शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

प्लास्टिक सर्जरीमुळे मला नवे जीवनच मिळाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2019 23:52 IST

जळणे, भाजणे, कापणे यामुळे चेहरा विद्रुप होण्याबरोबरच काही वेळा शरीराचा एखादा अवयव पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाही.

- योगेश बिडवई जळणे, भाजणे, कापणे यामुळे चेहरा विद्रुप होण्याबरोबरच काही वेळा शरीराचा एखादा अवयव पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाही. अशा वेळी प्लास्टिक सर्जरीमुळे मात करता येते. ती महाग असल्याने चित्रपटातील तारे करतात, असा समज असतो. मात्र सर्वसामान्य माणूसही त्याद्वारे आपल्या व्यंगावर मात करू शकतो. विजेच्या धक्क्यामुळे दानिश खाटीक हा तरूण हाताची बोटे हलवू शकत नव्हता. या सर्जरीमुळे त्याची बोटे पूर्ववत झाली आहेत. १५ जुलैच्या प्लास्टिक सर्जरी दिनानिमित्त दानिश याने ‘लोकमत’शी साधलेला हा संवाद.तुझ्या डाव्या हाताची बोटे हलत नव्हती, ही दुर्घटना कशी घडली?मी घरातील पाण्याची मोटार सुरू केल्यानंतर काही तांत्रिक कारणाने ती सुरू झाली नाही. म्हणून तिला हात लावल्यानंतर विजेचा जोरदार धक्का बसल्याने मला काहीच कळाले नाही. नंतर मी माझे काम करायला लागलो. मात्र नंतर काही दिवसांनी मला लक्षात आले, मी डाव्या हाताने जड वस्तू उचलू शकत नाही. मी हाताने काम करू शकत नाही. हाताची मूठ वळल्यानंतर मी लवकर बोटे सरळ करू शकत नव्हतो.या दुर्घटनेनंतर तुझी मानसिक स्थिती कशी होती?मी डाव्या हाताने लिहीत असल्याने व त्याच हाताची हालचाल मंदावल्याने मला उजव्या हाताने लिहायची सवय करावी लागली. मात्र त्या हाताने चांगले लिहू शकत नव्हतो. त्यामुळे अभ्यासात अडचण यायला लागली. माझे वडील शेळीपालन करतात. या आजारावर खूप पैसे खर्च होतील, अशी भीती होती. भुसावळ, जळगाव येथे तज्ज्ञांचा अभाव असल्याने डोंबिवलीतील प्लास्टिक सर्जन डॉ. प्रितीश भावसार यांना दाखविले. प्लास्टिक सर्जरीने तुमची बोटे पूर्ववत होऊ शकतात, असे सांगितल्यावर जीवात जीव आला.सर्जरीनंतर तुला कसे वाटते? तुझी पुढची स्वप्ने आता पूर्ण होतील, असे तुला वाटते का?हो, प्लास्टिक सर्जरीनंतर माझ्या बोटांची आता पूर्ववर हालचाल होते. मी पूर्वीप्रमाणे काम करू शकतो. जड वस्तू उचलू शकतो. माझे महाविद्यालय पूर्वीप्रमाणे सुरू आहे. मी आता एफवायबीएला आहे. पूर्वीप्रमाणे मी लिहू शकतो. माझी कामे करू शकतो. प्लास्टिक सर्जरीमुळे मला एकप्रकारे नवे जीवनच मिळाले आहे असा विश्वास दानिशयाने या वेळी व्यक्त केला.प्लास्टिक सर्जरी म्हटल्यानंतर खूप महागडी असेल. प्लास्टिक सर्जरी केवळ मोठमोठे अभिनेते-अभिनेत्री करतात, असे मला वाटत होते. मात्र डॉ. भावसार यांनी सर्व समजावून सांगितले. माफक खर्चात माझे उपचार झाले. माझ्या कुटुंबाला मोठा आर्थिक ताण पडला नाही. याचेही मला समाधान आहे.