शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पुराच्या पाण्यामुळे शेकडो वाहने झाली नादुरूस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 01:58 IST

इंजिनमध्ये गेले पाणी; उंदरांनी वायरही कुरतडल्या, गॅरेजचालकांची कामे दुपटीने वाढली

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांत आलेल्या पुराचा फटका शेकडो वाहनांना बसला आहे. दुचाकींच्या इंजिनमध्ये पाणी गेल्याने ती नादुरुस्त झाली असून, त्यामुळे गॅरेजचालकांची कामे दुपटीने वाढली आहेत. दोन-तीन दिवसांपासून दुचाकी मोठ्या प्रमाणात दुरुस्तीसाठी येत असल्याचे गॅरेजचालकांनी सांगितले.गेल्या आठवड्यात कल्याणमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सखल भाग जलमय झाला होता. या पुरामुळे जनजीवन ठप्प झाले होते. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला. सोबतच शहरातील शेकडो वाहने पुराच्या पाण्यामुळे नादुरुस्त झाली. ही वाहने दुरुस्तीसाठी शहरातील विविध गॅरेजमध्ये आणण्यात आली आहेत. त्यामुळे गॅरेजमध्ये काम दुपटीने वाढल्याचे गॅरेजमधील कर्मचाऱ्यांनी सांगितले.शहरातील वल्लीपीर रोड, बिर्ला महाविद्यालय, लालचौकी, खडकपाडा, बेतुरकरपाडा, रामबाग, पौर्णिमा टॉकीज, विठ्ठलवाडी परिसर, वालधुनी, खडेगोळवली, कर्णिक रोड, चक्कीनाका, सूचकनाका, मलंगरोड यासारख्या ठिकाणांसह अन्य गॅरेजमध्ये दोन-तीन दिवसांपासून ६० ते ७० दुचाकी दुरुस्तीसाठी येत आहेत.एरव्ही, दररोज १० ते १२ दुचाकी दुरुस्तीला येत होत्या. मात्र, आता पुरानंतर अशा वाहनांचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. आमच्याकडे दररोज ३० पेक्षा जास्त दुचाकी येत आहेत, असे बेतुरकरपाडा येथील गॅरेजचालक दीपकने सांगितले. पुरामुळे नादुरुस्त झालेली ९० टक्के वाहने दुरुस्तीसाठी आमच्या गॅरेजमध्ये आली आहेत. पुरामुळे अनेक वाहने बुडाली होती, तर अनेक वाहने वाहून गेली होती. त्यामुळे इंजिनात पाणी जाणे, सायलेन्सर खराब होणे, इंजिन नादुरुस्त होणे अशा तक्रारी येत आहेत. त्यातच उंदरांनी दुचाकीची वायर कुरतडल्याने वाहनांचे नुकसान झाल्याचे गॅरेजचालक दिनेश याने सांगितले. पावसाळ्यात वाहने नादुरुस्त होत असतात. पण पुरामुळे नादुरुस्त वाहनांचे प्रमाण अधिक आहे. सध्या नादुरुस्त वाहने दुरुस्त करून देण्याच्या कामाला प्राधान्य देत असल्याचे गॅरेजचालक धिरज यांनी सांगितले.पावसाच्या पाण्यामुळे नुकसान झालेल्या दुचाकींचे मालक इन्शुरन्ससाठी येत असून ५0 टक्क्यांपर्यंत त्यांचा क्लेम मंजूर होत असल्याची माहिती एका इन्श्युरन्स एजंटने दिली. पूराच्या पाण्यामुळे माझ्या गाडीचे इंजिन खराब झाले होते. गॅरेजमध्ये दुचाकी दुरस्तीसाठी दिली असता, दुरु स्तीचा खर्च एक हजार रु पये आल्याचे एका दुचाकी चालकाने सांगितले.

टॅग्स :floodपूर