शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्त नोकरदार नाही तर स्वत:ला हुकमशहा समजतात, महापौरांनी डागली आयुक्तांवर तोफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 16:13 IST

ठाणे महापालिका आयुक्तांनी माझा नाही तर समस्त ठाणेकरांचा अपमान केला आहे. त्यामुळे यापुढे माझा अपमान केला गेला तर मी माझ्या अधिकाराचा वापर करेन असा इशारा महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आयुक्तांना दिला आहे.

ठळक मुद्देमहापौर आणि आयुक्तांमधील शितयुध्द आणखी पेटण्याची चिन्हेपुन्हा अपमान झाल्यास माझ्या अधिकाराचा वापर करेन

ठाणे - महापौरांनी रेंटलच्या घराच्या मुद्यावरुन आणि त्यानंतर महासभेला अधिकाऱ्यांनी दांडी मारल्यामुळे आयुक्त आणि महापौरांमधील शीतयुध्द आता आणखीनच पेटण्याची चिन्हे आहेत. आयुक्त हे ठाणेकरांचे नोकरदार आहेत, परंतु ते हेच विसरले असून ते हुकमशाही पध्दतीनेच काम करीत असल्याचा आरोप महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केला आहे. आयुक्तांनी माझा नाही तर समस्त ठाणेकरांचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांनी ठाणेकरांची माफी मागावी असे सुतोवाचही त्यांनी केले आहेत. तसेच यापुढे जर माझा अपमान झाला तर मी माझ्या अधिकाराचा वापर करेन असा इशाराही त्यांनी दिला.               मंगळवारी महासभा सुरु झाल्यानंतर लक्षवेधी आणि प्रश्नउत्तरांच्याच तासामुळे लांबली. त्यामुळे ती सभा तहकुब करुन बुधवारी पुन्हा ही सभा लावण्यात आली होती. मात्र, दुपारी दीड वाजले तरी पालिका सचिवांव्यतिरीक्त एकही अधिकारी या सभेला उपस्थित राहू शकला नाही. त्यामुळे सभा काही काळासाठी तहकूब करण्यात आली. विशेष म्हणजे एकीकडे महासभा सुरु असतांनाच दुसरीकडे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अर्बन रिर्सच सेंटर येथे सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक लावली. मार्च अखेरच्या कामांमध्ये प्रशासकीय अधिकारी व्यस्त असून काही अधिकारी विधिमंडळ अधिवेशन आणि न्यायालयीन सुनावणीसाठी गेले आहेत अशी सबब प्रशासनातर्फे देण्यात आली. त्यामुळे सभेसाठी अधिकारी येणार नाही हे स्पष्ट झाले. त्यानंतर आता महासभा केव्हा लावायची हे मी ठरविणार असल्याचेही महापौरांनी प्रशासनाला सुनावले होते. आता या पुढे जाऊन महापौरांनी पालिका आयुक्तांवर गंभीर आरोप लावले आहेत. पालिका आयुक्तांच्या हुकूमशाहीचा मात्र चांगलाच समाचार घेतला आहे. जे सरकारी नोकर आहेत ते स्वत:ला हुकूमशहा समजत आहेत, तुम्ही समोरा समोर चर्चा करायला घाबरता, दम असेल तर चर्चा करा असे थेट आव्हानच त्यांनी आयुक्तांना दिले आहे. नगरसेवक विरोधात बोलले तर त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले जातात, महासभेला अनुपिस्थत राहून त्यांनी लोकशाहीचा अपमान केला आहे. महापौरांचे अधिकार अजून मी वापरलेले नाहीत मात्र वर्तणूक सुधारली नाही तर ते मी वापरू शकते, सभागृहात हक्कभंग ही येऊ शकतो, कसले ठाणे स्मार्ट करत आहात? स्वत:ला की शहराला? नागरिकांना उध्वस्त करून शहर स्मार्ट कसे होणार? असे विविध प्रश्न उपस्थित करत महापौरांनी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यावर तोफ डागली तर ज्या वेळी गावदेवीचे गाळे उद्धवस्त केले गेले तेव्हाच ठाणेकरांनी आंदोलन करायला हवे होते अशी भुमीका महापौर शिंदे यांनी यावेळी मांडली.निवडून दिलेले लोकप्रतिनिधीही गप्प -दुर्देवाने आज नगरसेवक देखील खुलेपणाने प्रशासनाला विरोध करायला घाबरत आहेत. काही अडचणीमुळे कदाचित लोकप्रतिनिधी आयुक्तांसमोर बोलायला घाबरतात किंवा खोट्या केस दाखल करू नये म्हणूनही लोकप्रतिनिधी शांत बसतात. मात्र जनतेचे प्रश्न मी मांडू शकत नाही तर त्या खुर्चीत बसण्याचा अधिकार काय आहे मला ? त्यामुळे पक्षाच्या भूमिकेपेक्षा जनतेचे प्रश्न महत्वाचे असून ते मांडतच राहणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त