शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

धरण मिळाल्यास पाणीकपात संपणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:33 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेची वाढती लोकसंख्या आणि पाण्याची वाढती गरज लक्षात घेता महापालिकेस काळू धरण हवे आहे.

मुरलीधर भवारकल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेची वाढती लोकसंख्या आणि पाण्याची वाढती गरज लक्षात घेता महापालिकेस काळू धरण हवे आहे. महापालिकेने या धरणावर दावा सांगितला आहे. पुढील ३० वर्षाचे पाण्याचे नियोजन करुन नागरिकांची तहान भागविण्यासाठी काळू धरण उभारण्याचा प्रस्ताव महापालिका राज्य सरकारला सादर करणार आहे.महापालिकेच्या कालच्या महासभेत मुरबाड तालुक्यातील पाडाळे येथील धरण बांधण्याचा अशासकीय प्रस्ताव मंजूर करण्यात आला. हा ठराव राज्य सरकारकडे पाठविला जाणार आहे. पाडाळे धरण हे आकाराने छोटे असून त्यातून केवळ २० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होऊ शकतो. इतक्या कमी प्रमाणात पाणीपुरवठा होणार असेल तर शहरासाठी पुढील ३० वर्षाकरीता पाण्याचे नियोजन खरोखरच होईल का, असा सवाल उपस्थित होतो आहे. पाडाळे धरण उल्हासनगर, भिवंडी महापालिका व अंबरनाथ पालिकेस हवे आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांनीही तसा मानस व्यक्त केला आहे.या विषयी महापौर राजेंद्र देवळेकर यांच्याकडे विचारणा केली असता पाडाळे ऐवजी महापालिकेस काळू धरण घेण्याचा ठराव करण्यात येणार आहे. काळू धरणातून महापालिकेस एक हजार दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होऊ शकतो. काळू धरणावर महापालिका दावा सांगणार आहे. महापालिकेच्या विकासाकडे राज्यातील शिवसेना व भाजपा युतीचे चांगले लक्ष आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काळू धरण महापालिकेस देण्याचा विचार होऊ शकतो. मात्र या मागणीला अन्य महापालिकांकडून विरोध होण्याची शक्यता आहे.यापूर्वी शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी कर्जत येथील कोंढाणे धरण केडीएमसीकडे घेण्याची मागणी केली होती. मात्र त्याबाबतचा ठराव महापालिकेने केलेला नाही. कोंढाणे धरणाच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी सुरु आहे. कोंढाणे धरण महापालिकेने आपल्याकडे घेण्याचा ठराव केला असता तर महापालिका क्षेत्राला सहा हजार दशलक्ष लीटर पाणी मिळाले असते. प्रत्यक्षात महापालिकेला काळू धरण हवे आहे.महापालिका उल्हास नदी पात्रातून दररोज ३१० दशलक्ष लीटर पाणी उचलते. या पाण्यावर बारावे, मोहिली, टिटवाळा आणि नेतीवली जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करुन हे पाणी शहरी भागाला वितरीत केले जाते. २७ गावांसाठी आजही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून पाणीपुरवठा केला जातो. आत्ता महापालिका क्षेत्रात पुरेसा पाणीपुरवठा होत असला तरी २७ गावांचे पाण्याविषयीचे परालंबित्व नष्ट करण्यासाठी महापालिकेने धरण घेतल्यास २७ गावांसह शहरातील पाणी समस्या संपुष्टात येऊ शकते. उल्हास नदी पात्रातून केवळ केडीएमसीच पाणी उचलत नाही तर स्टेम पाणीपुरवठा, औद्योगिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी उचलते. कल्याण डोंबिवलीला ३१० दशलक्ष लीटर हा मंजूर पाणीपुरवठा आहे. अन्य पाणी ग्राहकही पाणी उचलतात. त्यामुळे दरवर्षी पाणी नियोजनासाठी प्रथम सात नंतर १४ टक्के पाणीकपात लागू केली जाते. काळू धरण महापालिकेचे झाल्यास या पाणी कपातीतून महापालिकेची मुक्तता होऊ शकते. महापालिकेस २७ गावांच्या हद्दवाढीचे अनुदान दिले जात नाही. एलबीटीपोटीचे अनुदान रखडले आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती ठीक नाही. अशा परिस्थितीत धरणासाठी किती पैसा लागतो व ते उभे करण्याची कुवत महापालिकेकडे आहे का ? त्याचा खर्च व किंमत सरकार भरणार आहे का, हे प्रश्न आहेत.