शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
3
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
4
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
5
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
6
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
7
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
8
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
9
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
10
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
11
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
12
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
13
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
14
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
15
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
16
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
17
‘लजावल इश्क’वरून पाकिस्तानात गदारोळ; यूझर्सनी हा शो ‘बायकॉट’ करण्याचं केलं आवाहन
18
दिल्लीत नवा आदेश! ‘दरवाजे उघडा, डोळे बंद ठेवा’; नोकरशाहीच्या वर्तुळाला थंडीत घाम फुटण्याची वेळ
19
व्हिसाचे संकट, संधीचा व्हिसा! भारत जगात नवे स्थान निर्माण करू शकतो, जर...
20
भारतीय विद्यार्थ्यांच्या अमेरिकन ड्रीमची नौका बुडणार की काय?

उड्डाणपुलाचे काम न झाल्यास अवमान याचिका दाखल करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 00:58 IST

सुरळके यांचा इशारा । ४२ गावांना होणार फायदा

शहापूर : केंद्र व राज्य सरकारने डिसेंबरअखेर वासिंद येथील ४२ गावांना जोडणारा उड्डाणपूल बांधणार, असे प्रतिज्ञापत्र दिलेले असतानाही सरकारच्या उदासीनतेमुळे पुलाचे काम पूर्ण होण्याची सुतराम शक्यता नाही. कारण, पुलाचे काम संथगतीने सुरू आहे. यासंदर्भात याचिकाकर्ते संजय सुरळके यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतिम निकालानुसार मार्चअखेरपर्यंत उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण करावे, अन्यथा अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

गेल्या ४० वर्षांपासून वासिंद व परिसरातील ४२ गावांतील हजारो ग्रामस्थांचा वासिंद रेल्वे उड्डाणपूल व पावसाळ्यात जाचक ठरणाऱ्या भुयारी मार्गाबाबत उच्च न्यायालयाने नुकताच अंतिम निकाल जाहीर केला होता. मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदरजोग व न्यायमूर्ती नितीन जामदार यांनी निकालपत्रामध्ये याचिकाकर्ते सुरळके यांनी या नागरी समस्यांच्या बाबतीत गंभीरपणे मांडलेल्या वासिंद रेल्वे बोगदा व बंद रेल्वे गेटचे विश्लेषण केले. तसेच न्यायमूर्ती अभय ओक यांच्या समितीने भेट देऊन पाहणी अहवाल सादर केला होता.सरकारी दिरंगाईबाबतही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. सलग दोन वर्षे उच्च न्यायालयात जनहित याचिका सादर केली जात होती. केंद्र व राज्य सरकारने डिसेंबरअखेर पूल बांधण्याचे शपथपत्र दिले होते. या चालू आर्थिक वर्षाअखेर उड्डाणपुलाचे बांधकाम शक्य तितक्या लवकर पूर्ण झाले पाहिजे, असे आदेश दिले आहेत. मात्र, पुलाचे बांधकाम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. सुरळके हे स्वत: या दिरंगाईच्या निषेधार्थ आंदोलनाच्या तयारीत आहेत. उड्डाणपूल झाल्यास ४२ गावांतील ग्रामस्थांची दैना थांबणार आहे. 

टॅग्स :thaneठाणे