शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

महिला सरपंचांच्या पतीराजांना आता ग्रामपंचायतींत ‘नो एण्ट्री’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:36 IST

ठाणे : ग्रामविकासात ग्रामपंचायतीचे महत्त्वाचे स्थान असून पुरुषांच्या बराेबरीने आता महिलाही अनेक ग्रामपंचायतींचा समर्थपणे कारभार पाहत आहे. आरक्षणाच्या माध्यमातून ...

ठाणे : ग्रामविकासात ग्रामपंचायतीचे महत्त्वाचे स्थान असून पुरुषांच्या बराेबरीने आता महिलाही अनेक ग्रामपंचायतींचा समर्थपणे कारभार पाहत आहे. आरक्षणाच्या माध्यमातून महिलांना सरपंचपदी विराजमान हाेण्याची समान संधी त्यांना मिळू लागली आहे. जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींचा कारभार २६५ महिला सरपंचांच्या हाती आहे. मात्र, बहुतांशी महिला सरपंचांच्या कामकाजात त्यांचे पतिराजा हस्तक्षेप करीत असल्याचे आढळले आहे. मात्र, या हस्तक्षेपाला पायबंद घालणारा निर्णय राज्य शासनाने नुकताच घेतला आहे. त्यानुसार महिला सरपंचांच्या पतीराजाला आता ग्रामपंचायतीत ‘नो एण्ट्री’ राहणार आहे.

अबला महिलांना सबळ करण्यासाठी, त्यांच्या सक्षमीकरणासाठी महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांत प्रतिनिधित्व दिले आहे. पुरुषांच्या बरोबरीने महिलाही उत्तम कारभार करू शकत असल्याचे उघड झाले आहे. जिल्ह्यातील या ४३१ ग्रामपंचायतींपैकी ४१३ सरपंचांची निवड झाली आहे. यापैकी सर्वाधिक २६५ महिला जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा कारभार पाहत आहेत. तर केवळ १४८ पुरुष सरपंच जिल्ह्यात आहेत. या महिलाराज असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये मात्र त्यांच्या पतीराजांचाच वरचष्मा आहे. या नवरोबांचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे ते स्वतःलाच स्वयंघोषित सरपंच म्हणून घेत आहेत. त्यामुळे महिला सरपंचांना त्यांच्या बुद्धिकौशल्याने कारभार करण्याची संधी मिळत नाही. त्यांची फक्त स्वाक्षरी घेऊन पतीच सरपंच म्हणून गावभर टेंभा मिरवत असल्याचे दिसून येत आहे. याला पायबंद घालणारा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार महिला सरपंचांच्या पतीराजाला ग्रामपंचायतीच्या कामकाजात हस्तक्षेप करण्यास पूर्णतः बंदी घातली आहे. पतीराज, नातेवाईक आदींकडून कामात हस्तक्षेप झाल्याचे आढळल्यास सरपंच, उपसरपंच, सदस्यांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सध्या तेथील विरोधी पक्षाचे सदस्य सक्रिय झाले असल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले.

--------

१) जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायती - ४३१

२) महिलाराज असलेल्या ग्रामपंचायती - २६५

जिल्ह्यातील तालुकानिहाय सरपंच

* तालुका - महिला - पुरुष - एकूण-

१) अंबरनाथ २२ - ०४ - २६

२) भिवंडी ७४ - ४५ - ११९

३) कल्याण २७ - १४- ४१

४) मुरबाड ७९ - ४४ - १२३

५) शहापूर ६३ - ४१ - १०४

-----

प्रतिक्रिया येणार आहेत.