शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

श्रमजीवीचा बि-हाड मोर्चा :आदिवासींचा केडीएमसीवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 02:43 IST

केडीएमसीच्या हद्दीतील आदिवासीपाड्यांना मूलभूत सोयीसुविधा पुरवल्या जात नसल्याच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेने सोमवारी महापालिका मुख्यालयावर बिºहाड मोर्चा काढला.

कल्याण : केडीएमसीच्या हद्दीतील आदिवासीपाड्यांना मूलभूत सोयीसुविधा पुरवल्या जात नसल्याच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेने सोमवारी महापालिका मुख्यालयावर बिºहाड मोर्चा काढला. याप्रसंगी आदिवासींंनी महापालिकेविरोधात घोषणा दिल्या.डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून मोर्चाला सुरुवात झाली. रामभाऊ वारणा, बाळाराम भोईर, राजेश चन्ने, विष्णू वाघे, गणेश भामरे, कमळाबाई तरणे, नंदू जाधव, भालचंद्र वाघमारे, शांताराम राऊत, विलास चौधरी, वासुदेव वाघे, प्रकाश खोडका, बाळू हुमणे आदी या मोर्चात सहभागी झाले होते. महापालिकेच्या स्थापनेच्या आधीपासून पालिका हद्दीत २५ आदिवासीपाडे आहेत. मात्र, ते सुविधांपासून दूर आहेत. लामणीपाडा, आधारवाडी, वाडेघर या पाड्यांना दूषित पाणीपुरवठा होत आहे.सरकारने कायदा करून शिक्षणाची सक्ती केली आहे. मात्र, आदिवासीपाड्यांतील मुलांना अद्याप शिक्षणासाठी सुविधाच उपलब्ध नाहीत. बिल्डरांनी आदिवासींच्या जमिनींवर कब्जा करून त्यांना तेथून हुसकावून लावले आहे. यासंदर्भातील विविध मागण्यांसाठी मोर्चातील शिष्टमंडळाने केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेतली. यापूर्वी काढलेल्या मोर्चावेळी प्रशासनाने आदिवासींना आश्वासन दिले होते. मात्र, हे आश्वासन पाळले न गेल्यामुळे मोर्चा काढण्यात आला.१५ दिवसांत समस्या सोडवण्याचे आश्वासन : शिष्टमंडळाने केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांच्याशी आदिवासींच्या समस्यांबाबत चर्चा केली. त्यावर १५ दिवसांत सर्व आदिवासीपाड्यांना प्रत्यक्ष भेट देऊ न समस्या सोडवल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र, १५ दिवसांनंतरही या समस्या सोडवण्यात दिरंगाई झाल्यास आदिवासी आंदोलन करतील, असा इशारा संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी दिला.

टॅग्स :thaneठाणेkdmcकल्याण डोंबिवली महापालिका