शहरं
Join us  
Trending Stories
1
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
2
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
3
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? UAE विरुद्ध खेळणार नसल्याची मोठी माहिती आली समोर
4
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
5
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
6
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
7
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
8
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
9
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
10
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
11
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
12
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
13
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
14
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
15
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
16
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
17
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
18
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
19
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?
20
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र

धरण मिळाल्यास पाणीकपात संपणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:33 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेची वाढती लोकसंख्या आणि पाण्याची वाढती गरज लक्षात घेता महापालिकेस काळू धरण हवे आहे.

मुरलीधर भवारकल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेची वाढती लोकसंख्या आणि पाण्याची वाढती गरज लक्षात घेता महापालिकेस काळू धरण हवे आहे. महापालिकेने या धरणावर दावा सांगितला आहे. पुढील ३० वर्षाचे पाण्याचे नियोजन करुन नागरिकांची तहान भागविण्यासाठी काळू धरण उभारण्याचा प्रस्ताव महापालिका राज्य सरकारला सादर करणार आहे.महापालिकेच्या कालच्या महासभेत मुरबाड तालुक्यातील पाडाळे येथील धरण बांधण्याचा अशासकीय प्रस्ताव मंजूर करण्यात आला. हा ठराव राज्य सरकारकडे पाठविला जाणार आहे. पाडाळे धरण हे आकाराने छोटे असून त्यातून केवळ २० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होऊ शकतो. इतक्या कमी प्रमाणात पाणीपुरवठा होणार असेल तर शहरासाठी पुढील ३० वर्षाकरीता पाण्याचे नियोजन खरोखरच होईल का, असा सवाल उपस्थित होतो आहे. पाडाळे धरण उल्हासनगर, भिवंडी महापालिका व अंबरनाथ पालिकेस हवे आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांनीही तसा मानस व्यक्त केला आहे.या विषयी महापौर राजेंद्र देवळेकर यांच्याकडे विचारणा केली असता पाडाळे ऐवजी महापालिकेस काळू धरण घेण्याचा ठराव करण्यात येणार आहे. काळू धरणातून महापालिकेस एक हजार दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होऊ शकतो. काळू धरणावर महापालिका दावा सांगणार आहे. महापालिकेच्या विकासाकडे राज्यातील शिवसेना व भाजपा युतीचे चांगले लक्ष आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काळू धरण महापालिकेस देण्याचा विचार होऊ शकतो. मात्र या मागणीला अन्य महापालिकांकडून विरोध होण्याची शक्यता आहे.यापूर्वी शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी कर्जत येथील कोंढाणे धरण केडीएमसीकडे घेण्याची मागणी केली होती. मात्र त्याबाबतचा ठराव महापालिकेने केलेला नाही. कोंढाणे धरणाच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी सुरु आहे. कोंढाणे धरण महापालिकेने आपल्याकडे घेण्याचा ठराव केला असता तर महापालिका क्षेत्राला सहा हजार दशलक्ष लीटर पाणी मिळाले असते. प्रत्यक्षात महापालिकेला काळू धरण हवे आहे.महापालिका उल्हास नदी पात्रातून दररोज ३१० दशलक्ष लीटर पाणी उचलते. या पाण्यावर बारावे, मोहिली, टिटवाळा आणि नेतीवली जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करुन हे पाणी शहरी भागाला वितरीत केले जाते. २७ गावांसाठी आजही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून पाणीपुरवठा केला जातो. आत्ता महापालिका क्षेत्रात पुरेसा पाणीपुरवठा होत असला तरी २७ गावांचे पाण्याविषयीचे परालंबित्व नष्ट करण्यासाठी महापालिकेने धरण घेतल्यास २७ गावांसह शहरातील पाणी समस्या संपुष्टात येऊ शकते. उल्हास नदी पात्रातून केवळ केडीएमसीच पाणी उचलत नाही तर स्टेम पाणीपुरवठा, औद्योगिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी उचलते. कल्याण डोंबिवलीला ३१० दशलक्ष लीटर हा मंजूर पाणीपुरवठा आहे. अन्य पाणी ग्राहकही पाणी उचलतात. त्यामुळे दरवर्षी पाणी नियोजनासाठी प्रथम सात नंतर १४ टक्के पाणीकपात लागू केली जाते. काळू धरण महापालिकेचे झाल्यास या पाणी कपातीतून महापालिकेची मुक्तता होऊ शकते. महापालिकेस २७ गावांच्या हद्दवाढीचे अनुदान दिले जात नाही. एलबीटीपोटीचे अनुदान रखडले आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती ठीक नाही. अशा परिस्थितीत धरणासाठी किती पैसा लागतो व ते उभे करण्याची कुवत महापालिकेकडे आहे का ? त्याचा खर्च व किंमत सरकार भरणार आहे का, हे प्रश्न आहेत.