शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

प्रत्येक गुन्ह्यात आरोपींची ओळख परेड आवश्यक नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 05:14 IST

चोरी, दरोड्यासारखे गुन्हे करताना आरोपी स्वत:ची ओळख लपवितात. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये आरोपींची ओळख परेड अत्यावश्यक आहे का, असा सवाल करत, ठाणे न्यायालयाने तीन सोनसाखळी चोरांना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

राजू ओढे ठाणे : चोरी, दरोड्यासारखे गुन्हे करताना आरोपी स्वत:ची ओळख लपवितात. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये आरोपींची ओळख परेड अत्यावश्यक आहे का, असा सवाल करत, ठाणे न्यायालयाने तीन सोनसाखळी चोरांना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.चोरी किंवा दरोड्याच्या बहुतांश गुन्ह्यांमध्ये आरोपी आपण पकडले जाऊ नये, यासाठी ओळख लपवत असतात. त्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे अनोळखी आरोपींविरुद्ध दाखल केले जातात. या गुन्ह्यांमधील खरे आरोपी शोधणे हे पोलिसांसाठी कौशल्याचे काम असते. अशा प्रकरणांची उकल करण्यात तपास अधिकारी क्वचित यशस्वी होतात, असे निरीक्षण ठाणे न्यायालयाने नोंदविले. राबोडी पोलीस ठाण्यातील एका सोनसाखळीच्या खटल्यामध्ये फिर्यादी महिलेने आरोपींना ओळखले नाही. बचाव पक्षाने हा मुद्दा न्यायालयासमोर उपस्थित करून आरोपींना संशयाचा फायदा देण्याची विनंती केली. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्वाळ्याचा दाखला देत, न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरला नाही.भारतीय पुरावे कायद्याचे कलम ११४ अन्वये एखाद्या प्रकरणामध्ये न्यायसंगत तर्क लावण्याचे अधिकार न्यायालयाला आहेत. एखाद्या व्यक्तीकडे दोन-तीन दागिने सापडल्यास ते त्याचे अथवा त्याच्या पत्नीचे आहेत, असे समजण्यास हरकत नाही. मात्र, आरोपींकडे मोठ्या प्रमाणात दागिने सापडले असून, त्याबाबत आरोपी स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत. अशा परिस्थितीत केवळ ओळख परेड होऊ शकली नाही, म्हणून आरोपींना संशयाचा फायदा देता येणार नाही, असे न्यायालयाने निकालामध्ये स्पष्टकेले आहे.>तपासातील त्रुटींचा आरोपींना फायदा नाहीसोनसाखळी चोरीतील तिन्ही आरोपी कल्याणजवळच्या आंबिवली येथील आहेत. पोलिसांनी आरोपींचा जबाब दुपारी ११.४५ वाजता नोंदविला. त्याच दिवशी दुपारी १२ ते ५ वाजताच्या दरम्यान तिन्ही आरोपींच्या आंबिवली येथील घरांमधून चोरीचे दागिने हस्तगत केल्याचे पोलिसांच्या दस्तावेजातून दिसते. अवघ्या १५ मिनिटांत पोलीस ठाण्याहून आंबिवली येथे कसे पोहोचले, असा युक्तिवाद करून, बचाव पक्षाने वेळोवेळी या मुद्द्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. या मुद्द्यावर तपास अधिकाºयाची चूक स्पष्टपणे दिसते. मात्र, सरकार पक्षाने आरोपींचा गुन्हा ठोस पद्धतीने सिद्ध केल्याचे स्पष्ट करून, तपासातील अशा त्रुटींचा फायदा नेहमीच आरोपींना देता येणार नाही, असे स्पष्ट निरीक्षणही न्यायालयाने या वेळी नोंदविले.>सोनसाखळी चोरांना सश्रम कारावासमहिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र खेचून नेणाºया कल्याणच्या तीन चोरांना ठाणे न्यायालयाने २३ फेब्रुवारीला२ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. मो. अफसर सय्यद (३३), अजिज हाफीज सय्यद (३३) आणि मुख्तार शेरू हुसेन उर्फ इराणी (२५) ही या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. तिघेही कल्याणमधील आंबिवली येथील रहिवासी आहेत.११ सप्टेंबर २०१४ला प्रज्ञा राजपूत नावाची महिला मैत्रीण कामिनी खैरनारसोबत पायी जात असताना, मोटारसायकलवर आलेल्या तिघांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचले. प्रज्ञा राजपूत यांनी मंगळसूत्र पूर्ण ताकदीनिशी पकडून ठेवले. त्यामुळे मंगळसूत्र तुटून अर्धे आरोपींच्या आणि अर्धे प्रज्ञा यांच्या हातात राहिले. वर्तकनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक अभिजित भुजबळ यांनी या प्रकरणाचा तपास केला. दरम्यान, गुन्हे अन्वेषण शाखेला कार्यरत असताना, तपास अधिकारी भुजबळ यांनी ३१ जानेवारी २०१६ला तिन्ही आरोपींना अटक केली. त्यांच्याजवळून सोन्याचे ३२ दागिने पोलिसांनी हस्तगत केले. प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी आर. टी. इंगळे यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. साक्षीदारांचे जबाब आणि उपलब्ध पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने तिन्ही आरोपींना २ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. आरोपी जवळपास दीड वर्षापासून तुरुंगात होते. तो कालावधी शिक्षेतून वगळण्याचे आदेशही न्यायालयाने या वेळी दिले.

टॅग्स :thaneठाणे