शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

'मला बेरोजगारीमुक्त महाराष्ट्र घडवायचाय, तुमचा आशीर्वाद हवाय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 17:28 IST

जनआर्शीर्वाद यात्रा मी दरवर्षी काढणार आहे, लोकांना गावागावात जाऊन भेटणार आहे.

ठाणे - आदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेच्या चौथ्या टप्प्यातील तिसरा दिवस आहे. आदित्य ठाकरे आज पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे बोलत होते. मी 92 मतदारसंघात फिरलो असून साधारण साडे पाच हजार किमी फिरलोय. लोकांचा विश्वास महत्त्वाचा असतो, निवडणुकीनंतर राजकीय भेदभाव ठेवायचा नसतो. आपल्याला मते न दिलेल्यांचेही काम करायची असतात, असे मला माझ्या वडिलांनी सांगितलं, असे आदित्य ठाकरेंनी म्हटल. तसेच, मला नवा महाराष्ट्र घडवायचा असून तरुणांसाठी बेरोजगारीमुक्त महाराष्ट्र घडवायचाय, असेही आदित्य म्हणाले. 

जनआर्शीर्वाद यात्रा मी दरवर्षी काढणार आहे, लोकांना गावागावात जाऊन भेटणार आहे. मी जनआशार्वाद यात्रेच्या माध्यमातून तुमचे आशीर्वाद मागत आहे. मला नवा महाराष्ट्र घडवायचाय. मला भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र घडवायचाय, मला बेरोजगारीमुक्त महाराष्ट्र घडवायचाय, मला कर्जमुक्त, दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडवायचंय. मला सुजलांम सुफलाम महाराष्ट्र घडवायचाय, मला भगवा महाराष्ट्र घडवायचाय. मला तुमच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवायचाय. तुमच्या स्वप्नांना मंत्रालयात स्थापन करायचं, त्यासाठी मला नवा महाराष्ट्र घडवायचाय, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी बोईसर येथील नागरिकांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला. तसेच, आदित्य यांनी मोंदींस्टाईल येथील जनतेला प्रश्न विचारत, मला आशीर्वाद द्याल का, मी तुम्हाला विचारतोय मला नवा महाराष्ट्र घडवायचा ना, असे म्हणत लोकांची मने जाणून घेतली. 

महाराष्ट्रात शिवशाही निर्माण करायचीय, शिवशाही म्हणजे जनतेची काम तात्काळ झाली पाहिजेत, लोकांना कुठल्याही अडचणी येता कामा नयेत, याला शिवशाही म्हणतात, असे आदित्य यांनी म्हटले. मी आगामी विधानसभेच्या निवडणुकांसाठी ही जनआशीर्वाद यात्रा काढली नसून लोकसभा निवडणुकीत तुम्ही शिवसेनेवर आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाचे आभार मानायला मी आलोय, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी मी आपला ऋणी असल्याचे म्हटले.  

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्रjobनोकरी