शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

बजेटची महासभा लावल्यास ती बेकायदेशीर असेल, या सभेला अनुउपस्थित राहण्याचा लोकशाही आघाडीने दिला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 17:15 IST

नियमानुसार बजेटची महासभा चर्चेविना संपली असल्याने त्यावर पुन्हा चर्चा झाली तर ती बेकायदेशीर असेल असा इशारा लोकशाही आघाडीने दिला आहे. त्यामुळे या सभेलाच अनुउपस्थित राहण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देसत्ताधाऱ्यांनी पुन्हा बजेटची महासभा लावू नये३४ टक्के करवाढीचा प्रस्ताव फेटाळून लावू

ठाणे - नियमानुसार राष्ट्रगीत झाल्याने बजेटवरील महासभा संपली असा त्याचा अर्थ होत आहे. त्यामुळे आता त्यावर पुन्हा महासभा लावली जात असेल तर ती बेकायदा ठरेल असा मुद्दा लोकशाही आघाडीने लावून धरला आहे. त्यामुळे अशा बेकायदा महासभेला उपस्थित राहणार नसल्याचे लोकशाही आघाडीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. नियमानुसार अर्थसंकल्पीय विषय पत्रिका मंजूर झाली आहे. आयुक्तांनी अत्यंत चांगले अंदाजपत्रक सादर केले आहे. त्यामध्ये आम्ही सूचवलेल्या सूचनांचा समाविष्ट करावा, असे म्हणत राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आयुक्तांनी मांडलेल्या अंदाजपत्रकाला पाठिंबा दिला आहे, असे विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.         ठाणे महानगर पालिका आयुक्तांनी १९ मार्च रोजी अंदाजपत्रक मांडले आहे. हे अंदाजपत्रक विनाचर्चा मंजूर झालेले असतानाही सत्ताधारी पक्षाकडून नव्याने महासभा बोलावण्याची तयारी सुुरु केली आहे. या पाशर््वभूमीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या ३८ नगरसेवकांनी विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन अंदाजपत्रकाला पाठिंबा जाहीर केला. या वेळी राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, काँग्रेसचे शहारध्यक्ष मनोज शिंदे, राष्ट्रवादीचे गटनेते हणमंत जगदाळे, काँग्रेसचे गटनेते विक्र ांत चव्हाण, ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला, मुकूंद केणी यांच्यासह विरोधी पक्षांचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.               मिलींद पाटील यांनी सांगितले की, १९ मार्च रोजी झालेल्या महासभेमध्ये अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आलेली आहे. त्या सभेमध्ये आयुक्तांच्या विश्लेषणानंतर राष्ट्रगीत घेण्यात आले. त्यामुळे ही सभा संपलेली असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही सभा तहकूब किंवा खंडीत करण्यात आलेली नाही. त्यामुळे नव्याने सभा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ही बाब नजीब मुल्ला यांनी महापौरांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. ठाण्याच्या विकासासाठी हा अत्यंत चांगला अर्थसंकल्प असल्याने त्यास आमचा पाठिंबा असून नगरसेवकांच्या प्रभागामध्ये असलेल्या नागरी कामांच्यासाठी आयुक्तांनी निधी द्यावा, अशी मागणी आम्ही केली आहे. आयुक्तांनीही या मागणीला सकारात्मकता दर्शविली असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, हा अर्थसंकल्प नियमानुसार मंजूर झालेला आहे. त्यामुळे आता सत्ताधाऱ्यांनी जरी नव्याने महासभा बोलावण्याचा प्रयत्न केला तर, ती सभा आधी कायदेशीर आहे की बेकायदेशीर? हे आम्ही पडताळून पाहणार असून त्यानंतर ही महासभा बेकायदेशीर असल्यास अनुपिस्थत राहू, असेही पाटील यांनी सांगितले. तर, बुधवारच्या महासभेला अधिकारी वर्ग अनुपिस्थत राहणे हा सत्ताधाºयांचा पराभव असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.चौकट - ठाणे महापालिकेकडून ३४ टक्के करवाढीचा प्रस्ताव रेटून नेण्याचा प्रयत्न केला जात असला तर ठाणेकरांच्या हितासाठी वेळ पडल्यास रस्त्यावर उतरु असा इशारा देखील यावेळी लोकशाही आघाडीने दिला. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाBudgetअर्थसंकल्प