शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
5
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
6
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
7
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
8
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
9
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
11
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
12
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
13
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
14
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
15
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
17
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
18
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
19
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
20
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!

फडणवीस काडतूस, तर आमच्याकडे ठाकरी तोफ; सुषमा अंधारे यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2023 09:14 IST

जनप्रक्षोभ मोर्चात ठाकरे गटाच्या नेतेमंडळींकडून सरकारचा समाचार

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : देवेंद्र फडणवीस जर तुम्ही काडतुसाची भाषा केली असेल, तर उद्धव ठाकरे हे तोफ आहेत. तोफेपुढे काडतुसाचा निभाव लागत नाही, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली. तसेच इथला शिवसैनिक छातीचा कोट करून उभा आहे, काय गुन्हे टाकायचेत ते टाका, काय करायचे ते करा, असे म्हणत ‘सरफरोशी की तम्मन्ना अब हमारे दिल मे है...’ असा शेर त्यांनी मारला.

उद्धव ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणीनंतरही गुन्हा दाखल न केल्याच्या निषेधार्थ ठाण्यात महाविकास आघाडीचा ‘जनप्रक्षोभ मोर्चा’ काढण्यात आला होता. यानंतर शक्तिस्थळावर झालेल्या सभेत सुषमा अंधारे बोलत होत्या. अंधारे यांनी पुढे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचाही समाचार घेतला. उद्धव ठाकरेंना मातोश्रीतून बाहेर पडू देणार नाही, असे बावनकुळे म्हणतात. पण, बावनकुळे यांना ‘तुमची उमेदवारी का वाचवता आली नाही,’ असा खोचक सवालही केला. हिंमत असेल तर ४८ तासांच्या आत मातोश्रीवर या, असे आव्हानही केले. महिलेला लाथाबुक्क्यांनी  मारण्यासाठी गृहमंत्र्यांनी परमिट दिले आहे का, असा सवालही त्यांनी केला. दरम्यान, ठाकरे गटापासूनच रोशनी शिंदे यांच्या जीवाला धोका असून  त्यांना पोलिस संरक्षण द्यावे अशी मागणी करणारे पत्र ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी पोलिस आयुक्तांना दिले आहे.

रोशनी आई होऊ नये, याकरिता मारहाण

रोशनी शिंदेच्या सर्व पोस्ट वाचल्या, तिने टाकलेल्या पोस्ट या शिवसेनेच्या संस्कारातल्या होत्या. तिच्या पोस्टमध्ये एकही आक्षेपार्ह शब्द नाही, असा निर्वाळा देत आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, ती आई होऊ नये म्हणून तिच्या पोटावर मारले, एका स्त्रीला आई होण्यापासून रोखणे हे सर्वांत मोठे पाप आहे. तुमच्या या पापाची दखल ३७ नाही ६७ देशांनी घेतल्याची टीका त्यांनी केली.

आहेर यांच्या पदव्या खोट्या, आव्हाडांचा दावा

  • पालिकेतील अधिकारी महेश आहेर, यांची १२ वीची उत्तर प्रदेश आणि सिक्कीमची पदवी दाखवत त्यांनी या पदव्या खोट्या असल्याचे सांगितले. एखादी व्यक्ती माझ्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करीत असेल तर कार्यकर्त्यांना राग येणारच, त्यातून त्यांनी मारहाण केली. 
  • आता चौकशीसाठी पोलिसांना बोलावून घेतले जाते. तासन् तास बसवून ठेवले जाते व जितेंद्र आव्हाड यांचे नाव घ्या, असा दबाव टाकला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. वामन म्हात्रे व बाळा मामा यांच्यावर दबाव टाकल्यानेच त्यांनी पक्ष सोडल्याचे आव्हाड म्हणाले. अशा पद्धतीने दबाव टाकून पक्ष निर्माण करता येत नाही, असेही आव्हाड म्हणाले.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे