल्यास ४२ गावांतील ग्रामस्थांची दैना थांबणार आहे. 

टॅग्स :thaneठाणे