शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

विकासकामांसाठी करावी लागली अडथळ्यांची शर्यत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 23:00 IST

शहरात कलानी कुटुंबाचा दबदबा असताना विकासकामे करण्यासाठी महापौर पंचम कलानी यांना धाप लागल्याचे बोलले जात आहे.

- सदानंद नाईक, उल्हासनगरशहरात कलानी कुटुंबाचा दबदबा असताना विकासकामे करण्यासाठी महापौर पंचम कलानी यांना धाप लागल्याचे बोलले जात आहे. तसेच विकासकामांसाठी मुख्यमंत्र्यांचे उंबरठे झिजवावे लागले. सत्ताधारी आघाडीतील मित्रपक्षाच्या अडथळ्यांमुळे कलानी कुटुंबाला महापौरपदी न्याय देता आला नाही. २२ नोव्हेंबर रोजी महापौरपदाची निवडणूक होणार असून पंचम यांचा महापौरपदाचा शेवटचा दिवस असेल.उल्हासनगर महापालिका व शहरावर दोन ते तीन दशके एकहाती सत्ता असणाऱ्या कलानी कुटुंबाची राजकीय वाताहत झाल्याचे चित्र काही वर्षापासून दिसत आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्ष व आमदार असणाºया ज्योती कलानी यांचा मुलगा ओमी कलानी यांनी ओमी टीमची स्थापना करून महापालिका निवडणुकीत थेट भाजपसोबत आघाडी केली. तसेच ओमी टीम समर्थकांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरविले. हीच मोठी घोडचूक कलानी कुटुंबाला नडली.महापालिकेवर भाजप-ओमी कलानी टीम आघाडीची साई पक्षासह सत्ता आल्यानंतर महापौरपदाच्या पहिल्या टर्मपैकी सव्वा वर्षाचे महापौरपद ओमी टीमला देण्याचे ठरले होते. सुरूवातीला सव्वा वर्षे महापौर म्हणून मीना आयलानी विराजमान झाल्या. मात्र महापौरपदी सव्वा वर्ष झाल्यानंतरही आयलानी महापौरपद सोडत नव्हत्या. यातूनच आयलानी विरूद्ध कलानी यांच्यातील राजकीय संघर्ष नव्याने सुरू झाला. मुख्यमंत्र्यांच्या घराचे उंबरठे झिजविल्यावर पंचम यांना महापौरपद मिळाले. मात्र तेव्हा भाजपने एक अट घातली आणि ती म्हणजे पंचम यांनी माध्यमांना सांगताना भाजपचे महापौर असा उल्लेख करावा. पंचम यांनी प्रत्येकवेळी ओमी टीम ऐवजी भाजपचे महापौर असे सांगून भाजपच्या अनेक कार्यक्रमांत सहभाग घेतला. मात्र त्यानंतर भाजपकडून म्हणावे तसे सहकार्य मिळाले नाही.महापालिकेतील सत्ताधारी आघाडीतील ओमी टीम विरूद्ध भाजप व साई पक्ष असा सुप्त सामना रंगल्याने, पंचम कलानी यांना विकासकामांकडे लक्ष देण्यास वेळच मिळाला नाही. महापौरांचे काम पंचमऐवजी ओमी करीत असल्याची टीका झाली.महापौर पंचम कलानी, तत्कालीन आमदार ज्योती कलानी, ओमी कलानी यांनी कमी महापौरपदाच्या कार्यकाळात विकास साधण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना विश्वासात घेऊन धोकादायक इमारती नियमित करणे, वाढीव चटईक्षेत्र देणे, अध्यादेश लागू करणे, एमएमआरडीए अंतर्गत कोटयवधींचा विकासनिधी आणण्याचे काम केले. मात्र म्हणावी तसी प्रसिध्दी मिळाली नाही. विकासाच्या कामात खोडा घालण्याचे काम मित्र पक्षांनी केल्याचा आरोप होत आहे.दमछाक केल्यानंतर पंचम कलानी यांना महापौरपद मिळाले. पण त्यानंतर कामे करताना अनेक त्रासांना सामोरे जावे लागले. भाजपकडे गेल्याशिवाय कामे करताच येत नव्हती. यामुळे शहर विकासापेक्षा राजकारण महत्त्वाचे हे पुन्हा एकदा यानिमित्ताने समोर आले आहे.शिवसेना बनली कलानी समर्थकमहापालिकेतील सत्ता ताब्यात घेण्यासाठी शिवसेना आक्रमक झाली असून भाजपला धडा शिकविण्यासाठी ओमी कलानी टीमसह इतर लहान पक्षांचा सहयोग घेण्यासाठी शिवसेना पुढे सरसावली आहे. ओमी टीम व शिवसेना यांच्यात अंतर्गत घडामोडी सुरू असून महापालिकेतून भाजपला सत्तेतून पायउतार करण्यासाठी शिवसेनेसह ओमी टीम आक्रमक झाली आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर