शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईला जाऊन हीरो व्हायचंय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) गेल्या ७ महिन्यांत मध्य रेल्वेवरील विविध विभागांतील रेल्वे स्थानकांच्या रेल्वे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) गेल्या ७ महिन्यांत मध्य रेल्वेवरील विविध विभागांतील रेल्वे स्थानकांच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवरून ४७७ मुलांना शोधले आणि त्यांना विविध नाद, व्यसनातून सोडवले. चाइल्ड लाइनसारख्या स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने त्यांच्या पालकांशी पुन्हा भेट घडवून आणली. त्यापैकी बरेच जण कौटुंबिक भांडण किंवा काही कौटुंबिक समस्यांमुळे, चांगल्या आयुष्याच्या किंवा ग्लॅमरच्या शोधात मिळेल त्या गाडीने मुंबईला आले. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना ते प्लॅटफॉर्मवर किंवा रेल्वे स्थानकांजवळ किंवा कधी कधी गाड्यांमध्येही फिरताना आढळले की, ते लगेचच त्यांना बोलके करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अनेक लहान मुले वाईट वळणाला लागण्यापासून वाचलेली आहेत. रेल्वेच्या या उत्कृष्ट सेवेबद्दल पालक मनापासून कृतज्ञता आणि आभार व्यक्त करतात.

मुंबई, ठाणे परिसरात समतोल फाउंडेशनसारख्या सामाजिक संस्था अशा मुलांना शोधून त्यांच्याशी जवळीक करून त्यांना पुन्हा माघारी पाठवण्यासाठी खूप मोठे काम करत आहेत. या संस्थेचे संस्थापक विजय जाधव यांनी सांगितले की, वर्षाकाठी सुमारे ६०० मुले, मुली पळून येतात. देशाच्या विविध भागांतून ते येतात. त्यांना शोधून संपर्कात ठेवणे आणि पुन्हा घरी पाठवणे, हे मोठे आव्हान असते.

---------------------

पळून येणाऱ्यांत मुलांचे प्रमाण सर्वाधिक असते, मुली तुलनेने कमी असल्याचा निष्कर्ष अनेक वर्षांचा अभ्यास करून काढल्याचे समतोल फाउंडेशनचे विजय जाधव म्हणाले.

-------------

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील स्थानकात आढळलेली मुले

२०१८ सुमारे ६००

२०१९ सुमारे ५००

२०२० आकडेवारी उपलब्ध नाही

२०२१ (जुलैपर्यंत) मुंबई विभागात १६६

--/-/----------

का येतात पळून मुले?

कोणाला बंगला-गाडीचे आकर्षण, तर कोणाला घरातील वादाचा कंटाळा, अभ्यासाचा कंटाळा, तर चित्रपटाचे आकर्षण, सहमित्रांची साथ, पैसे, चंगळवाद, झटपट पैसा, ग्लॅमर, अल्पावधीतच मोठे होण्याचे आकर्षण.

------------------

एका प्रकरणात २४ जुलै रोजी कर्तव्यावरील ट्रेन तिकीट परीक्षक (टीटीई) नरेंद्र मिश्रा यांना एक १७ वर्षांची मुलगी एका ट्रेनमध्ये कल्याण आणि लोकमान्य टिळक टर्मिनसदरम्यान एकटी प्रवास करताना आढळली. लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचल्यावर टीटीईने तिला ड्यूटीवर असलेल्या महिला आरपीएफने चाइल्डलाइन संस्थेच्या शारदा कांबळे यांच्याकडे सोपवले. चाइल्ड लाइन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आरपीएफ उपनिरीक्षक बबलू कुमार यांनी तिची चौकशी केली असता तिने तिचे नाव शीतल (नाव बदलले आहे) सांगितले. ती बिहारच्या पाटणा येथे राहते आणि मुंबईत मॉडेलिंग/अभिनयामध्ये करिअर करण्यासाठी कोणालाही न सांगता पळून आल्याचेही तिने सांगितले. पुढील कारवाईसाठी चाइल्ड लाइन कर्मचारी शारदा कांबळे आणि महिला आरपीएफ कॉन्स्टेबल पूनम तिवारी यांनी त्या मुलीला बालसुधारगृह, डोंगरी यांच्याकडे सुपुर्द केले.

---------------------

दुसऱ्या एका घटनेत, मेहबूबनगर जिल्ह्यातील १४ वर्षीय मुलगी तिच्या आईने फटकारल्यानंतर घरातून पळून निजामुद्दीन- पुणे यशवंतपूर एक्स्प्रेस या विशेष गाडीने आली. आरपीएफ कॉन्स्टेबल शशिकांत जाधव आणि महिला कॉन्स्टेबल पी. श्रीवास यांना १४ जुलै रोजी हडपसर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर ती सापडली. चौकशी केल्यावर मुलीने तिचे नाव गीतांजली (नाव बदलले) सांगितले. ती फक्त तेलगू बोलू शकत होती. तिने दिलेल्या नंबरवर तिच्या काकांशी संपर्क साधला. त्यानंतर आरपीएफने पुढील कारवाईसाठी मुलीला साथी एनजीओकडे सोपवले.

--- -------------